शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पितृपक्ष भाद्रपद वद्यातच का?... शास्त्र काय सांगतं जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 11:08 IST

पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात.

पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जागृत असणाऱ्या वासना अंशतः तृप्त करण्याचा प्रयत्न म्हणजेही श्राद्ध होय. 

पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. सूर्य कन्या राशीत गेल्यावर १५-१६ दिवस सलग श्राद्ध करावे किंवा भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत वृद्धितिथी धरून सोळा श्राद्ध होतात. म्हणजे, पितृपक्षात सर्वही दिवस 'महालय' (श्राद्धकर्म) करावा, असे शास्त्रवचन आहे. अलीकडच्या काळात या कर्मात बदल होऊन किमान व्यक्तीच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी तरी 'महालय' करावा असा प्रघात आला आहे. 

महालयाकरिता भाद्रपद वद्य पक्षच का ठरवला, अशी शंकाही नेहमी उपस्थित केली जाते. त्याचे कारण पुढीलप्रमाणे देण्यात येते - पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपद अखेरीस वर्ष समाप्त होत असे. वर्षाच्या शेवटी पितरांच्या तृप्तीकरिता एक श्राद्ध करण्याची प्रथा सुरू झाली. तीच आजही सुरू आहे. नंतर कालौघात वर्षारंभ चैत्रात करण्याची परंपरा सुरू झाली, पण महालय भाद्रपद कृष्ण पक्षातच राहिला. म्हणूनच मृत पावलेल्या आपल्या आप्तेष्टांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा पितृपक्ष आजपासून सुरू झाला आहे. 

संकलन - सुमंत अयाचित

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक