शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पितृलोक नेमका आहे तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 13:24 IST

पितृलोक, पितृस्वरूप व पितरांच्या तृप्तीचे मार्ग, याबद्दल प्राचीन ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांच्या वेळेपासून पितृविषयक काही निश्चित कल्पना होत्या, असे स्पष्टपणे दिसते.

पितृलोक, पितृस्वरूप व पितरांच्या तृप्तीचे मार्ग, याबद्दल प्राचीन ग्रंथांतून सविस्तर माहिती मिळते. ऋग्वेदादि प्राचीन ग्रंथांच्यावेळेपासून पितृविषयक काही निश्चित कल्पना होत्या, असे स्पष्टपणे दिसते. वैदिक साहित्यात शतपथ ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, छांदोग्य उपनिषद आदी ग्रंथांत तो लोक अनुभवून आल्यासारखी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यावरून त्यांच्या निश्चित कल्पना कोणत्या होत्या, हे समजावून घेता येते.

पितृलोक म्हणजे अंतरिक्ष स्थान होय. स्वर्ग व पृथ्वी यांच्यातील अंतरिक्ष स्थानास पितृलोक म्हणतात. निरुक्तकार यास्कांनी दैवत कांडात पितृ ही देवता मानून त्यावर वरीलप्रमाणे विवेचन करून पितर हे अंतरिक्षातील देव आहेत, असे म्हटले आहे.

माध्यमिको यम इत्याहु:

तस्मात माध्यमिकान्पितृमन्यते

यावरून पितृलोक म्हणजे अंतरिक्ष, हे निश्चित होते. यम हा पितृलोकांचा अधिपती आहे, असे ऋग्वेदात म्हटले आहे व निरुक्तकारांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे.

द्युस्थ, अंतरिक्षस्थ आणि पृथ्वीस्थ, असे देवतांचे तीन वर्ग निरुक्तकार पाडतात. परंतु उपनिषदादि ग्रंथांत ही कल्पना स्वीकारलेली दिसत नाही. स्वर्ग, मृत्यू, मोक्ष अशी त्यांची विचारसरणी आहे, हे ध्यानात घेतल्याने पुढील विचार पटण्यासारखे वाटतात.

पितरांचे प्रकारपितरांचे तीन प्रकार आहेत. त्याबद्दल ऋग्वेदात खालील ऋचा आहे-उदीरतामवरउत्परास उन्मध्यमा: पितर: सोम्यास:असुं य ईयुरवृका ऋतज्ञा:, ते नोवन्तु पितरो हवेषु

याचा अर्थ असा - मुक्त कंठाने स्तवन करा. पितृगण सोमप्रिय आहेत. त्यापैकी काही खालच्या लोकांत, काही मध्यम लोकांत तर काही वरच्या लोकांत वास करीत असतात. ते सरल वृत्तीचे, धर्म जाणणारे व प्राणरूप आहेत. हविदान करणा-या आमचे ते रक्षण करोत.या मंत्रावरून अवर, मध्यम व पर अशा तीनही ठिकाणी पितर असतात, हे स्पष्ट होते. छांदोग्य उपनिषदात यांनाच पृथ्वीलोक, सूर्यलोक व ब्रह्मलोक असे म्हटले असून, ते त्या लोकी कसे जातात व परत येतात, याचे विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे.

तेथे पृथ्वी व चंद्रलोक यांमध्ये पितृलोक असल्याचे वर्णन आढळते- मासेभ्य: पितृलोकं पितृलोकात आकाशम

आकाशात च चंद्रमसमयावरून पितृलोकाची स्थानकल्पना निश्चित होऊ शकते. सूर्यलोक, चंद्र व पृथ्वी या तीनही स्थानी आपापल्या कर्माप्रमाणे जाणा-यांना सामान्यत: पितर असे ऋग्वेदात म्हटले आहे. या तिघांची गती कोणत्या कर्माने कोणत्या ठिकाणी होते, हे छांदोग्य उपनिषदातील उपरोक्त उद्धरणात वर्णिलेले आहे. जे लोक पृथ्वीवरच सारखे फिरत राहतात, त्यांना दीर्घकाल स्थिती कोठेच नसते. त्यांची कर्मेही हीन प्रतीची असतात. त्यामुळे पृथ्वीला पितृलोक म्हणणे यथार्थ होणार नाही. त्याच्या उलट ब्रह्मलोक किंवा सूर्यलोक ज्याला ऋग्वेदात पर असे म्हटले आहे तेथे गेलेले लोक पुनरावर्तित होत नसल्यामुळे त्याला पितृलोक हा शब्द लावणे योग्य होणार नाही. म्हणून मध्यम स्थानालाचपितृलोक  म्हणणे योग्य ठरते. स्वर्ग व पितृलोक यांमध्ये विशेष फरक नाही, हे यावरून दिसून येते. आपण नेहमी बोलताना पितृलोक, असा उल्लेख करतो. परंतु वरील विवेचनाद्वारे पितृलोक नेमका कोठे आहे, हे स्पष्ट होते.-संकलन : सुमंत अयाचित

टॅग्स :spiritualअध्यात्मिक