शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

परमात्मा झाला बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:35 IST

भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना.

- डॉ. रामचंद्र देखणेभागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. केवळ शास्त्रार्थाचा आणि तत्त्वचिंतनाचा उहापोह केला तरी भगवंताचे भावपूर्ण गुणगायन झाल्याखेरीज समाधान मिळणार नाही. हे नारदांंनी सांगितले आणि व्यासांनी भक्तिरसप्रधान, लालित्यपूर्ण भाषेतील रसाळ लीलादर्शी भागवत लिहिले. त्यात भगवंताच्या लीला असल्यामुळे त्याला आपोआपच नाट्यमयता लाभली. तेच भागवत संकीर्तनातून अधिक लोकाभिमुख झाले आणि त्याच लीला दशावतार, भारुड, गौळणी, नौटंकी, शैव नाटक, भरतनाट्यम्, वैष्णव नाटक, कीर्तनिया अशी रूपे घेऊन अविष्कृत होऊ लागले. त्यातूनच पुढे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या लोककला जन्माला आल्या.मराठी लोककलेचे हे स्वरूप पाहता किमान हजार ते बाराशे वर्षांची परंपरा या लोककलांना लाभली आहे. मूळ परंपरेचा बाज तसाच ठेवत कालमानाप्रमाणे त्यात बदल करीत या लोककलावंतांनी हजारो वर्षे लोकरंजन घडविले आहे. लोकधर्म जागविला आहे आणि प्रबोधनही केले आहे.मध्ययुगीन भक्त कवींनी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी आणि लोककलावंतांनी लोकदेवतेचे भक्तिरूप मांडण्यासाठी लोकछंदांचा, लोकगीतांचा, लोककथांचा, लोकपुराणांचा आणि लोकधारणांचा स्वीकार करून प्रयोगात्मक लोककलांचा प्रभावी वापर करून कथन-नाट्याची निर्मिती केली. अशा कथननाट्याचे मराठी भूमीतील अस्सल मराठमोळे रूप म्हणजे कीर्तनाचे आख्यान; हेच आख्यान जागरण-गोंधळीतील विधिनाट्याच्या रूपात या मातीच्या लोकरंगभूमीत रुजले.उत्तर पेशवाईतल्या तमाशात वगनाट्य नव्हते. सन १८६५ च्या सुमारास शाहीर ‘उमा-बाबू’ या मातंग समाजातील गुराखी पोराने विष्णुदास भाव्यांचे सांगलीतील नाटक पाहून असे कथानक तमाशात का नसावे, असा विचार करून ‘मोहना-बटाव’ हा पहिला वग लिहिला आणि त्यानंतर तमाशात ‘वग’ सादर होऊ लागला. पुढे तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात झाले.महाराष्ट्राच्या भूमीत विविध ठिकाणी या लोककला उदयास आल्या आणि महाराष्ट्रभर सादर होऊ लागल्या.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक