शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

परमात्मा झाला बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:35 IST

भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना.

- डॉ. रामचंद्र देखणेभागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. केवळ शास्त्रार्थाचा आणि तत्त्वचिंतनाचा उहापोह केला तरी भगवंताचे भावपूर्ण गुणगायन झाल्याखेरीज समाधान मिळणार नाही. हे नारदांंनी सांगितले आणि व्यासांनी भक्तिरसप्रधान, लालित्यपूर्ण भाषेतील रसाळ लीलादर्शी भागवत लिहिले. त्यात भगवंताच्या लीला असल्यामुळे त्याला आपोआपच नाट्यमयता लाभली. तेच भागवत संकीर्तनातून अधिक लोकाभिमुख झाले आणि त्याच लीला दशावतार, भारुड, गौळणी, नौटंकी, शैव नाटक, भरतनाट्यम्, वैष्णव नाटक, कीर्तनिया अशी रूपे घेऊन अविष्कृत होऊ लागले. त्यातूनच पुढे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या लोककला जन्माला आल्या.मराठी लोककलेचे हे स्वरूप पाहता किमान हजार ते बाराशे वर्षांची परंपरा या लोककलांना लाभली आहे. मूळ परंपरेचा बाज तसाच ठेवत कालमानाप्रमाणे त्यात बदल करीत या लोककलावंतांनी हजारो वर्षे लोकरंजन घडविले आहे. लोकधर्म जागविला आहे आणि प्रबोधनही केले आहे.मध्ययुगीन भक्त कवींनी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी आणि लोककलावंतांनी लोकदेवतेचे भक्तिरूप मांडण्यासाठी लोकछंदांचा, लोकगीतांचा, लोककथांचा, लोकपुराणांचा आणि लोकधारणांचा स्वीकार करून प्रयोगात्मक लोककलांचा प्रभावी वापर करून कथन-नाट्याची निर्मिती केली. अशा कथननाट्याचे मराठी भूमीतील अस्सल मराठमोळे रूप म्हणजे कीर्तनाचे आख्यान; हेच आख्यान जागरण-गोंधळीतील विधिनाट्याच्या रूपात या मातीच्या लोकरंगभूमीत रुजले.उत्तर पेशवाईतल्या तमाशात वगनाट्य नव्हते. सन १८६५ च्या सुमारास शाहीर ‘उमा-बाबू’ या मातंग समाजातील गुराखी पोराने विष्णुदास भाव्यांचे सांगलीतील नाटक पाहून असे कथानक तमाशात का नसावे, असा विचार करून ‘मोहना-बटाव’ हा पहिला वग लिहिला आणि त्यानंतर तमाशात ‘वग’ सादर होऊ लागला. पुढे तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात झाले.महाराष्ट्राच्या भूमीत विविध ठिकाणी या लोककला उदयास आल्या आणि महाराष्ट्रभर सादर होऊ लागल्या.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक