शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परमात्मा झाला बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:35 IST

भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना.

- डॉ. रामचंद्र देखणेभागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. केवळ शास्त्रार्थाचा आणि तत्त्वचिंतनाचा उहापोह केला तरी भगवंताचे भावपूर्ण गुणगायन झाल्याखेरीज समाधान मिळणार नाही. हे नारदांंनी सांगितले आणि व्यासांनी भक्तिरसप्रधान, लालित्यपूर्ण भाषेतील रसाळ लीलादर्शी भागवत लिहिले. त्यात भगवंताच्या लीला असल्यामुळे त्याला आपोआपच नाट्यमयता लाभली. तेच भागवत संकीर्तनातून अधिक लोकाभिमुख झाले आणि त्याच लीला दशावतार, भारुड, गौळणी, नौटंकी, शैव नाटक, भरतनाट्यम्, वैष्णव नाटक, कीर्तनिया अशी रूपे घेऊन अविष्कृत होऊ लागले. त्यातूनच पुढे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या लोककला जन्माला आल्या.मराठी लोककलेचे हे स्वरूप पाहता किमान हजार ते बाराशे वर्षांची परंपरा या लोककलांना लाभली आहे. मूळ परंपरेचा बाज तसाच ठेवत कालमानाप्रमाणे त्यात बदल करीत या लोककलावंतांनी हजारो वर्षे लोकरंजन घडविले आहे. लोकधर्म जागविला आहे आणि प्रबोधनही केले आहे.मध्ययुगीन भक्त कवींनी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी आणि लोककलावंतांनी लोकदेवतेचे भक्तिरूप मांडण्यासाठी लोकछंदांचा, लोकगीतांचा, लोककथांचा, लोकपुराणांचा आणि लोकधारणांचा स्वीकार करून प्रयोगात्मक लोककलांचा प्रभावी वापर करून कथन-नाट्याची निर्मिती केली. अशा कथननाट्याचे मराठी भूमीतील अस्सल मराठमोळे रूप म्हणजे कीर्तनाचे आख्यान; हेच आख्यान जागरण-गोंधळीतील विधिनाट्याच्या रूपात या मातीच्या लोकरंगभूमीत रुजले.उत्तर पेशवाईतल्या तमाशात वगनाट्य नव्हते. सन १८६५ च्या सुमारास शाहीर ‘उमा-बाबू’ या मातंग समाजातील गुराखी पोराने विष्णुदास भाव्यांचे सांगलीतील नाटक पाहून असे कथानक तमाशात का नसावे, असा विचार करून ‘मोहना-बटाव’ हा पहिला वग लिहिला आणि त्यानंतर तमाशात ‘वग’ सादर होऊ लागला. पुढे तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात झाले.महाराष्ट्राच्या भूमीत विविध ठिकाणी या लोककला उदयास आल्या आणि महाराष्ट्रभर सादर होऊ लागल्या.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक