शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

प्राहार  सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:09 IST

आपल्या हिंदु धर्मात एक बरे आहे. तुला पारायण करायचे तर तु ते कर.तुला प्रार्थना करायची तर तू ती कर. भजन कर,अभिषेक कर,तीर्थयात्रा कर असे तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करु शकता.

- सदगुरू श्री|वामनराव पै

ज्ञान हे आपल्या सुखाचे मूळ

आपल्या हिंदु धर्मात एक बरे आहे. तुला पारायण करायचे तर तु ते कर.तुला प्रार्थना करायची तर तू ती कर. भजन कर,अभिषेक कर,तीर्थयात्रा कर असे तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करु शकता. सांगायचा मुद्दा असा की भगवतगीता पाठ करण्यापेक्षा त्यातला एक श्लोक घ्या व त्याचा अर्थ नीट समजून घ्या.तसेच तो लोकांना देखील नीट समजून सांगा.धर्म म्हणजे उपासनेचा एक मार्ग.माझ्या धर्मात आलात तर तुम्ही पुण्यवान व तुमच्या धर्मातच राहिलात तर तम्ही पापी असे कशाला. असे कोणी सांगितले.कोणत्या देवाने येऊन लोकांना असे सांगितले? खरंतर असे सांगणारे मुर्ख व असे चुकीचे ऐकणारे देखील मुर्ख.मी तर नेहमी म्हणतो जग हे वेडयांचा बाजार आहे व या वेडयांच्या बाजारात लोकांना कसे सुख मिळणार.समजा घरात एक वेडा असेल तर घरातल्या लोकांना जगणे कठीण होते.मग जर जगात असे बहुसंख्य लोक वेडे असतील तर हे जग कसे सुखी होणार.जीवनविद्या काय सांगते, “तुम्ही सुखाने जगा  व इतरांना सुखाने जगू दया या धारणेला खरा धर्म असे म्हणतात.या धर्माचे पालन करायचे की अधर्माचे पालन करायचे हे आता तुझे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.सांगायचा मुद्दा असा, आपल्या दु:खाचे मूळ जे आहे ते अज्ञान आहे आणि ज्ञान हे आपल्या सुखाचे मूळ आहे.अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कितीही विज्ञानाची प्रगती केली तरी मानवजात सुखी होणे शक्य नाही.अनेक उपाययोजना केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही व होणार नाही.अज्ञान हे आपल्या दु:खाचे मूळ आहे ते मूळ काढून टाकत नाही तोपर्यंत सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे अशीच परिस्थिती असणार व तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच होत रहाणार.जगात देव सर्वत्र भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय होई शकेल पण जगात सर्वत्र दु:ख भरलेले आहे हे मात्र वादातीत आहे याचे कारण अखिल मानवजाती मध्ये अज्ञान भरलेले आहे व हे अज्ञानच मानवजातीच्या दु:खाला कारणीभूत आहे.आपण मानव जरी निरनिराळे असलो तरी माणूस म्हणून एकच आहोत ही वस्तुस्थिती आहे. धर्म,जात,पंथ,वेश,राष्ट्र या दृष्टीने आपण सगळे विभागले गेलेलो असलो तरी आपण एकच आहोत ही वस्तुस्थिती आहे.माणसांची ही अशी विभागणी झालेली असली तरी ती काल्पनिक आहे.हयाला वास्तवतेचा बेस नाही. ही काल्पनिक आहे.मी काय म्हणतो ते समजावून सांगतो. मूल जन्माला येते तेव्हा त्याला जात धर्म कुळ गोत्र असे काही नसते.त्याला या सर्व गोष्टी समाजातून चिकटवल्या जातात.मी  हयाला चिकटवणे म्हणतो. कारण त्याला त्याचा काहीच पत्ता नसतो.सांगायचा मुद्दा  असा की मानवजात ही विभागलेली गेलेली असून व ही विभागणी काल्पनिक आहे.