शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्राहार  सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:09 IST

आपल्या हिंदु धर्मात एक बरे आहे. तुला पारायण करायचे तर तु ते कर.तुला प्रार्थना करायची तर तू ती कर. भजन कर,अभिषेक कर,तीर्थयात्रा कर असे तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करु शकता.

- सदगुरू श्री|वामनराव पै

ज्ञान हे आपल्या सुखाचे मूळ

आपल्या हिंदु धर्मात एक बरे आहे. तुला पारायण करायचे तर तु ते कर.तुला प्रार्थना करायची तर तू ती कर. भजन कर,अभिषेक कर,तीर्थयात्रा कर असे तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करु शकता. सांगायचा मुद्दा असा की भगवतगीता पाठ करण्यापेक्षा त्यातला एक श्लोक घ्या व त्याचा अर्थ नीट समजून घ्या.तसेच तो लोकांना देखील नीट समजून सांगा.धर्म म्हणजे उपासनेचा एक मार्ग.माझ्या धर्मात आलात तर तुम्ही पुण्यवान व तुमच्या धर्मातच राहिलात तर तम्ही पापी असे कशाला. असे कोणी सांगितले.कोणत्या देवाने येऊन लोकांना असे सांगितले? खरंतर असे सांगणारे मुर्ख व असे चुकीचे ऐकणारे देखील मुर्ख.मी तर नेहमी म्हणतो जग हे वेडयांचा बाजार आहे व या वेडयांच्या बाजारात लोकांना कसे सुख मिळणार.समजा घरात एक वेडा असेल तर घरातल्या लोकांना जगणे कठीण होते.मग जर जगात असे बहुसंख्य लोक वेडे असतील तर हे जग कसे सुखी होणार.जीवनविद्या काय सांगते, “तुम्ही सुखाने जगा  व इतरांना सुखाने जगू दया या धारणेला खरा धर्म असे म्हणतात.या धर्माचे पालन करायचे की अधर्माचे पालन करायचे हे आता तुझे तू ठरव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.सांगायचा मुद्दा असा, आपल्या दु:खाचे मूळ जे आहे ते अज्ञान आहे आणि ज्ञान हे आपल्या सुखाचे मूळ आहे.अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कितीही विज्ञानाची प्रगती केली तरी मानवजात सुखी होणे शक्य नाही.अनेक उपाययोजना केल्या तरी त्याचा काही उपयोग होत नाही व होणार नाही.अज्ञान हे आपल्या दु:खाचे मूळ आहे ते मूळ काढून टाकत नाही तोपर्यंत सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे अशीच परिस्थिती असणार व तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणेच होत रहाणार.जगात देव सर्वत्र भरलेला आहे की नाही हा वादाचा विषय होई शकेल पण जगात सर्वत्र दु:ख भरलेले आहे हे मात्र वादातीत आहे याचे कारण अखिल मानवजाती मध्ये अज्ञान भरलेले आहे व हे अज्ञानच मानवजातीच्या दु:खाला कारणीभूत आहे.आपण मानव जरी निरनिराळे असलो तरी माणूस म्हणून एकच आहोत ही वस्तुस्थिती आहे. धर्म,जात,पंथ,वेश,राष्ट्र या दृष्टीने आपण सगळे विभागले गेलेलो असलो तरी आपण एकच आहोत ही वस्तुस्थिती आहे.माणसांची ही अशी विभागणी झालेली असली तरी ती काल्पनिक आहे.हयाला वास्तवतेचा बेस नाही. ही काल्पनिक आहे.मी काय म्हणतो ते समजावून सांगतो. मूल जन्माला येते तेव्हा त्याला जात धर्म कुळ गोत्र असे काही नसते.त्याला या सर्व गोष्टी समाजातून चिकटवल्या जातात.मी  हयाला चिकटवणे म्हणतो. कारण त्याला त्याचा काहीच पत्ता नसतो.सांगायचा मुद्दा  असा की मानवजात ही विभागलेली गेलेली असून व ही विभागणी काल्पनिक आहे.