शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पावलो पंढरी वैकुंठ भुवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:56 IST

आज सर्व वारकरी पंढरीत आलेले आहेत. तो आनंद काही वेगळाच आहे.

आज सर्व वारकरी पंढरीत आलेले आहेत. तो आनंद काही वेगळाच आहे. वाखरीतील सोहळा झाला की ओढ लागते ती म्हणजे विठूरायाची. पंढरीत प्रवेश करण्याचे कारण त्यासाठीच तर एवढा आटापिटा केला. रोज २५ -३० किलोमीटर चालून २०-२२ दिवसांचा प्रवास आटोपून कधी एकदा पंढरीत प्रवेश करून पांडुरंगाला भेटतो व चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकरायाचे दर्शन घेतो. या दर्शनाने कृतार्थ होतो, कारण त्या पुंडलिकानेच तर पांडुरंगाला पंढरीत उभे केले आहे. हा सर्व सोहळा नयनरम्य असतो. कारण ‘ज्ञानोबा - तुकोबांना पंढरीत नेण्यासाठी स्वत: पांडुरंग,नामदेव महाराज व पंढरपुरातील सर्व देवता व पंढरीतील प्रमुख पदाधिकारी वाखरीत येतात व त्यांचा सन्मान करून सोहळ्यात आलेले लाखो वारकरी पंढरपुरात दखल होतात. काही दिंड्या नवमीला, दशमीला व काही दिंड्या एकादशीला पंढरीत दाखल होतात. पंढरीत पोहोचल्याचा आनंद जगदगुरू तुकाराम महाराज वर्णन करतात,पावलो पंढरी वैकुं ठभुवन, धन्य आजी दिन सोनियाचा ॥धृ॥पावलो पंढरी आनंदे गजरी, वाजतील दुजे शंख भेरी ॥१॥पावलो पंढरी क्षेत्र आलिंगूनी संत या सज्जनी निववील ॥२॥पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला तो सखा पांडुरंग ॥३॥पावलो पंढरी आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे ॥४॥देवशयनी एकादशीचा प्रमुख विधी म्हणजे ‘चंद्रभागे स्नान, विधी तो हरीकथा, किंवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. नंतर प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा । त्यांच्या पुण्या नाही गणना ।। प्रदक्षिणा केली तरच वारी सफल होते. कदाचित पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तर ! झळझळीत सोनसळा कळस, दिसतो सोज्वळा ॥ बरवें बरवें पंढरपूर, विठोबारायाचें नगर ॥ माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचें ॥ कलशदर्शन झाले तरी विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखेच असते. इतका सोपा विधी, भजन कीर्तन प्रवचन ऐकणे हा सर्व कार्यक्रम एकादशी ते पोर्णिमेपर्यंत दररोज असतो. पंढरीतील सोहळा कसा असतो, याचे सुंदर वर्णन संत जनाबाई करतात,‘संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव ऊभा, जैसी समचरणांची शोभा,रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरीदास नाचत,सखा विरळा ज्ञानेश्वर,नामयाचा जो जिव्हार,ऐशा संता शरण जावे,जनी म्हणे त्या ध्यावे’ श्री संत जनाबार्इंनी केलेले वर्णन सार्थ आहे. कीर्तन,प्रवचन ही प्रबोधनाची प्रभावी साधने आहेत. विचाराची देवाण, घेवाण होते व तत्वज्ञानाची जाण निर्माण होतेअसा सोहळा. यावेळी जवळजवळ १५ लाखापेक्षाही जास्त भाविक पंढरीत दखल होताहेत. एक प्रकारे वारकऱ्यांचा कुंभमेळाच आहे.-अशोकानंद महाराज कर्डिले

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर