शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पावलो पंढरी वैकुंठ भुवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:56 IST

आज सर्व वारकरी पंढरीत आलेले आहेत. तो आनंद काही वेगळाच आहे.

आज सर्व वारकरी पंढरीत आलेले आहेत. तो आनंद काही वेगळाच आहे. वाखरीतील सोहळा झाला की ओढ लागते ती म्हणजे विठूरायाची. पंढरीत प्रवेश करण्याचे कारण त्यासाठीच तर एवढा आटापिटा केला. रोज २५ -३० किलोमीटर चालून २०-२२ दिवसांचा प्रवास आटोपून कधी एकदा पंढरीत प्रवेश करून पांडुरंगाला भेटतो व चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकरायाचे दर्शन घेतो. या दर्शनाने कृतार्थ होतो, कारण त्या पुंडलिकानेच तर पांडुरंगाला पंढरीत उभे केले आहे. हा सर्व सोहळा नयनरम्य असतो. कारण ‘ज्ञानोबा - तुकोबांना पंढरीत नेण्यासाठी स्वत: पांडुरंग,नामदेव महाराज व पंढरपुरातील सर्व देवता व पंढरीतील प्रमुख पदाधिकारी वाखरीत येतात व त्यांचा सन्मान करून सोहळ्यात आलेले लाखो वारकरी पंढरपुरात दखल होतात. काही दिंड्या नवमीला, दशमीला व काही दिंड्या एकादशीला पंढरीत दाखल होतात. पंढरीत पोहोचल्याचा आनंद जगदगुरू तुकाराम महाराज वर्णन करतात,पावलो पंढरी वैकुं ठभुवन, धन्य आजी दिन सोनियाचा ॥धृ॥पावलो पंढरी आनंदे गजरी, वाजतील दुजे शंख भेरी ॥१॥पावलो पंढरी क्षेत्र आलिंगूनी संत या सज्जनी निववील ॥२॥पावलो पंढरी पार नाही सुखा, भेटला तो सखा पांडुरंग ॥३॥पावलो पंढरी आपुले माहेर, नाही संसार तुका म्हणे ॥४॥देवशयनी एकादशीचा प्रमुख विधी म्हणजे ‘चंद्रभागे स्नान, विधी तो हरीकथा, किंवा पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे. नंतर प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा । त्यांच्या पुण्या नाही गणना ।। प्रदक्षिणा केली तरच वारी सफल होते. कदाचित पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तर ! झळझळीत सोनसळा कळस, दिसतो सोज्वळा ॥ बरवें बरवें पंढरपूर, विठोबारायाचें नगर ॥ माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचें ॥ कलशदर्शन झाले तरी विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखेच असते. इतका सोपा विधी, भजन कीर्तन प्रवचन ऐकणे हा सर्व कार्यक्रम एकादशी ते पोर्णिमेपर्यंत दररोज असतो. पंढरीतील सोहळा कसा असतो, याचे सुंदर वर्णन संत जनाबाई करतात,‘संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव ऊभा, जैसी समचरणांची शोभा,रंग भरे कीर्तनात, प्रेमे हरीदास नाचत,सखा विरळा ज्ञानेश्वर,नामयाचा जो जिव्हार,ऐशा संता शरण जावे,जनी म्हणे त्या ध्यावे’ श्री संत जनाबार्इंनी केलेले वर्णन सार्थ आहे. कीर्तन,प्रवचन ही प्रबोधनाची प्रभावी साधने आहेत. विचाराची देवाण, घेवाण होते व तत्वज्ञानाची जाण निर्माण होतेअसा सोहळा. यावेळी जवळजवळ १५ लाखापेक्षाही जास्त भाविक पंढरीत दखल होताहेत. एक प्रकारे वारकऱ्यांचा कुंभमेळाच आहे.-अशोकानंद महाराज कर्डिले

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर