शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:34 IST

आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

                     आवडीने भावे हरिनाम घेशी                       तूझी चिंता त्याशी सर्व आहे. 

मानवी आस्था भक्ती, नियमन आणि संयम याचा अनोखा मिलाप आपणास आषाढी आणि कार्तिकीस पहावयास मिळतो. अत्यंत निर्विकार पणे सर्व प्रापंचीक अडचणी बाजूस ठेऊन वारकरी मोठया श्रध्देने भूलोकीचा स्वर्ग असणाऱ्या पंढरपूरी विठ्ठल दर्शनास निघतात. मनाची शक्ती इतकी प्रबळ असते की स्वत:च्या जिवाची पर्वा न करता विविध व्याधीवर मात करत मार्गक्रमण करीत असतात. देह जावो अथवा राहो पांडूरंगी दृष्ठ भावो या संकल्पनेला साजेसे आचरण सर्वत्र पहावयास मिळते. गरीब-श्रीमंत, लहान-थोर हा विषय कूठेच दृष्टीपथात दिसत नाही, जनू कांही सर्व विश्व विठ्ठलमय झाल्याचे दिसते. एवढी उर्जा, स्वयंनियमन व निर्धार कोठून निर्माण होते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे. 

        वाहूनी प्रवाहात भक्तीच्या तूज्या         आज मी पावन झालो        नाही तूळशी माळा गळा तरी        विठ्ठला मी वारकरी झालो.

ज्या संपूर्ण जगताला आपल्या अतूट आंतरीक संबंधाने बांधून ठेवले त्याचे वर्णन शब्दात मावत नाहीच. खऱ्या अर्थाने सर्व जाती, धर्म, पंथाच्या पूढे जाऊन समाजातल्या सर्व घटकाला ‘यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर’ असे आवाहन करणाऱ्या मानवधर्मीय वारकऱ्यांची परंपरा खरोखरच मानवाला सूख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखऊन जातात. पंढरीची वारी ही भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच आहे असे बहूतांना वाटते.

पंढरीची वारी आणि वारकरी यांच्या आचरणात तत्वज्ञानाचे प्रयोजन आणि आदर्श जीवनप्रणाली निर्माण करु शकत़े नीति मूल्यांची जपणूक करणारी प्रणाली बनावी असे अभिप्रेत आहे. तत्वज्ञानाचा मूख्य गाभा हा शास्त्रानिष्ठ आणि आत्मनिष्ठ या दोन्हींचा समन्वय आहे. महाराष्ट्राच्या जडण घडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भक्तीच्या माध्यमातून सोपी वाट सामान्य जनतेच्या, स्त्रियांच्या, उपेक्षिताच्या अंतकरणात निर्माण करण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. आपण सर्व समान आहोत असा आत्मविश्वास सर्वामध्ये निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून झाले आहे व होत आहे. याचा परिणाम असा झाला की ही समाजातील भेदाभेद नाहीसा होण्यास चालना मिळाली. मराठी मनांवर निरंतर अधिराज्य गाजविणाऱ्या या दैवताचे निर्देश श्रृतिस्मृती पूराणांनी केलेले नाहीत. विठ्ठल हा संताच्या भावकोशात विष्णूकृष्णरुप मानला गेला असून तो सहस्त्राआगळा आहे. त्यामूळेच या वारकरी संप्रदायात समानतेच्या तत्वावर विठ्ठलाच्या भक्तीत भागवत धर्माच्या पताकेखाली सर्व भक्त समान आहेत. भक्तीच्या माध्यमातून सामान्य जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या संप्रदायाने केले आहे. 

(लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीspiritualअध्यात्मिक