शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पंढरीची वारी म्हणजे भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:34 IST

आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

                     आवडीने भावे हरिनाम घेशी                       तूझी चिंता त्याशी सर्व आहे. 

मानवी आस्था भक्ती, नियमन आणि संयम याचा अनोखा मिलाप आपणास आषाढी आणि कार्तिकीस पहावयास मिळतो. अत्यंत निर्विकार पणे सर्व प्रापंचीक अडचणी बाजूस ठेऊन वारकरी मोठया श्रध्देने भूलोकीचा स्वर्ग असणाऱ्या पंढरपूरी विठ्ठल दर्शनास निघतात. मनाची शक्ती इतकी प्रबळ असते की स्वत:च्या जिवाची पर्वा न करता विविध व्याधीवर मात करत मार्गक्रमण करीत असतात. देह जावो अथवा राहो पांडूरंगी दृष्ठ भावो या संकल्पनेला साजेसे आचरण सर्वत्र पहावयास मिळते. गरीब-श्रीमंत, लहान-थोर हा विषय कूठेच दृष्टीपथात दिसत नाही, जनू कांही सर्व विश्व विठ्ठलमय झाल्याचे दिसते. एवढी उर्जा, स्वयंनियमन व निर्धार कोठून निर्माण होते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे. आपल्या सर्व प्रापंचीक अडचणीचे ओझे त्या विठ्ठलरुपी ईश्वराच्या स्वाधीन करुन इहलोकीच्या स्वर्गाकडे प्रयाण करणे आणि अशा सोहळयाचे रुप दृष्टीक्षेपात येणे हे भाग्यच आहे. 

        वाहूनी प्रवाहात भक्तीच्या तूज्या         आज मी पावन झालो        नाही तूळशी माळा गळा तरी        विठ्ठला मी वारकरी झालो.

ज्या संपूर्ण जगताला आपल्या अतूट आंतरीक संबंधाने बांधून ठेवले त्याचे वर्णन शब्दात मावत नाहीच. खऱ्या अर्थाने सर्व जाती, धर्म, पंथाच्या पूढे जाऊन समाजातल्या सर्व घटकाला ‘यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर’ असे आवाहन करणाऱ्या मानवधर्मीय वारकऱ्यांची परंपरा खरोखरच मानवाला सूख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखऊन जातात. पंढरीची वारी ही भागवत धर्मियांचे महाप्रचंड संमेलनच आहे असे बहूतांना वाटते.

पंढरीची वारी आणि वारकरी यांच्या आचरणात तत्वज्ञानाचे प्रयोजन आणि आदर्श जीवनप्रणाली निर्माण करु शकत़े नीति मूल्यांची जपणूक करणारी प्रणाली बनावी असे अभिप्रेत आहे. तत्वज्ञानाचा मूख्य गाभा हा शास्त्रानिष्ठ आणि आत्मनिष्ठ या दोन्हींचा समन्वय आहे. महाराष्ट्राच्या जडण घडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भक्तीच्या माध्यमातून सोपी वाट सामान्य जनतेच्या, स्त्रियांच्या, उपेक्षिताच्या अंतकरणात निर्माण करण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने केले आहे. आपण सर्व समान आहोत असा आत्मविश्वास सर्वामध्ये निर्माण करण्याचे कार्य या माध्यमातून झाले आहे व होत आहे. याचा परिणाम असा झाला की ही समाजातील भेदाभेद नाहीसा होण्यास चालना मिळाली. मराठी मनांवर निरंतर अधिराज्य गाजविणाऱ्या या दैवताचे निर्देश श्रृतिस्मृती पूराणांनी केलेले नाहीत. विठ्ठल हा संताच्या भावकोशात विष्णूकृष्णरुप मानला गेला असून तो सहस्त्राआगळा आहे. त्यामूळेच या वारकरी संप्रदायात समानतेच्या तत्वावर विठ्ठलाच्या भक्तीत भागवत धर्माच्या पताकेखाली सर्व भक्त समान आहेत. भक्तीच्या माध्यमातून सामान्य जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य या संप्रदायाने केले आहे. 

(लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकPandharpur Wariपंढरपूर वारीspiritualअध्यात्मिक