शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
2
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
3
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
4
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
5
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
6
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
7
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
8
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
9
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
10
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
11
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
12
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
13
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
14
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
15
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
16
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
17
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
18
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
19
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
20
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस

आपुलिया हिता जो असे जागता...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 10:45 IST

आपल्या जीवनाला जर सुरक्षित व व्यवस्थित टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टीची मर्यादा, काही गोष्टी चे नियम शिस्त बंधन पाळणे गरजेचे आहे.  

आपले कल्याण आपल्या हाती  आहे. मानवी जीवनामध्ये हे सर्व काही पुन्हा मिळवता येईल. परंतु मानवी जीवन पुन्हा मिळवू  शकत नाही म्हणून सर्वार्थाने सर्वात मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ते आपले मानवी जीवन आहे.   आपल्या जीवनाला जर सुरक्षित व व्यवस्थित टिकवून ठेवायचे असेल तर काही गोष्टीची मर्यादा, काही गोष्टी चे नियम शिस्त बंधन पाळणे गरजेचे आहे.  आज सर्व जगाला कोरोना या महाभयंकर रोगाने ग्रासले आहे.याचे कारणच मुळी माणसाचे बदलली मनस्थिती व खान पान परिस्थिती बदलली आहे. ती सुधारण्यासाठीआपल्या भारतीय संस्कृतीने पूर्वापार चालत आलेल्या  यम, नियम, योग, प्रत्याहार समाधी या सगळ्या  अष्टांग योग गोष्टीचा अंगीकार केलेला आहे. असे आपणास पहावयास मिळतो. आज स्थिती अशी निर्माण झाली आहे की, जो कोणी याचा अंगीकार करणार नाही तो नेस्तनाबूत होणार. म्हणूनच आज  आपले स्वहित कशामध्ये आहे ते जाणण्याची गरज निर्माण झाली आहे. नाहीतर माणसाचे जीवन संपुष्टात येण्याची वेळ येऊन ठेपलेली  आहे.संत तुकाराम या अनुषंगाने म्हणतात

आपुलिया होता जो असे जागता ।धन्य माता पिता जयाचिया।

आपले हिट क्षमध्ये आहे हे ज्यांना कळले त्यांचे आईबाप धन्य आहेत. त्यांची मुलं जबाबदार आहेत समजदार आहेत. नाहीतर सर्व कुळाचाही नाश होऊ शकतो. अशी परिस्थिती आज एक कोरोना विषाणू ने माणसावर आणली आहे.माणसाने आपल्याला, आपल्या जीवनाला सुरक्षित करण्यासाठी आपण संतांचा विचार अंगीकारावा. जेणेकरून आपले जीवन हे अधिक मौल्यवान होईल. नाहीतर सर्वकाही संपून जाईल. संत तुकाराम महाराज म्हणतात जग हे दिल्या घेतल्याचे आहे- जन हे दिल्या घेतल्याचे। अंत काळाचे कुणी नाही ।। म्हणून अनंत काळाचे मित्र कोणीही नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

 आपली आपण करा सोडवन संसार बंधन सोडा वेगीं।

असे ज्ञानोबा माऊली सांगतात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये हा संतांचा विचारा संसाराला आधिक सुखी करण्यासाठी समाधानी करण्यासाठी शांततेने जगण्यासाठी अधिक उपयुक्त  आहे. म्हणून सर्वांनी हे जग सुंदर करण्यासाठी आपल्या वागण्याची, बोलण्याची, रहाण्याची, खाण्याची, पिण्याची तऱ्हा, पद्धती बदलणे आवश्यक आहे. नाहीतर मग यम, नियम,आहार, प्रत्याहार,  समाधी  या मुनी पतंजली यांच्या अष्टांग योगाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे .संतांच्या मते 

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।

असा जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी माणसाने काळजीपूर्वक वागावे।आपली काळजी जे लोक जीव धोक्यात घालून घेत आहेत. त्यांची काळजी कमी करण्यासाठी आपण घरीच राहून देशहितासाठी नियम पाळणे आवश्यक आहे.  ह.भ.प.डॉ. हरिदास महाराज आखरेशेगावमो.७५८८५६६४००

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक