शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

विकारावर मात करून आत्मज्ञानातूनच लाभेल शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 16:59 IST

आत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..!

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

आजच्या युगात आपण क्रांतीची भाषा सतत बोलत असतो पण शांतीतून देखील क्रांती निर्माण होते. संतांनी शांतीतून क्रांती केली. खलाची दुष्ट प्रवृत्ती बदलण्यासाठी कुठल्याही संतांनी हातात शस्त्र घेतले नाही. शांती याच जीवन मूल्याचा विचार त्यांनी आचारसिद्ध केला. आज सुधारलेल्या जगात बिघडलेला माणूस बघतांना या दैवी संपत्तीचा गुण आचरणात आणण्याची नितांत गरज आहे. आपल्याला सुख हवे ना..? तर मग चित्ताची शांती ढळता कामा नये. कारण अशांतस्य कुत: सुखम्.!अशांत माणसाला सुख लाभत नाही. आपल्या मनांत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार, हिंसा, भीती इ. विकार निर्माण झाले की माणूस अशांत होतो. या सर्व विकारांचा त्याग करता आला की शांती आपोआप प्राप्त होते.  त्यागात् शांती निरंतरम.! भोगात मिळणारा आनंद क्षणिक असतो. त्यागातून मिळणारा आनंद शाश्वत असतो म्हणून संयमाने आणि विवेकाने आपल्या मनाला हळूहळू शांतीच्या मार्गावर आणता येते. संत विनोबा भावे म्हणाले -राग द्वेष परी जाता आली हातात इंद्रियेस्वामित्वे विषयी वर्ते त्यास लाभे प्रसन्नताप्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसेचित्ताची शांती ढळू न देता परमेश्वर चरणी अखंड प्रेम ठेवल्याने हे विकार बाधत नाहीत. नसत्या विकारांच्या आहारी गेल्यावर जीवाची केवढी दुर्दशा होते याचे वर्णन माऊली करतात - तरी हे कामु क्रोधु पाहीजया कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठायीमानिजे ती साध्वी शांती नागविलीमग माया मांगिन श्रृंगारली,तिये करवी विटाळविली साधु वृंदेइही संतोष वन खांडीलेधैर्य दुर्ग पाडिलेआनंद रोप सांडिले उघडोनियामनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या दैवी संपत्तीवरच त्याची उंची ठरत असते. आपण समाजात कसे वागतो त्यावरच समाजात आपले स्थान ठरत असते. म्हणून जीवनात शांती तत्वांचा अंगिकार करावा. तथागत गौतम बुद्धांनी आयुष्यभर शांतीचा संदेश दिला. अशी शांती येण्याकरता आत्मज्ञान प्राप्त करावे लागेल. गीता माऊली म्हणते -ज्ञानं लब्ध्वा परां शांती..!आत्मज्ञानानेच परम शांतीपर्यंत पोहोचता येते..!(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक