शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मत्सराचा उगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 05:09 IST

मत्सर हा एक मानसिक आजार असू शकतो. चंचल वृत्ती, अपयशी वृत्ती, द्वेष करणारी वृत्ती मनामध्ये शिरली की आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तीचा झालेला विकास त्याला त्रासदायक वाटतो.

- विजयराज बोधनकरमत्सर हा एक मानसिक आजार असू शकतो. चंचल वृत्ती, अपयशी वृत्ती, द्वेष करणारी वृत्ती मनामध्ये शिरली की आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तीचा झालेला विकास त्याला त्रासदायक वाटतो. जे मला जमलं नाही हे याला जमलंच कसं? हा अडचणीचा प्रश्न मनात निर्माण करून माणूस स्वत:च स्वत:ला त्रास देत सुटतो. मत्सरी माणसांच्या चेहऱ्यावर कधीही तेज न दिसण्याचं कारण म्हणजे त्याच्या विचारक्षमतेशी तुटलेला संबंध... सात्त्विक विचार हा मानवाचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास कारणीभूत ठरतो. त्याउलट सतत नकारार्थी विचार करणारी माणसं आरोग्याच्या बाबतीत दुर्दैवी ठरतात. भ्रष्ट विचारसरणीमुळे ऊर्जेचा अयोग्य वापर होतो आणि शरीर थकत राहतं, याची शरीराला हळूहळू सवय लागते. त्यातून शारीरिक आजार डोकं काढू पाहतात. हजारो वर्षांपासून संत-महात्म्यांनी त्यामुळेच देवाची गाठ मारून दिली. देवाच्या भयाने तरी माणसं सुदृढ आणि उत्क्रांती घडविचारी विचारांची सवय लावून घेतील. पण त्या देवानेसुद्धा मानवी वृत्तीपुढे हात टेकले.देवाला बाजारू रूप कुणी आणलं? देवाला मानवाकडून काहीही नको. त्याला हवा आहे मानवाच्या उत्तम जगण्याचा सुंदर मार्ग. मग देवळात जाऊनही हजारो माणसं दोषग्रस्त का आहेत? माणसाने उत्तम कसं जगावं हे फक्त एकच विद्यालय शिकवू शकतं ते म्हणजे स्वत:च्या मनाचं विद्यालय.पूजा-अर्चा केल्यामुळे दिवसाची सुरुवात निर्मळ कार्याने होईल आणि माणूस आपल्या व्यवहारी जीवनात देवासारखा जगण्याचा प्रयत्न करेल. केवळ हा विचार पूजेअर्चेच्या मागे असण्याचे कारण आहे. मंदिर याचा अर्थ काय तर मनाला धीर देणारं मन.. मन धीर देणारं असलं की षड्रिपूच्या आक्रमणापासून माणूस आपला बचाव करू शकतो. उत्कृष्ट कर्माशिवाय देवसुद्धा आशीर्वाद देऊ शकत नाही.