शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

हे मानवा, स्वत:ला ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:19 IST

जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्नाचे समाधान झाले नाही. सुरुवातीपासून अनेक संत महात्मे या विश्वात आले. त्यांनी मानवाला आत्मज्ञान दिले.

ठळक मुद्देगुरू जातपात व धर्म याचा भेदभाव करीत नाहीसर्व समाज वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसप्रमाणे

जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्नाचे समाधान झाले नाही. सुरुवातीपासून अनेक संत महात्मे या विश्वात आले. त्यांनी मानवाला आत्मज्ञान दिले.आत्मा म्हणजे काय आणि आत्म्याचा परमात्म्याशी काय संबंध आहे? या प्रश्नाचे उत्तर आत्मज्ञान. ज्याचा अनुभव आपण अंतर्मुख होऊनच करू शकतो. सर्व संत महात्म्यांनी यास पराविद्या असे म्हटले आहे. या व्यतिरिक्त बाह्य साधनेस उदाहरणार्थ जप, तप, पूजापाठ, होम-हवन, दान आणि तीर्थयात्रा इत्यादींना अपराविद्या असे म्हटले आहे. या सर्वांचा आपल्या शरीराशी संबंध आहे, आत्म्याशी नाही. संतमतानुसार पराविद्या ही पण इतर वैज्ञानिक प्रयोगावर आधारित अशी असून प्रत्यक्ष फलदायी आहे. याचा अनुभव विद्यमान पूर्ण सद्गुरूंना शरण गेल्यावरच मिळतो. आपण हिंदू असो की मुसलमान असो, शिख असो वा इसाई अशा धर्माशी पराविद्येचा काहीही संबंध नाही. गुरू जातपात व धर्म याचा भेदभाव करीत नाही. त्यांच्या दृष्टीतून सर्व समाज वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसप्रमाणे आहेत.जसे शाळा कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणवेश आणि बिल्ले असतात परंतु त्यांची शिकवण मात्र एकच असते तसेच समाजामध्ये आपापले चिन्ह चक्र आहेत परंतु सर्वांचे ध्येय एकच आहे. या जगात मानव देह सर्वश्रेष्ठ आहे. सर्व महात्म्यांनी म्हटले आहे की आपण सर्व मानव आहोत. आपण कोणत्याही जाती, धर्म, पंथ, समाज किंवा देशाशी संबंधित असलो तरी आपण त्या परमेश्वराची लेकरे आहोत. एकमेकांचे बहीण-भाऊ आहोत. शारीरिक व बौद्धिकदृष्ट्या मानव मोठा झालाय, परंतु शरीर आणि मन या दोघांना चालणारी जी शक्ती आहे त्या आत्म्याविषयी आपण काहीच जाणत नाही. मन आणि इंद्रिये या पलिकडील देहातीत भावनेवर जाऊन स्वाध्यायाने स्वत:ला जाणणे, त्याची अनुभूती घेणे, निजरूपाचे दर्शन घेणे यालाच आत्मानुभूती म्हणतात. ज्या परमात्म्याने ही सृष्टीची निर्मिती केली, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याची आपण पूजा करतो त्याला पाहिले आहे का? आपण त्याच्याशी बोलू शकतो का? या सर्व प्रश्नाची उत्तरे विद्यमान गुरू देतात.आपण देहातीत भावनेवर जाऊन मानव रूपात प्रकट असलेल्या परमपित्याला पाहू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो. या विद्येला जिवंतपणी मृत्यूचा अनुभव देणारी कला असे म्हणतात. अशी अनुभूती ही काही आश्चर्याची बाब नसून ही तर नैसर्गिक नियमानुसार आहे.संतमतानुसार कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी एक सहज नियम असतो, एक आदर्श असतो आणि एक विधीही असते. सफलतेसाठी आपल्या प्रयत्नांनी लक्ष केंद्रित करून आपण त्यास पारखू शकतो. हीच बाब अध्यात्मिक क्षेत्रात लागू होते. सर्व धर्म ग्रंथांचा लक्षपूर्वक आपण अभ्यास केल्यास हेच तत्त्व सर्व धर्मात आहे हे समजते. यासाठी धर्मग्रंथांचे वर वाचन, कथा-कीर्तने हे पर्याप्त नाही. ज्या मार्गाने महापुरुष तेथे पोहोचले आहेत तिथपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. महापुरुषांनी आपले अनुभव धर्मग्रंथात लिहून ठेवले आहेत. कारण असे की जो एक माणूस करू शकतो ते दुसराही करू शकतो जेव्हा त्याला योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले तरच.अध्यात्मिक मार्गात प्रगतीसाठी माणसाला प्रथम खरा माणूस व्हावे लागेल. नंतर परमात्म प्राप्ती कठीण नाही. खरा मनुष्य होण्यासाठी पूर्ण गुरूंचा सत्संग लाभला पाहिजे. असे गुरूशाळेसारखे असतात. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर कळते की आपण शरीर नसून आपण देहधारी आत्मा आहोत. आत्मा परमात्म्याचा अंश असून शरीर चालवणारी शक्ती आहे. हा आत्मा मायेच्या जगात आपले मूळ स्वरूप विसरला आहे. परंतु याचा बोध पूर्ण गुरूंना शरण जाऊन दीक्षा घेतल्यावर होतो. ते आत्मज्ञान अनुभूतीसह देतात. मी कोण आहे, मी कुठून आलो यासारख्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज मिळते. जन्म मरणाच्या आवागमन चक्रातून आपण मुक्त होतो. स्वत:ला जाणणे व परमात्म प्राप्ती करणे हे मनुष्य जीवनाचे ध्येय या जन्मीचे पूर्ण करू शकतो.

परम संत कृपाल सिंह जी महाराज

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnagpurनागपूर