शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

श्रेष्ठ मूल्यांचे कर्माचरण, हेच परमेश्वराचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 13:47 IST

प्रत्येकाला प्राप्त झालेले जीवन अतिशय मर्यादित आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून प्राप्त झालेल्या मर्यादीत आयुष्याचा उपयोग विधायक पध्दतीने होणे आवश्यक आहे. जीवनात निकोप दृष्टीकोण वर्धिष्णु व्हावा हा विचार करायला हवा. संत प्रबोधन करतांना वारंवार सांगतात. ‘घटका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश ...

प्रत्येकाला प्राप्त झालेले जीवन अतिशय मर्यादित आहे. कोणत्या वेळी काय होईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून प्राप्त झालेल्या मर्यादीत आयुष्याचा उपयोग विधायक पध्दतीने होणे आवश्यक आहे. जीवनात निकोप दृष्टीकोण वर्धिष्णु व्हावा हा विचार करायला हवा. संत प्रबोधन करतांना वारंवार सांगतात. ‘घटका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो, राम काटे म्हणाना’ प्रत्येक क्षण गतीने पुढे जात आहे. जीवनातील काळही कमी होत आहे. वेळेचे महत्व जाणून सत्कार्याला लागणे आवश्यक आहे. श्रींच्या मंदिरात गेल्यावर त्याच्यापुढे विनम्र होवून, सर्व भावे शरण जाण आणि मग त्याला प्रपंचातील विविध समस्या मिटाव्यात म्हणून काहीतरी मागणी करणे ही मानवी मनाची दुर्बलताच आहे. दु:ख बांदवडी अशा संसारात वारंवार दु:खाची अनुभूति होते. अशावेळी दु:ख पेलण्याचे सामर्थ्य देणारे विश्वप्रभु आहेत. त्या प्रभुचे भावपूर्वक ध्यान, चिंतन मनन करणे आणि सामाजिक जीवनात सदाचारण करणे हेच खरे ईश्वराचे पूजन आहे. मनातील स्वार्थी लोभी विचार नष्ट झाल्याशिवाय विश्वनियंता दर्शन देत नाही हे संतांनी वारंवार प्रगट केले आहे.

थोरपण पºहा सांडीजे, न्युलत्ती लाघवी विसरीजेजै जगा धाकुटी होई जे, तै जवळीक माझी.ह्या ज्ञानेश्वर माऊलीच्या उक्तिनुसार लौकिक दृष्ट्या अती नम्र आणि रिक्त होवून प्रभुजवळ गेले पाहिजे. अयोध्येतील मंत्री सुमंत ह्याच पध्दतीने श्रीरामाजवळ गेले. राम भेटीला जातांना सात प्रकारचे दरवाजे त्यांनी ओलांडले, तेव्हा श्रीरामाची भेट झाली. पहिल्या दरवाज्यात सुमंताने रथ सोडला. दुसऱ्या दरवाजात सोबत नेलेली छत्रचामरे सोडली. तिसºया दरवाज्यात पादत्राणे, चौथ्या दरवाज्यात अर्थ, पाचव्या दरवाज्यात स्वार्थ, सहाव्या दरवाज्यात ‘मी तू अहंभावाचा त्याग तेव्हाची भेट श्रीराम, मुख्य परमार्थ ह्या नाव. मी पण टाकल्याशिवाय ईश्वराची जवळीक होत नाही.अहंभाव गेला, तुका म्हणे देव झाला.जीवनाच्या सार्थकतेसाठी उत्साहाने सदाचारण करावे. सुंदर जीवन हे गुणात्मक दृष्ट्या अधिक फुलेल. सामाजिक जीवनात सद्विचाराचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा.‘सुख सगळ्यांचे ते सुख माझे, विवेक काही करता यावा, ते अवलोकन ते सावधपण, सदाचार हा सवयीचा व्हावा’ आपण व्यवहारी माणसे. पैशामागे प्रतिष्ठेमागे,प्रसिध्दीसाठी तोंडात फेस येईपर्यंत सारखे धावत असतो. एक धावतो म्हणून दुसरा धावतो. कोठे थांबावे याचा कोणी विचारच करत नाही. आणि शेवटी थकून गेला की मग ईश्वराचे स्मरण करतो. उशिरा सुचलेले ते शहाणपण असते. आज इमारतीची उंची वाढत चालली. परंतु माणसाची उंची कमी होत आहे. संतांचा विचार जोपासल्याशिवाय जीवनाचा मार्ग आनंददायी होणार नाही म्हणून संत म्हणतात.सदाचार हा थोर सांडू नयेतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो, श्रेष्ठतम जीवनमूल्य परमार्थाचा विचार आहे. संपूर्ण गीतार्थाचे सार असणारा श्लोक भगवान गोपालकृष्ण सांगतात हे अर्जुना! माझ्यासाठीच कर्म करणारा, मत्परायण आणि माझाच भक्त संपूर्णपणे आसक्ती रहित असतो. तो भक्त मला प्रिय असतो.

मत्कर्म कृन्मत परमो, मदभक्त: संगवर्जित:निर्वेर: सर्वभूतेषु य:से मामेति पांडवा।।- हभप डॉ.ज्ञानेश्वर मिरगे, शेगाव 

 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक