शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

नाममात्र कर्म आपुलियाच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:33 IST

वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

उत्कटतेतून उन्नतीकडे आणि सदाचारातून सद्गतीकडे मार्गक्रमण सहज शक्य आहे. माणसाच्या प्रगतीआड येणारे षडरिपू ईश्वरभक्तीने कमी केले जाऊ शकतात. दांभिकपणा कमी करुन वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते. स्वत:मधील न्यूनगंड कमी करुन ओळख निर्माण केली जाऊ शकते ग.दि. माडगूळकर यांनी याचे वर्णन अत्यंत बोलक्या शब्दात केले आहे, एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक स्वत:च्या मर्यादा लक्षात घेऊन कामास सुरुवात केली़ तर निराशा हाती येत नाही. प्रत्येकात बहूतांश चांगले तर काही प्रमाणात अवगूण असतात. ईश्वरभक्तीने अवगूण कमी होऊन सदगूणात वाढ होते हे नव्याने सांगणे नको. ममत्व आणि समत्व गूणांची वाढ झाल्यास सूखी समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही. निर्जीव वस्तूत देखील सजीवांच्या प्रतिकृतींची अनूभूती घेणे हे आपले संस्कार आहेत यालाच श्रद्धा असे म्हटले जाते. तूच कर्ता आणि करविता या विश्वासातून भगवंताला समर्पित होणारे आत्मीक सूख उपभोगताना दांभिकतेने केलेले काम हे केव्हाही आत्मसूख अथवा प्रगती साध्य करु देत नाही.

निष्काम कर्मभोग हा मानवाला प्रगतीकडे घेऊन जातो असे म्हटले जाते परंतू सद्यस्थितीत इच्छेखातर कार्य आणि कार्यांतुन निर्वाह असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामूळे इच्छेने फळ प्राप्त झाली नाही तर निराशेच्या प्रवृत्ती बळावत आहेत. त्यामूळे अल्प कालावधीत उत्तुंग व कोटीच्या कोटी उड्डाने मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्यामूळे आनंदाचा उपभोग घेण्याऐवजी दूखा:चे वातावरण निर्माण होते. त्यास्तव संताचा उपदेश अत्यंत योग्य असून ते सांगतात,करु नको खेद कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसेसर्व काही विधात्याच्या अधिन असले तरी नाममात्रे कर्म हे आपल्या हाती ठेवले आहे. निष्ठेने कर्म करणे म्हणजेच ईश्वरनिष्ठा होय. अगम्य ज्ञानाची प्रचीती घेऊन समाजाचे देणे फेडले जाऊ शकते परंतू तशी आंतरिक तळमळ आवश्यक आहे. विविध क्षेत्रात उत्तूंग शिखर गाठणारा आधूनिक कित्येक ज्ञानराज या समाजात वावरत आहेत. निष्ठेने केलेले कार्य हे देशकार्यच असून या मातेची सेवा केल्याचे समाधान यातून लाभते. आपणास बोध घेता येईल असे कित्येक महानुभव या भूमीत निर्माण झाले. त्यांचा वारसा चालविणे ही काळाची गरज आहे. भागवत धर्माची पताका उंच ठेवत सन्मागार्ने कार्य करणाऱ्याची गरज जास्त आहे. ईहलोकांचा प्रवास हा भौतिकवादास चिकटून न राहता विशेष कार्यास अर्पण करण्यासाठीचा आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

( लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक