शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नाममात्र कर्म आपुलियाच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:33 IST

वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

उत्कटतेतून उन्नतीकडे आणि सदाचारातून सद्गतीकडे मार्गक्रमण सहज शक्य आहे. माणसाच्या प्रगतीआड येणारे षडरिपू ईश्वरभक्तीने कमी केले जाऊ शकतात. दांभिकपणा कमी करुन वास्तवाचे भान ठेवत स्वत्वाची ओळख करुन घेतल्यास प्रगती साधली जाते. स्वत:मधील न्यूनगंड कमी करुन ओळख निर्माण केली जाऊ शकते ग.दि. माडगूळकर यांनी याचे वर्णन अत्यंत बोलक्या शब्दात केले आहे, एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले, पाण्यात पाहताना चोरुनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक स्वत:च्या मर्यादा लक्षात घेऊन कामास सुरुवात केली़ तर निराशा हाती येत नाही. प्रत्येकात बहूतांश चांगले तर काही प्रमाणात अवगूण असतात. ईश्वरभक्तीने अवगूण कमी होऊन सदगूणात वाढ होते हे नव्याने सांगणे नको. ममत्व आणि समत्व गूणांची वाढ झाल्यास सूखी समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही. निर्जीव वस्तूत देखील सजीवांच्या प्रतिकृतींची अनूभूती घेणे हे आपले संस्कार आहेत यालाच श्रद्धा असे म्हटले जाते. तूच कर्ता आणि करविता या विश्वासातून भगवंताला समर्पित होणारे आत्मीक सूख उपभोगताना दांभिकतेने केलेले काम हे केव्हाही आत्मसूख अथवा प्रगती साध्य करु देत नाही.

निष्काम कर्मभोग हा मानवाला प्रगतीकडे घेऊन जातो असे म्हटले जाते परंतू सद्यस्थितीत इच्छेखातर कार्य आणि कार्यांतुन निर्वाह असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामूळे इच्छेने फळ प्राप्त झाली नाही तर निराशेच्या प्रवृत्ती बळावत आहेत. त्यामूळे अल्प कालावधीत उत्तुंग व कोटीच्या कोटी उड्डाने मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. त्यामूळे आनंदाचा उपभोग घेण्याऐवजी दूखा:चे वातावरण निर्माण होते. त्यास्तव संताचा उपदेश अत्यंत योग्य असून ते सांगतात,करु नको खेद कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसेसर्व काही विधात्याच्या अधिन असले तरी नाममात्रे कर्म हे आपल्या हाती ठेवले आहे. निष्ठेने कर्म करणे म्हणजेच ईश्वरनिष्ठा होय. अगम्य ज्ञानाची प्रचीती घेऊन समाजाचे देणे फेडले जाऊ शकते परंतू तशी आंतरिक तळमळ आवश्यक आहे. विविध क्षेत्रात उत्तूंग शिखर गाठणारा आधूनिक कित्येक ज्ञानराज या समाजात वावरत आहेत. निष्ठेने केलेले कार्य हे देशकार्यच असून या मातेची सेवा केल्याचे समाधान यातून लाभते. आपणास बोध घेता येईल असे कित्येक महानुभव या भूमीत निर्माण झाले. त्यांचा वारसा चालविणे ही काळाची गरज आहे. भागवत धर्माची पताका उंच ठेवत सन्मागार्ने कार्य करणाऱ्याची गरज जास्त आहे. ईहलोकांचा प्रवास हा भौतिकवादास चिकटून न राहता विशेष कार्यास अर्पण करण्यासाठीचा आहे. निसर्ग, प्राणी, पक्षी याचे हे उत्तम उदाहरण आहे.

( लेखक हे लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक