शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मन वढाय-वढाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:58 IST

विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथराजात मनाच्या रंग-रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘वाऱ्याने ढग आणले जातात व वाºयानेच दूर नेले जातात.

विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथराजात मनाच्या रंग-रूपाचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘वाऱ्याने ढग आणले जातात व वाºयानेच दूर नेले जातात. तसेच बंधन वा मुक्ती मनानेच कल्पिली जाते. तम व रजाच्या बंधनामुळे मन मलिन होऊन बंधाला कारण होते आणि मनातून तम नाहीसा झाला म्हणजे मन सत्त्वगुणी होऊन मुक्तीला कारण होते.’ खरंच, मन जेव्हा उच्च विचारांच्या पातळीवरून भरारी घेऊ लागते तेव्हा गगनाला गवसणी घालते. मन नावाचा पक्षीराज जेव्हा उंच-उंच गगने आक्रमणू लागतो तेव्हा वासना-विकारांचा शूद्र पसारा आपोआपच ठेंगणा होऊ लागतो. उलट या पक्षीराजाला जर वासना-विकारांच्या पिंजºयात कोंडून ठेवले तर आकाशी झेप घेण्याची शक्तीच तो हरवून बसतो. मनाच्या रंग-रूपाचा ठाव संसाराचा परित्याग करणाºया संत-महंतांनाही लागला नाही.

मनच प्रतिमा स्थापन करते अन् मनच ती प्रतिमा मोडून टाकते. एका बाजूला मन एवढे चंचल आहे की, वाहणाºया वाºयाची मोट वा गाठोडे बांधता येईल, पण मनाला स्थिर करणे अवघड आहे. तरण्याबांड खोंडाला हिरव्यागार कुरणासमोर बांधावे अन् गवताला तोंड लावायचे नाही, असा दम भरवावा तसेच मनाच्या खोंडाचे आज झाले आहे. साधकाच्या भोवतीने भौतिक विश्वातील विषय विकारांचे हिरवे-हिरवे गार गालीचे अंथरले जात आहेत, अन् साधक मात्र यापासून अलिप्त असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्तकेली जात आहे. ज्याचे वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात,

मन वढाय-वढायउभ्या पिकातलं ढोरकिती हाकला ऽ हाकला ऽपुन्हा येतं पिकावर।।- प्रा. शिवाजीराव भुकेले