शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

चुकांबद्दल मध्यम मार्ग; ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:54 IST

‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या व्यक्तीची हानीच होते.

- श्री श्री रविशंकर

‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या व्यक्तीची हानीच होते.  एकामध्ये अस्वीकार आहे, तर दुसऱ्यात अपराध भावात अडकून राहतो आणि आपल्या चुकांबद्दल लाज वाटत राहते. इतके की, त्यामुळे आजार ओढवून घेतो म्हणून या दोन्हीच्या मधला मध्यम मार्ग अनुसरायला हवा. जेव्हा तुम्ही चूक केली असेल, तेव्हा त्याबद्दल वारंवार पश्चाताप व्यक्त करीत बसू नका आणि दु:खी होऊ नका. मग त्याच वेळी तुम्ही चूक केलीय हे नाकारू नका. इथे मध्यम मार्ग हाच आहे की, आपण चूक केली आहे आणि त्यापासून कधीतरी बोध घेतला आहे, याची जाणीव असू द्या आणि आपली वाटचाल सुरू ठेवा. कोणीही मुद्दाम चूक करीत नाही. सजगता नसल्याने त्या घडतात एवढेच़ एकदा त्या सजगतेचा तुमच्या आत उदय झाला की, अज्ञानामुळेच तुमच्या हातून चूक झालीय, याची जाणीव स्वत:ला द्यावी. याबद्दल भान आल्याने तुम्ही त्या चुकातून बाहेर याल़, तसेच नेहमी दुस-यांच्या चुका दाखवून देणे आणि त्यांना त्याबद्दल दोषी असल्याचे जाणवून देणे हेसुद्धा योग्य नाही़ नंतर ते तुमच्यापासून अंतर राखू पाहतील़ ते तुम्हाला कधी काहीही सांगणार नाहीत़ किंवा तुमच्यासमोर व्यक्त होणार नाहीत़ असे होणे हे भविष्यात घातकही ठरू शकते़ तसे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी नेहमी दुसºयांना त्यांच्या चुकांबद्दल अपराधी वाटू न देता, त्या चुकांची जाणीव करून देणे हीसुद्धा एक कला आहे़ तुम्हाला हे खूप कौशल्याने करायचे आहे आणि त्यानंतर त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना प्रोत्साहित करा आणि म्हणा, ‘चला, जाऊ द्या़ काही हरकत नाही़ चुका होतात. मी हे विसरलोय. तुम्हीसुद्धा आता ते विसरून जा़’ कुणालाही अपराधी भावात अडकवून राहू देऊ नका किंवा त्यांना अपराध्या सारखे वाटू देऊ नका़ कुणा व्यक्तीला असे सतत अपराध्यासारखे वाटायला लावले, तर ती व्यक्ती परत अधिक चुकीची कृत्ये करीत राहील. त्याच्या हातून मोठी चूक होऊ शकते. तो आपला मार्ग कधीही सुधारणार नाही, म्हणून आपल्या मनाला यातून वाचविण्यासाठी प्रथम त्याला अपराधीपणाच्या किंवा पीडित भावापासून वाचवावे लागेल.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक