शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

चुकांबद्दल मध्यम मार्ग; ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 01:54 IST

‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या व्यक्तीची हानीच होते.

- श्री श्री रविशंकर

‘चुका’ होतच असतात, पण बहुदा आपण त्यासाठी पश्चाताप करू लागतो. ‘अरेरे, अशी कशी चूक केली मी!’ आणि त्याबद्दल अपराधी वाटू लागते किंवा ती चूक घडलीच नाही, असा आव आणतो आणि ती मुळी चूक नाहीच आहे, असे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो, पण या दोन्ही मार्गांनी त्या व्यक्तीची हानीच होते.  एकामध्ये अस्वीकार आहे, तर दुसऱ्यात अपराध भावात अडकून राहतो आणि आपल्या चुकांबद्दल लाज वाटत राहते. इतके की, त्यामुळे आजार ओढवून घेतो म्हणून या दोन्हीच्या मधला मध्यम मार्ग अनुसरायला हवा. जेव्हा तुम्ही चूक केली असेल, तेव्हा त्याबद्दल वारंवार पश्चाताप व्यक्त करीत बसू नका आणि दु:खी होऊ नका. मग त्याच वेळी तुम्ही चूक केलीय हे नाकारू नका. इथे मध्यम मार्ग हाच आहे की, आपण चूक केली आहे आणि त्यापासून कधीतरी बोध घेतला आहे, याची जाणीव असू द्या आणि आपली वाटचाल सुरू ठेवा. कोणीही मुद्दाम चूक करीत नाही. सजगता नसल्याने त्या घडतात एवढेच़ एकदा त्या सजगतेचा तुमच्या आत उदय झाला की, अज्ञानामुळेच तुमच्या हातून चूक झालीय, याची जाणीव स्वत:ला द्यावी. याबद्दल भान आल्याने तुम्ही त्या चुकातून बाहेर याल़, तसेच नेहमी दुस-यांच्या चुका दाखवून देणे आणि त्यांना त्याबद्दल दोषी असल्याचे जाणवून देणे हेसुद्धा योग्य नाही़ नंतर ते तुमच्यापासून अंतर राखू पाहतील़ ते तुम्हाला कधी काहीही सांगणार नाहीत़ किंवा तुमच्यासमोर व्यक्त होणार नाहीत़ असे होणे हे भविष्यात घातकही ठरू शकते़ तसे होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी नेहमी दुसºयांना त्यांच्या चुकांबद्दल अपराधी वाटू न देता, त्या चुकांची जाणीव करून देणे हीसुद्धा एक कला आहे़ तुम्हाला हे खूप कौशल्याने करायचे आहे आणि त्यानंतर त्यांच्या पाठीवर थोपटत त्यांना प्रोत्साहित करा आणि म्हणा, ‘चला, जाऊ द्या़ काही हरकत नाही़ चुका होतात. मी हे विसरलोय. तुम्हीसुद्धा आता ते विसरून जा़’ कुणालाही अपराधी भावात अडकवून राहू देऊ नका किंवा त्यांना अपराध्या सारखे वाटू देऊ नका़ कुणा व्यक्तीला असे सतत अपराध्यासारखे वाटायला लावले, तर ती व्यक्ती परत अधिक चुकीची कृत्ये करीत राहील. त्याच्या हातून मोठी चूक होऊ शकते. तो आपला मार्ग कधीही सुधारणार नाही, म्हणून आपल्या मनाला यातून वाचविण्यासाठी प्रथम त्याला अपराधीपणाच्या किंवा पीडित भावापासून वाचवावे लागेल.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक