शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चुंबकीय चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 04:34 IST

वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे.

- विजयराज बोधनकरपंढरपूरची वारी ही चैतन्याची नदी आहे. सतत तेरा-चौदा दिवस वाहत राहते. वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे. भक्ती आणि शिस्त यांचा संगम पाहायला मिळतो. ही वारी काही कालपरवाची गोष्ट नव्हे. इ.स.१२३७ च्या आसपास होयसाळ राजाच्या कारकिर्दीतल्या एका शिलालेखात विठ्ठलाचा आणि वारीचा उल्लेख आहे. पंढरी हे गावच मुळात शालीवाहन शकाच्या प्रारंभीपासून वसलेले आहे. इतका प्राचीन इतिहास या वारीला आहे. संतांच्या जन्मगावावरून अनेक पालख्या निघतात. तुकोबारायाच्या पालखीचासुद्धा इतिहास आहे. तुकारामाच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंबरबाबा ते तुकाराम त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज. तेव्हापासून किंवा त्याही अगोदरपासून या वारीची परंपरा सुरू आहे. विश्वंबरबाबांनंतरही त्यांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंद यांनी ही वारी केली. परंतु क्षत्रिय धर्म पालनाकारणे देहू सोडून राजाश्रयाला गेलेत. पुढे राज्यावर इस्लामी आक्रमणे झालीत. त्या वेळेस ते दोघेही लढाईत मारले गेलेत. त्यातल्या मुकुंदची बायको सती गेली व हरीची बायको गर्भवती होती. तिला मुलगा झाला तो विठ्ठल. त्यानेही विठ्ठलवारी चालू ठेवली. त्याला विवाहानंतर पदाजी नावाचा मुलगा झाला, पदाजीला शंकर नावाचा मुलगा झाला. शंकराच्या पोटी बोल्होबाने जन्म घेतला आणि बोल्होबाच्या पोटी तुकारामाने जन्म घेतला. बोल्होबाने चाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. त्यानंतर तुकाराम महाराज १४00 वारकऱ्यांसमवेत वारी करू लागले. त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनीही वारी केली. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी वारीची परंपरा चालूच ठेवली ती आजतागायत सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संतांची पावले या वारीला जाऊन मिळालीत. पंढरपूरची वारी हा निर्मळाचा ध्यास आहे. ही परंपरा शुद्ध भक्तीची आनंद यात्रा आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक