शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चुंबकीय चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 04:34 IST

वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे.

- विजयराज बोधनकरपंढरपूरची वारी ही चैतन्याची नदी आहे. सतत तेरा-चौदा दिवस वाहत राहते. वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे. भक्ती आणि शिस्त यांचा संगम पाहायला मिळतो. ही वारी काही कालपरवाची गोष्ट नव्हे. इ.स.१२३७ च्या आसपास होयसाळ राजाच्या कारकिर्दीतल्या एका शिलालेखात विठ्ठलाचा आणि वारीचा उल्लेख आहे. पंढरी हे गावच मुळात शालीवाहन शकाच्या प्रारंभीपासून वसलेले आहे. इतका प्राचीन इतिहास या वारीला आहे. संतांच्या जन्मगावावरून अनेक पालख्या निघतात. तुकोबारायाच्या पालखीचासुद्धा इतिहास आहे. तुकारामाच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंबरबाबा ते तुकाराम त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज. तेव्हापासून किंवा त्याही अगोदरपासून या वारीची परंपरा सुरू आहे. विश्वंबरबाबांनंतरही त्यांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंद यांनी ही वारी केली. परंतु क्षत्रिय धर्म पालनाकारणे देहू सोडून राजाश्रयाला गेलेत. पुढे राज्यावर इस्लामी आक्रमणे झालीत. त्या वेळेस ते दोघेही लढाईत मारले गेलेत. त्यातल्या मुकुंदची बायको सती गेली व हरीची बायको गर्भवती होती. तिला मुलगा झाला तो विठ्ठल. त्यानेही विठ्ठलवारी चालू ठेवली. त्याला विवाहानंतर पदाजी नावाचा मुलगा झाला, पदाजीला शंकर नावाचा मुलगा झाला. शंकराच्या पोटी बोल्होबाने जन्म घेतला आणि बोल्होबाच्या पोटी तुकारामाने जन्म घेतला. बोल्होबाने चाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. त्यानंतर तुकाराम महाराज १४00 वारकऱ्यांसमवेत वारी करू लागले. त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनीही वारी केली. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी वारीची परंपरा चालूच ठेवली ती आजतागायत सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संतांची पावले या वारीला जाऊन मिळालीत. पंढरपूरची वारी हा निर्मळाचा ध्यास आहे. ही परंपरा शुद्ध भक्तीची आनंद यात्रा आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक