शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 19:33 IST

भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)भक्ती साधनेत नुसत्या बाह्य उपचाराला किंमत नाही. गणित शास्त्रात जसे नुसत्या शून्याला किंमत नाही, त्या शून्यामागे एखादा अंक असेल तरच शून्याला किंमत प्राप्त होते तसेच भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही. देवर्षी नारद महाराज म्हणतात -सातु अस्मिन् परम प्रेमरु पा ॥भगवंत हा परमप्रेम स्वरुप आहे. तो नुसत्या प्रेमाचा विषय नाही तर परमप्रेमाचा विषय आहे. नुसते प्रेम हे शारीरिक पातळीवरचे असते. परम प्रेमात वासनेचा भाव नसतो फक्त समर्पणाचाच भाव असतो. एक उर्दू शायर म्हणतो -मोहब्बत सीखनी है, तो सीख शमा से ।मौत तक जलती है पर उफ् निहं करती जुबाँ से ॥परमप्रेमच बघावयाचे असेल तर दिव्यातील ज्योतीकडे बघा.. स्वत:चा अंत होईपर्यंत ती पतंगासाठी जळत राहते पण तिच्या तोंडातून उफ् असा उद्गार निघत नाही.

अध्यात्मशास्त्रात या परमप्रेमाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत, १) पूर्व रागसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन एका विरहिणी मध्ये करतात -पैल तो गे काऊ कोकताहे ।शकून गे माये सांगता हे ॥परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चित्तात निर्माण तळमळ, अंतरंगात निर्माण झालेली जी अनामिक ओढ, त्यासच पूर्वराग असे म्हणतात. एकनाथ महाराज रु क्मिणी स्वयंवर ग्रंथात पूर्वराग अवस्थेचे वर्णन करतात -कृष्ण स्वरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी ॥ह्रदयी अविर्भवली मूर्ती । बाह्य स्फूर्ती मावळली ॥नारदांच्या मुखातून भगवंताच्या लीला ऐकल्या आण िरु क्मिणीचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तिची ही जी अवस्था झाली त्यालाच पूर्वराग असे म्हणतात.

२) मीलनया अवस्थेत साधकाला निर्गुण परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झालेला असतो. ही अवस्था अवर्णनीय आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन करतांना म्हणतात -निरखित निरखित गेलिये वो । पाहे तव तन्मय झालिये वो ॥माझ्या सूक्ष्मदृष्टीने मी परमात्म्याचा शोध घेतला आणि मग तो मला दिसला, मन शांत झाले, ही मीलन अवस्था आहे. भक्तीशास्त्रात ही अवस्था अत्यंत श्रेष्ठ आहे.

३) विरहभगवंताची भेट झाली व कांही कारणाने त्याचा वियोग झाला तर चित्ताचे ठिकाणी जी आगतिकता निर्माण होते तिला विरह अवस्था असे म्हणतात. नाथबाबा एका गौळणीत या अवस्थेचे वर्णन करतात, भगवंताला नेण्यासाठी अक्रूर गोकुळात आले. देव उद्या मथुरेला जाणार, या विरह अवस्थेने व्रजवासियांची जी अवस्था झाली ती अवर्णनीय आहे.नाथबाबा वर्णन करतात -रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी ।भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी ।नयनांच्या उदकाने भिजली धरणी ॥श्रीकृष्णाच्या विरहाने अगतिक झालेल्या गोपिका गोविंदा माधवा म्हणत रथासमोर आडव्या पडल्या व अक्रूराला म्हणाल्या, काका..! हा रथ आमच्या अंगावरून न्या... त्यांचा तो आक्र ोश बघून दगडालाही पाझर फुटला असेल. या अवस्थेला विरह अवस्था म्हणतात. एवढी अनन्य प्रेम लक्ष्मणभक्ती फक्त गोपिकांच्या जवळ होती म्हणून त्यांना देव बांधता आला. तुकाराम महाराज म्हणतात - प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥ 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक