शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 19:33 IST

भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)भक्ती साधनेत नुसत्या बाह्य उपचाराला किंमत नाही. गणित शास्त्रात जसे नुसत्या शून्याला किंमत नाही, त्या शून्यामागे एखादा अंक असेल तरच शून्याला किंमत प्राप्त होते तसेच भक्ती कर्मात देखील परमप्रेम असल्याशिवाय भक्तीला अर्थ नाही. देवर्षी नारद महाराज म्हणतात -सातु अस्मिन् परम प्रेमरु पा ॥भगवंत हा परमप्रेम स्वरुप आहे. तो नुसत्या प्रेमाचा विषय नाही तर परमप्रेमाचा विषय आहे. नुसते प्रेम हे शारीरिक पातळीवरचे असते. परम प्रेमात वासनेचा भाव नसतो फक्त समर्पणाचाच भाव असतो. एक उर्दू शायर म्हणतो -मोहब्बत सीखनी है, तो सीख शमा से ।मौत तक जलती है पर उफ् निहं करती जुबाँ से ॥परमप्रेमच बघावयाचे असेल तर दिव्यातील ज्योतीकडे बघा.. स्वत:चा अंत होईपर्यंत ती पतंगासाठी जळत राहते पण तिच्या तोंडातून उफ् असा उद्गार निघत नाही.

अध्यात्मशास्त्रात या परमप्रेमाच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत, १) पूर्व रागसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन एका विरहिणी मध्ये करतात -पैल तो गे काऊ कोकताहे ।शकून गे माये सांगता हे ॥परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चित्तात निर्माण तळमळ, अंतरंगात निर्माण झालेली जी अनामिक ओढ, त्यासच पूर्वराग असे म्हणतात. एकनाथ महाराज रु क्मिणी स्वयंवर ग्रंथात पूर्वराग अवस्थेचे वर्णन करतात -कृष्ण स्वरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी ॥ह्रदयी अविर्भवली मूर्ती । बाह्य स्फूर्ती मावळली ॥नारदांच्या मुखातून भगवंताच्या लीला ऐकल्या आण िरु क्मिणीचे अष्टसात्विक भाव जागे झाले. तिची ही जी अवस्था झाली त्यालाच पूर्वराग असे म्हणतात.

२) मीलनया अवस्थेत साधकाला निर्गुण परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झालेला असतो. ही अवस्था अवर्णनीय आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेचे वर्णन करतांना म्हणतात -निरखित निरखित गेलिये वो । पाहे तव तन्मय झालिये वो ॥माझ्या सूक्ष्मदृष्टीने मी परमात्म्याचा शोध घेतला आणि मग तो मला दिसला, मन शांत झाले, ही मीलन अवस्था आहे. भक्तीशास्त्रात ही अवस्था अत्यंत श्रेष्ठ आहे.

३) विरहभगवंताची भेट झाली व कांही कारणाने त्याचा वियोग झाला तर चित्ताचे ठिकाणी जी आगतिकता निर्माण होते तिला विरह अवस्था असे म्हणतात. नाथबाबा एका गौळणीत या अवस्थेचे वर्णन करतात, भगवंताला नेण्यासाठी अक्रूर गोकुळात आले. देव उद्या मथुरेला जाणार, या विरह अवस्थेने व्रजवासियांची जी अवस्था झाली ती अवर्णनीय आहे.नाथबाबा वर्णन करतात -रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी ।भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी ।नयनांच्या उदकाने भिजली धरणी ॥श्रीकृष्णाच्या विरहाने अगतिक झालेल्या गोपिका गोविंदा माधवा म्हणत रथासमोर आडव्या पडल्या व अक्रूराला म्हणाल्या, काका..! हा रथ आमच्या अंगावरून न्या... त्यांचा तो आक्र ोश बघून दगडालाही पाझर फुटला असेल. या अवस्थेला विरह अवस्था म्हणतात. एवढी अनन्य प्रेम लक्ष्मणभक्ती फक्त गोपिकांच्या जवळ होती म्हणून त्यांना देव बांधता आला. तुकाराम महाराज म्हणतात - प्रेम प्रीतीचे बांधले । ते न सुटे काही केले ॥ 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक