शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

श्रवण होता पालटे । पूर्वगुण आपुला ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:54 IST

काही लोक ऐकतात आणि ते इतरांना कसं लागू पडतं याविषयी चर्चा करतात म्हणून संत साहित्य हा आरसा आहे ते  इतरांवरती उगारावयाचे शस्त्र नाही. श्रवणानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यानंतर आत्मपरिवर्तनाचीसुद्धा..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )   आज आपण अध्यात्माच्या बैठकीची सुरुवात किंवा पाया काय आहे..? हे बघणार आहोत. श्रीमद् भागवतकार म्हणतात -

श्रवणं कीर्तनं विष्णो:स्मरणं पादसेवनं ।अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम् ॥

श्रवण ही अध्यात्माची सुरुवात किंवा पाया असल्यामुळे पायाच कच्चा असल्यास ईमारत कोसळण्याची शक्यता असते. म्हणून श्रवण कसे असावे.? श्री समर्थ रामदास स्वामी  म्हणतात -

रात्रंदिवस करि श्रवण । न सांडि आपुले अवगुण ।स्वहित आपले आपण । नेणे तो एक पढतमूर्ख ॥

म्हणजे, श्रवण ही नुसती सात्त्विक करमणूक नसावी किंवा व्यसनाप्रमाणे तो एक सवयीचा भागही नसावा तर श्रवणामध्ये जीवन परिवर्तनाची तळमळ हवी आणि या श्रवणाचा उपयोग स्वतःतील बदलासाठी व्हावा. श्रवणापूर्वीचा मी आणि श्रवणानंतरचा मी यांत काहीच बदल नसेल तर आपण श्रवण केलं म्हणजे काय केलं..? हा प्रश्न पडतो. काही लोक ऐकतात आणि ते इतरांना कसं लागू पडतं याविषयी चर्चा करतात म्हणून संत साहित्य हा आरसा आहे ते  इतरांवरती उगारावयाचे शस्त्र नाही. श्रवणानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यानंतर आत्मपरिवर्तनाचीसुद्धा.

एकदा अकबराच्या दरबारात एका मूर्तिकाराने तीन अगदी हुबेहूब सारख्या मूर्ती आणल्या आणि बादशहाला दाखवल्या. आणि तो म्हणाला यातील कोणती मूर्ती श्रेष्ठ आहे.? हे सांगा. त्या मूर्तींमधील फरक कोणालाही जाणवला नाही तेव्हा बिरबलापर्यंत ही गोष्ट आली. त्याने निरिक्षण केले आणि  त्याच्या लक्षात आले की, एका मूर्तीच्या दोन्ही कानांना छिद्र होती, दुसऱ्या मूर्तीच्या एकाच कानाला छिद्र होतं आणि तोंड उघडं होतं, तिसऱ्या मूर्तीच्या एका कानाला छिद्र होतं आणि ह्रदयाजवळ छिद्र होतं. यावरून बिरबलाने सांगितले, या तीन मूर्ती तीन प्रकारच्या श्रोत्यांचे प्रतिनिधित्व करतात. पहिली मूर्ती एका कानानं ऐकणं आणि दुसऱ्या कानानं सोडून देणं, मनावर काहीच घ्यायचं नाही. दुसरी मूर्ती ऐकणं किती चांगलं होतं हे इतरांना सांगतात, स्वत:च्या ह्रदयात काहीच परिवर्तन करीत नाहीत आणि तिसरी मूर्ती ऐकतात आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात म्हणून फक्त ग्रंथांची किंवा वक्त्याची स्तुती करुन जीवन बदलत नाही तर आपल्या वागण्यात बदल व्हावा लागतो. हे असं श्रवण घडण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्य असावे लागते. संत म्हणतात -

बहुत सुकृताची जोडी । म्हणून विठ्ठली आवडी ॥

पूर्वी पंप मारायचे स्टोव्ह असायचे, पेटलेला स्टोव्ह बंद करुन पुन्हा सुरु करताना एका पंपात पेटायचा कारण बर्नर तापलेलं असायचं तसं पूर्वपुण्याचं बर्नर तापलेलं असलं तर श्रवणाच्या एकाच पंपाने आपल्यात परिवर्तन होईल. विषयाच्या काळजीनं खराब झालेलं बर्नर श्रवणाने स्वच्छ होईल पण  त्यासाठी त्या श्रवणात तळमळ हवी. आता आपण म्हणाल, श्रवण करु पण फायदा काय.? फलश्रुती काय.? श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात -

श्रवणे आशंका फिटे । श्रवणे संशय तुटे ।श्रवण होता पालटे । पूर्वगुण आपुला ॥

श्रवण हा संस्कार आहे. श्रवणामुळे कान आणि मन दोन्हीही तयार होते. जसे -

सेविलेची सेवावे अन्न । घेतलेचि घ्यावे जीवन ।तैसे श्रवण मनन । केलेची करावे ॥

ज्याप्रमाणे आपण दररोज घर झाडतो, स्नान करतो, कपडे धुतो, भांडी घासतो ज्यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं, शरीर स्वच्छ राहतं त्याप्रमाणे श्रवणामुळे मन स्वच्छ होतं. श्रवण म्हणजे आपल्या निरोगी मनाचा पाया आहे. आज आपण एकमेकांविषयी गैरसमज झालेले पाहतो. क्रोधातून घडलेल्या घटना, द्वेष, मनाची अस्थिरता ही सगळी मानसिक उपासमारीची लक्षणं आहेत. आज आपण चांगलं ऐकणं विसरलो त्यामुळे आपली मानसिकता अस्थिर झाली. श्रवणाची सोय नसेल तर कमीत कमी संत साहित्याचे किंवा आध्यात्मिक साहित्याचे वाचन तरी शांतचित्ताने करावयांस हवे. आता श्रवण कसे करावे..? हे पुढील लेखांकात पाहूया..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार असून त्यांचा भ्रमणध्वनी 8793030303 आहे )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक