शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांची पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:33 IST

गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम, सेवा शुश्रुषेची भावना, नम्रता वगैरे जी साधू संतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यांचे श्रवण, मनन व निदिध्यासन केले पाहिजे. म्हणजे मग गुरू-कृपेचा साक्षात्कार होत असतो.

गुरू कृपाप्रिय मित्र-पत्र मिळाले. आपण लिहिले की मला गुरुदेवाची कृपा व्हावी अशी तळमळ आहे. परंतु हा मार्ग तरी कोण सांगणार? ऐका तर मग.तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी करता येण्याला तरी कुणी शिकवले आहे? त्याचे नाव आठवेल काय? जेवायला, झोपायला, कपडे घालायला व फिरायला जायला कुणी शिकवले आहे? मी म्हणतो- हे शिकविणारे घरोघरी आहेतच ना? तसेच गुरू-कृपा होण्यालाही काय करावे हेही शिकवणारे हजारो ग्रंथ, हजारो पंडित व अनेक संत, पंथ आहेतच ना? प्रश्न आहे, आपल्यालाच त्याची जरा काळजी असावी लागते व त्याकरिता जे आपल्या गुरुदेवाला आवडेल तसे आपल्या शरीराला वळण द्यावे लागते. कृपा गुरूची हवी व आचरण चोराच्या ठायी, कृपा देवाची हवी व वागणूक राक्षसाच्या ठायी असे धोकेबाज आचरण कुणाला कसे बरे आवडेल?मला सांगा- घरची स्त्रीसुद्धा प्रसन्न करायची असली तर तिच्या स्वभावाप्रमाणेच वागावे लागते. मित्र करावयाला सुद्धा समान शील लागते. दारूबाज लोकांचा मित्र वीर माणूस कसा होणार? साधूची मैत्री स्रैण लोकांशी कशी जमणार? आणि सात्विक प्रवृत्तीचा मेळ तमोगुणाशी कसा होणार? हे नाही का आपल्याला कळत? सहज कळण्यासरखे आहे. कारण हा निव्वळ व्यवहारच आहे ना! यावरून बोध घेऊन अपाल्याला गुरू-कृपा म्हणजे त्यांची प्रसन्नता प्राप्त करावयाची आहे. तेव्हा त्यांना आवडेल असेच वागले पाहिजे.गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम, सेवा शुश्रुषेची भावना, नम्रता वगैरे जी साधू संतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यांचे श्रवण, मनन व निदिध्यासन केले पाहिजे. म्हणजे मग गुरू-कृपेचा साक्षात्कार होत असतो.आपण म्हणाल- ‘अहो, हे सर्व मला अनेकांनी सांगितले आहे. पण मन तसे वागत नाही ना?’माझ्या मते याला उपाय असा. जर थंडी हवी असेल तर गरम घरात बसू नये. उष्णता हवी असेल तर बर्फाच्या जागेत झोपू नये. तद्वतच जर संत-समागम हवा असेल तर दुष्टांचा संग करू नये व सन्मार्ग लाभावयाचा असेल तर कुमार्गाने वा कुसंगतीने जाऊ नये. नेहमी गुरूसेवेचे चिंतन करीत तसे कार्य करीत राहिले पाहिजे. म्हणजे मग कृपा ही आपोआपच मिळेल. पण जर आपलेच चुकत असेल तर त्यांना तरी आपण कसे म्हणणार?मित्रा, म्हणून प्रथम तू हे शिक की, गुरुदेवाजवळ तरी तुझे दोषी लपवू नकोस. मोकळा बोल. छल, कपट करू नकोस. काय होते ते सांग आणि मग त्यांनी जे सांगितले ते प्राण गेला तरी करायचे सोडू नकोस.लोकांनी मूर्ख म्हटले तरी चालेल. पण आपला हट्ट सोडू नकोस. तुला जर का शंका आली तर गुरुजवळच सांग. त्यांची आज्ञा माग आणि स्वप्नातही गुरुदेवाच्या सेवेशिवाय इतरत्र प्रेम करू नकोस. हे जर तुला साधले तर गुरुदेवच तुझ्याजवळ येऊन तुला कृपापात्र करतील. हाच गुरू-कृपेचा सुलभ माग आहे.-तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज