शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
5
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
6
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
7
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
8
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
9
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
10
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
11
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
12
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
13
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
14
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
15
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
16
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
17
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
18
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
19
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
20
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण

राष्ट्रसंतांची पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:33 IST

गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम, सेवा शुश्रुषेची भावना, नम्रता वगैरे जी साधू संतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यांचे श्रवण, मनन व निदिध्यासन केले पाहिजे. म्हणजे मग गुरू-कृपेचा साक्षात्कार होत असतो.

गुरू कृपाप्रिय मित्र-पत्र मिळाले. आपण लिहिले की मला गुरुदेवाची कृपा व्हावी अशी तळमळ आहे. परंतु हा मार्ग तरी कोण सांगणार? ऐका तर मग.तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी करता येण्याला तरी कुणी शिकवले आहे? त्याचे नाव आठवेल काय? जेवायला, झोपायला, कपडे घालायला व फिरायला जायला कुणी शिकवले आहे? मी म्हणतो- हे शिकविणारे घरोघरी आहेतच ना? तसेच गुरू-कृपा होण्यालाही काय करावे हेही शिकवणारे हजारो ग्रंथ, हजारो पंडित व अनेक संत, पंथ आहेतच ना? प्रश्न आहे, आपल्यालाच त्याची जरा काळजी असावी लागते व त्याकरिता जे आपल्या गुरुदेवाला आवडेल तसे आपल्या शरीराला वळण द्यावे लागते. कृपा गुरूची हवी व आचरण चोराच्या ठायी, कृपा देवाची हवी व वागणूक राक्षसाच्या ठायी असे धोकेबाज आचरण कुणाला कसे बरे आवडेल?मला सांगा- घरची स्त्रीसुद्धा प्रसन्न करायची असली तर तिच्या स्वभावाप्रमाणेच वागावे लागते. मित्र करावयाला सुद्धा समान शील लागते. दारूबाज लोकांचा मित्र वीर माणूस कसा होणार? साधूची मैत्री स्रैण लोकांशी कशी जमणार? आणि सात्विक प्रवृत्तीचा मेळ तमोगुणाशी कसा होणार? हे नाही का आपल्याला कळत? सहज कळण्यासरखे आहे. कारण हा निव्वळ व्यवहारच आहे ना! यावरून बोध घेऊन अपाल्याला गुरू-कृपा म्हणजे त्यांची प्रसन्नता प्राप्त करावयाची आहे. तेव्हा त्यांना आवडेल असेच वागले पाहिजे.गुरू-कृपा होण्याला शप्रथम शिष्यपणा म्हणजे पात्रता अंगी आली पाहिजे. गुरूचे मन, गुरूची बुद्धी, गुरूच तप याशी शिष्य अनन्य झाला पाहिजे तरच गुरूची कृपा होणार. यासाठी प्रथम गुरू-आज्ञेचे व्रत पाळले पाहिजे आणि त्यासाठी जी हिंमत, जो त्याग, जी गंभीरता, जो संयम, सेवा शुश्रुषेची भावना, नम्रता वगैरे जी साधू संतांनी नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यांचे श्रवण, मनन व निदिध्यासन केले पाहिजे. म्हणजे मग गुरू-कृपेचा साक्षात्कार होत असतो.आपण म्हणाल- ‘अहो, हे सर्व मला अनेकांनी सांगितले आहे. पण मन तसे वागत नाही ना?’माझ्या मते याला उपाय असा. जर थंडी हवी असेल तर गरम घरात बसू नये. उष्णता हवी असेल तर बर्फाच्या जागेत झोपू नये. तद्वतच जर संत-समागम हवा असेल तर दुष्टांचा संग करू नये व सन्मार्ग लाभावयाचा असेल तर कुमार्गाने वा कुसंगतीने जाऊ नये. नेहमी गुरूसेवेचे चिंतन करीत तसे कार्य करीत राहिले पाहिजे. म्हणजे मग कृपा ही आपोआपच मिळेल. पण जर आपलेच चुकत असेल तर त्यांना तरी आपण कसे म्हणणार?मित्रा, म्हणून प्रथम तू हे शिक की, गुरुदेवाजवळ तरी तुझे दोषी लपवू नकोस. मोकळा बोल. छल, कपट करू नकोस. काय होते ते सांग आणि मग त्यांनी जे सांगितले ते प्राण गेला तरी करायचे सोडू नकोस.लोकांनी मूर्ख म्हटले तरी चालेल. पण आपला हट्ट सोडू नकोस. तुला जर का शंका आली तर गुरुजवळच सांग. त्यांची आज्ञा माग आणि स्वप्नातही गुरुदेवाच्या सेवेशिवाय इतरत्र प्रेम करू नकोस. हे जर तुला साधले तर गुरुदेवच तुझ्याजवळ येऊन तुला कृपापात्र करतील. हाच गुरू-कृपेचा सुलभ माग आहे.-तुकड्यादास

  • संकलन : बाबा मोहोड
टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज