शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

मानवी जीवनाच्या संपन्नतेचा मूलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:23 IST

केवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते.

- सद्गुरू जग्गी वासुदेवकेवळ रोग, आजाररहित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा तुमचे शरीर, तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमची ऊर्जा यांत उत्तम समन्वय असतो आणि जेव्हा तुम्ही आतून परिपूर्णता अनुभवता तेव्हाच तुम्हाला खरोखर आरोग्यदायी वाटते. आज जगात पुष्कळ लोक वैद्यकीयदृष्ट्या जरी रोगमुक्त असले तरी वास्तविकपणे सहसा ते आरोग्यवंत नसतात. त्यांना औषधांची गरज नसेलही पण त्यांची संपूर्ण शरीरप्रणाली परिपूर्णता अनुभवत नाही. त्यांच्यात शांती, समाधान आणि आनंदाचा अभाव असतो. तुम्हाला वाटते की नैराश्याची एक ठरावीक सीमा पार केल्यानंतरच तुम्ही स्वत:ला आजारी समजत असाल, पण मी म्हणतो जर तुम्ही आनंदाने प्रफुल्लित नसाल तर एक प्रकारे तुम्ही आजारीच आहात. म्हणजे तुमच्यात आंतरिक समन्वय आणि समतोल याचा अभाव आहे. असे घडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही कधी याकडे लक्षच दिले नाही.सर्वकाही बाहेरून दुरुस्त करण्याची मनोवृत्ती अगोदर तुम्ही सोडून द्यावी. कुठलाही डॉक्टर किंवा औषध तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्हाला ते त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडीफार मदत करू शकतात, पण आरोग्य हे आतून घडतं आणि घडायला हवं. आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक पातळीशी निगडित नाही. आज आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते की, मानव म्हणजे शरीर आणि मन यांचे समान संमिश्रण आहे.जे काही मनात घडतं त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. जे काही शरीरात घडतं त्याचे परिणाम मनावर दिसून येतात. म्हणून आपली जीवन जगण्याची पद्धत, आपली मनोवृत्ती, आपल्या भावना, आपली मूलभूत मानसिक स्थिती, दैनंदिन कार्य सक्रियता, मनाची सूत्रबद्धता एकूण या सर्व गोष्टी उत्तम आरोग्याशी संबंधित आहेत. आरोग्य जर आपल्या आतून निर्माण व्हायचं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्या आत थोडं आंतरिक इंजिनीअरिंग करावं लागेल. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक