शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

शुभाशुभ विचारांवरसुद्धा लक्ष ठेवावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:00 IST

एक राजा होता. त्याचा मित्र लाकडाचा व्यापारी होता. एक दिवस मित्र लाकडाचा किती साठा आहे हे पाहण्यासाठी आपल्या वखारीत जातो. चंदनाच्या लाकडांकडे बघून त्याच्या मनात प्रश्न उद्भवतो की, हा साठा कसा संपेल.

- ब्रह्मकुमारीएक राजा होता. त्याचा मित्र लाकडाचा व्यापारी होता. एक दिवस मित्र लाकडाचा किती साठा आहे हे पाहण्यासाठी आपल्या वखारीत जातो. चंदनाच्या लाकडांकडे बघून त्याच्या मनात प्रश्न उद्भवतो की, हा साठा कसा संपेल. उत्तर येतं की, एखादी खूप मोठी व्यक्ती जर मेली तर या लाकडाचा उपयोग होऊ शकेल. राजा (त्याचा मित्र) जर तोच वारला तर... मनामध्ये या विचारांचे वारे वाहू लागतात.एकीकडे हेसुद्धा जाणवते की, मी असा विचार कसा करू शकतो? जेव्हा कधी त्या दोघांची भेट होत असे, मित्राच्या मनात राजाच्या मरणाचे विचार सुरू व्हायचे. तिथे राजालासुद्धा विचार यायला लागले की, माझा मित्र इतका पैसा कोणासाठी व का कमावतोय? त्याला तर कोणी वारस नाही. याचा मृत्यू झाला, तर याची कमाई माझ्या खजिन्यात जमा होईल. याचा मृत्यू कसा होईल. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचे विचार सुरू होतात. एक दिवस दोघ भेटतात, तेव्हा न राहवून मित्र आपल्या मनातले भाव राजासमोर ठेवत त्याची माफीही मागतो. राजा सर्व ऐकल्यानंतर मित्राचीसुद्धा माफी मागतो.लोभापायी आपल्या जीवलग मित्राचा मृत्यू व्हावा, ही भावना त्यांना लाजीरवाणी करते. राजा सांगतो की, मी तुझ्या लाकडांना विकत घेऊन मंदिर बनवतो व तुला त्याचे भरघोस पैसे देतो. यावर मित्र म्हणतो की, राजा हे पैसे मला देण्याऐवजी मंदिराची आरास, तसेच मूर्तीच्या स्थापनेत ते लावावे. अशा पद्धतीने दोघांनी आपली भावना शुद्ध करून मंदिर बनविण्याची हमी भरली. सारांश असा की, मनातील प्रत्येक शुभाशुभ विचार व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्याची प्रतिक्रिया समोरून त्याच पद्धतीने होते. म्हणून शब्दांवर जसे आपले लक्ष असते, तसेच विचारांवरसुद्धा लक्ष ठेवावे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक