शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शुभाशुभ विचारांवरसुद्धा लक्ष ठेवावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:00 IST

एक राजा होता. त्याचा मित्र लाकडाचा व्यापारी होता. एक दिवस मित्र लाकडाचा किती साठा आहे हे पाहण्यासाठी आपल्या वखारीत जातो. चंदनाच्या लाकडांकडे बघून त्याच्या मनात प्रश्न उद्भवतो की, हा साठा कसा संपेल.

- ब्रह्मकुमारीएक राजा होता. त्याचा मित्र लाकडाचा व्यापारी होता. एक दिवस मित्र लाकडाचा किती साठा आहे हे पाहण्यासाठी आपल्या वखारीत जातो. चंदनाच्या लाकडांकडे बघून त्याच्या मनात प्रश्न उद्भवतो की, हा साठा कसा संपेल. उत्तर येतं की, एखादी खूप मोठी व्यक्ती जर मेली तर या लाकडाचा उपयोग होऊ शकेल. राजा (त्याचा मित्र) जर तोच वारला तर... मनामध्ये या विचारांचे वारे वाहू लागतात.एकीकडे हेसुद्धा जाणवते की, मी असा विचार कसा करू शकतो? जेव्हा कधी त्या दोघांची भेट होत असे, मित्राच्या मनात राजाच्या मरणाचे विचार सुरू व्हायचे. तिथे राजालासुद्धा विचार यायला लागले की, माझा मित्र इतका पैसा कोणासाठी व का कमावतोय? त्याला तर कोणी वारस नाही. याचा मृत्यू झाला, तर याची कमाई माझ्या खजिन्यात जमा होईल. याचा मृत्यू कसा होईल. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचे विचार सुरू होतात. एक दिवस दोघ भेटतात, तेव्हा न राहवून मित्र आपल्या मनातले भाव राजासमोर ठेवत त्याची माफीही मागतो. राजा सर्व ऐकल्यानंतर मित्राचीसुद्धा माफी मागतो.लोभापायी आपल्या जीवलग मित्राचा मृत्यू व्हावा, ही भावना त्यांना लाजीरवाणी करते. राजा सांगतो की, मी तुझ्या लाकडांना विकत घेऊन मंदिर बनवतो व तुला त्याचे भरघोस पैसे देतो. यावर मित्र म्हणतो की, राजा हे पैसे मला देण्याऐवजी मंदिराची आरास, तसेच मूर्तीच्या स्थापनेत ते लावावे. अशा पद्धतीने दोघांनी आपली भावना शुद्ध करून मंदिर बनविण्याची हमी भरली. सारांश असा की, मनातील प्रत्येक शुभाशुभ विचार व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्याची प्रतिक्रिया समोरून त्याच पद्धतीने होते. म्हणून शब्दांवर जसे आपले लक्ष असते, तसेच विचारांवरसुद्धा लक्ष ठेवावे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक