शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:56 IST

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा अर्थ असा नाही की, प्रयत्नाला काही अर्थ नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. माठ मातीपासून घडत असला तरी, मातीवर कुंभाराला आकार द्यावाच लागतो. माऊली म्हणतात -भाग्य जै सानुकूल । केले उद्यम सदा सफळ ॥संत म्हणतात, भाग्याची अनुकूलता असेल तर प्रयत्नाला फळ प्राप्त होते. विचार करा दोघेजण जिवश्च कंठश्च मित्र आहेत. दोघांनी एकाच दिवशी व्यवसाय सुरू केला पण एकाला त्या व्यवसायात भरपूर फलप्राप्ती झाली व दुसरा मात्र पार उद्ध्वस्त झाला, असे का..? ज्याची भरभराट झाली त्याचे दैव अनुकूल होते व ज्याचे दिवाळे निघाले त्याचे दैव प्रतिकूल होते. थोडक्यात काय तर, प्रयत्नाला देखील दैवाची अनुकूलता लागतेच. संत तुकोबा म्हणतात -प्रारब्धेची जोडे धन । प्रारब्धेची वाढे मान ॥आपला विषय भाग्य प्रपंचात ही लागते व परमार्थात ही लागतेच परंतु प्रपंचातल्या भाग्याची कल्पना वेगळी व परमार्थातल्या भाग्याची कल्पना वेगळी. प्रपंचात ज्याच्याजवळ भरपूर श्रीमंती, बंगला, गाडी, जमीन जुमला, पदप्रतिष्ठा, मानमरातब असेल त्याला समाज भाग्यवंत समजतो पण परमार्थातील भाग्याचा विचार करतांना संत म्हणतात -भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥भगवंत प्राप्तीसाठी जे साधना करतात, त्याला संत भाग्यवंत म्हणतात. पंढरीनाथाला जे अनन्य भावाने शरण गेले ते खरंच भाग्यवंत. संसारातल्या लौकिक पदार्थाच्या प्राप्तीसाठी साधना करणं आणि तो पदार्थ प्राप्त होणं हे संसारिकासाठी भाग्य आहे. तसं देव प्राप्तीसाठी साधना करणं आण िदेव प्राप्त होणं हे परमार्थिकासाठी भाग्य आहे.एकनाथ महाराज म्हणाले -भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे तो परम भाग्याची संपत्ती ॥

भारतवर्षांत नरदेह मिळाला हेच परम भाग्य आहे. नरदेह मिळाल्यानंतर अध्यात्मिक साधना करून देव मिळवला हे आणखी दुसरे भाग्य कारण परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान इतर देहांत नाहीच म्हणून तर तुकोबा म्हणतात - भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥बाकीच्या देहांत देखील आहार, निद्रा, भय, आणि मैथून या क्रि या आहेतच. विषय सुखाचा विचार इतर देहात आहेच. फक्त उध्दाराचे ज्ञान इतर देहांत नाही ते फक्त याच देहात आहे. परमभाग्याने हा मानव देह मिळाला आहे तर, विषय सुखाच्या मागे न लागता परमात्मा स्वरूपाशी तदरु प होणं ह्यालाच संत भाग्यवंत म्हणतात. माऊली म्हणतात - हे तो विषय वैराग्य । आत्मलाभाचे भाग्य ॥

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. -  9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक