शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:56 IST

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा अर्थ असा नाही की, प्रयत्नाला काही अर्थ नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. माठ मातीपासून घडत असला तरी, मातीवर कुंभाराला आकार द्यावाच लागतो. माऊली म्हणतात -भाग्य जै सानुकूल । केले उद्यम सदा सफळ ॥संत म्हणतात, भाग्याची अनुकूलता असेल तर प्रयत्नाला फळ प्राप्त होते. विचार करा दोघेजण जिवश्च कंठश्च मित्र आहेत. दोघांनी एकाच दिवशी व्यवसाय सुरू केला पण एकाला त्या व्यवसायात भरपूर फलप्राप्ती झाली व दुसरा मात्र पार उद्ध्वस्त झाला, असे का..? ज्याची भरभराट झाली त्याचे दैव अनुकूल होते व ज्याचे दिवाळे निघाले त्याचे दैव प्रतिकूल होते. थोडक्यात काय तर, प्रयत्नाला देखील दैवाची अनुकूलता लागतेच. संत तुकोबा म्हणतात -प्रारब्धेची जोडे धन । प्रारब्धेची वाढे मान ॥आपला विषय भाग्य प्रपंचात ही लागते व परमार्थात ही लागतेच परंतु प्रपंचातल्या भाग्याची कल्पना वेगळी व परमार्थातल्या भाग्याची कल्पना वेगळी. प्रपंचात ज्याच्याजवळ भरपूर श्रीमंती, बंगला, गाडी, जमीन जुमला, पदप्रतिष्ठा, मानमरातब असेल त्याला समाज भाग्यवंत समजतो पण परमार्थातील भाग्याचा विचार करतांना संत म्हणतात -भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥भगवंत प्राप्तीसाठी जे साधना करतात, त्याला संत भाग्यवंत म्हणतात. पंढरीनाथाला जे अनन्य भावाने शरण गेले ते खरंच भाग्यवंत. संसारातल्या लौकिक पदार्थाच्या प्राप्तीसाठी साधना करणं आणि तो पदार्थ प्राप्त होणं हे संसारिकासाठी भाग्य आहे. तसं देव प्राप्तीसाठी साधना करणं आण िदेव प्राप्त होणं हे परमार्थिकासाठी भाग्य आहे.एकनाथ महाराज म्हणाले -भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे तो परम भाग्याची संपत्ती ॥

भारतवर्षांत नरदेह मिळाला हेच परम भाग्य आहे. नरदेह मिळाल्यानंतर अध्यात्मिक साधना करून देव मिळवला हे आणखी दुसरे भाग्य कारण परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान इतर देहांत नाहीच म्हणून तर तुकोबा म्हणतात - भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥बाकीच्या देहांत देखील आहार, निद्रा, भय, आणि मैथून या क्रि या आहेतच. विषय सुखाचा विचार इतर देहात आहेच. फक्त उध्दाराचे ज्ञान इतर देहांत नाही ते फक्त याच देहात आहे. परमभाग्याने हा मानव देह मिळाला आहे तर, विषय सुखाच्या मागे न लागता परमात्मा स्वरूपाशी तदरु प होणं ह्यालाच संत भाग्यवंत म्हणतात. माऊली म्हणतात - हे तो विषय वैराग्य । आत्मलाभाचे भाग्य ॥

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. -  9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक