शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 17:56 IST

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड) प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा ...

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे पण भाग्य लागतेच कारण कर्माचे फळ भाग्यानेच मिळत असते. याचा अर्थ असा नाही की, प्रयत्नाला काही अर्थ नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. माठ मातीपासून घडत असला तरी, मातीवर कुंभाराला आकार द्यावाच लागतो. माऊली म्हणतात -भाग्य जै सानुकूल । केले उद्यम सदा सफळ ॥संत म्हणतात, भाग्याची अनुकूलता असेल तर प्रयत्नाला फळ प्राप्त होते. विचार करा दोघेजण जिवश्च कंठश्च मित्र आहेत. दोघांनी एकाच दिवशी व्यवसाय सुरू केला पण एकाला त्या व्यवसायात भरपूर फलप्राप्ती झाली व दुसरा मात्र पार उद्ध्वस्त झाला, असे का..? ज्याची भरभराट झाली त्याचे दैव अनुकूल होते व ज्याचे दिवाळे निघाले त्याचे दैव प्रतिकूल होते. थोडक्यात काय तर, प्रयत्नाला देखील दैवाची अनुकूलता लागतेच. संत तुकोबा म्हणतात -प्रारब्धेची जोडे धन । प्रारब्धेची वाढे मान ॥आपला विषय भाग्य प्रपंचात ही लागते व परमार्थात ही लागतेच परंतु प्रपंचातल्या भाग्याची कल्पना वेगळी व परमार्थातल्या भाग्याची कल्पना वेगळी. प्रपंचात ज्याच्याजवळ भरपूर श्रीमंती, बंगला, गाडी, जमीन जुमला, पदप्रतिष्ठा, मानमरातब असेल त्याला समाज भाग्यवंत समजतो पण परमार्थातील भाग्याचा विचार करतांना संत म्हणतात -भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥भगवंत प्राप्तीसाठी जे साधना करतात, त्याला संत भाग्यवंत म्हणतात. पंढरीनाथाला जे अनन्य भावाने शरण गेले ते खरंच भाग्यवंत. संसारातल्या लौकिक पदार्थाच्या प्राप्तीसाठी साधना करणं आणि तो पदार्थ प्राप्त होणं हे संसारिकासाठी भाग्य आहे. तसं देव प्राप्तीसाठी साधना करणं आण िदेव प्राप्त होणं हे परमार्थिकासाठी भाग्य आहे.एकनाथ महाराज म्हणाले -भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे तो परम भाग्याची संपत्ती ॥

भारतवर्षांत नरदेह मिळाला हेच परम भाग्य आहे. नरदेह मिळाल्यानंतर अध्यात्मिक साधना करून देव मिळवला हे आणखी दुसरे भाग्य कारण परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान इतर देहांत नाहीच म्हणून तर तुकोबा म्हणतात - भाग्यवंत म्हणू तया । शरण गेले पंढरी राया ॥बाकीच्या देहांत देखील आहार, निद्रा, भय, आणि मैथून या क्रि या आहेतच. विषय सुखाचा विचार इतर देहात आहेच. फक्त उध्दाराचे ज्ञान इतर देहांत नाही ते फक्त याच देहात आहे. परमभाग्याने हा मानव देह मिळाला आहे तर, विषय सुखाच्या मागे न लागता परमात्मा स्वरूपाशी तदरु प होणं ह्यालाच संत भाग्यवंत म्हणतात. माऊली म्हणतात - हे तो विषय वैराग्य । आत्मलाभाचे भाग्य ॥

( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, मोबाईल क्र. -  9421344960 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक