शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्म आणि ज्ञान हीच भक्तीयोगाची लक्षणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:47 IST

अध्यात्मिक तत्त्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व दिलेले आहे.

जें जें भेटू भूत । तें तें माणिजे भगवंत ।।हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ।। 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनी कर्म आणि ज्ञान ही दोन्ही भक्तियोगाची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. आजच्या काळात देखील या दोन्ही भक्तीची नितांत  आवश्यकता आहे. व्यक्ती दिवसेंदिवस स्वतःच्या कर्मा पासून दूर जाताना दिसून येत आहे. त्यामुळे ज्ञान संचय व प्रसार या बाबी कमी होत असताना प्रगती कधी साध्य होईल यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अध्यात्मिक तत्त्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व दिलेले आहे. निष्काम बुद्धीने आपण जे कर्म करतो तेव्हा, ते भक्तीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी भक्ती केली जाते ते कर्माचे स्वरूप आहे. परमेश्वर चराचरात असून त्याची ही निर्मिती आहे. अशी समदृष्टी निर्माण होते.

आत्मज्ञान झाले की सुख आणि दुख खोटे आहे, हे जाणवते.  तसे झाले तरच मन संयमी व समाधानी राहते. संत ज्ञानेश्वरांनी भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थाथी आणि ज्ञानी अशा स्वरूपाचे भक्त विविध व्याधी, पिडा यामुळे ग्रासलेले असतात. असे भक्त व्याधी पासून मुक्ती मागतात. जिज्ञासू भक्त हा जगण्याची इच्छा प्रगट करतात. तर अर्थात या स्वरूपाचे भक्त बहुरूपी विळख्यात सापडलेले असतात. त्या उलट ज्ञानी भक्त हे संसाराच्या उपसागरातून स्वतःची मुक्ती  कशी होईल याकरिता प्रयत्नशील असतात. आजच्या काळात अर्थाती स्वरूपाचे भक्त सर्वत्र पहावयास मिळतात. प्रयत्न वादापेक्षा भूक वादात विलक्षण रुची निर्माण झाली आहे. आपण किती कालावधी चे पाहुणे आहोत, याचा विसर पडून जणू काही या भूतलावर आपणास अमरत्व प्राप्त झाले आहेत असे वागत आहेत. भोगवाद, वस्तू विलासी प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.

जैसे फळाचिया हावे। तैसे कर्म करी आघवे ।।मग न किजेची येणे भावे । उपेक्षी जी ।। 

चांगले कर्म करत राहणे हा सहज योग असताना देखील प्रथमतः फळाची अपेक्षा आणि त्यानंतर कर्म असे होताना आज तरी दिसत आहे. जो व्यक्ती फळाची अपेक्षा करुन कर्माचे आचरण करतो त्यांना बहुतांश वेळा निराशाच हाती येते. सर्व गोष्टी ह्या नाशिवंत असून मनुष्यदेह प्राप्तीनंतर सद्गुणांचा आणि ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्यक्तीस अजरामर करून जातो. मानवातील प्रगल्भता कर्तव्यनिष्ठा चराचरात मानलेली तर आहेच. परंतु समाजाच्या निकोप वाढीसाठी मदत करने, कर्मशील व कर्तव्यपरायण व्यक्ती या शतकानुशतके आपले अस्तित्व अधोरेखित करून जातात. महाराष्ट्रात अशा विचारांच्या संतांची जणूकाही खान आहे अंततः एवढेच म्हणावे वाटते 'हे विश्वचि माझे घर असे म्हणणारे ज्ञानदेव माऊली खऱ्या अर्थाने विश्वमित्र आहेत.

- भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातुर.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक