शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्म आणि ज्ञान हीच भक्तीयोगाची लक्षणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:47 IST

अध्यात्मिक तत्त्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व दिलेले आहे.

जें जें भेटू भूत । तें तें माणिजे भगवंत ।।हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ।। 

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींनी कर्म आणि ज्ञान ही दोन्ही भक्तियोगाची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. आजच्या काळात देखील या दोन्ही भक्तीची नितांत  आवश्यकता आहे. व्यक्ती दिवसेंदिवस स्वतःच्या कर्मा पासून दूर जाताना दिसून येत आहे. त्यामुळे ज्ञान संचय व प्रसार या बाबी कमी होत असताना प्रगती कधी साध्य होईल यावर विचार करण्याची वेळ आली आहे. अध्यात्मिक तत्त्वज्ञानात कर्मापेक्षा ज्ञानाला व ज्ञानापेक्षा भक्तीला जास्त महत्त्व दिलेले आहे. निष्काम बुद्धीने आपण जे कर्म करतो तेव्हा, ते भक्तीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी भक्ती केली जाते ते कर्माचे स्वरूप आहे. परमेश्वर चराचरात असून त्याची ही निर्मिती आहे. अशी समदृष्टी निर्माण होते.

आत्मज्ञान झाले की सुख आणि दुख खोटे आहे, हे जाणवते.  तसे झाले तरच मन संयमी व समाधानी राहते. संत ज्ञानेश्वरांनी भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थाथी आणि ज्ञानी अशा स्वरूपाचे भक्त विविध व्याधी, पिडा यामुळे ग्रासलेले असतात. असे भक्त व्याधी पासून मुक्ती मागतात. जिज्ञासू भक्त हा जगण्याची इच्छा प्रगट करतात. तर अर्थात या स्वरूपाचे भक्त बहुरूपी विळख्यात सापडलेले असतात. त्या उलट ज्ञानी भक्त हे संसाराच्या उपसागरातून स्वतःची मुक्ती  कशी होईल याकरिता प्रयत्नशील असतात. आजच्या काळात अर्थाती स्वरूपाचे भक्त सर्वत्र पहावयास मिळतात. प्रयत्न वादापेक्षा भूक वादात विलक्षण रुची निर्माण झाली आहे. आपण किती कालावधी चे पाहुणे आहोत, याचा विसर पडून जणू काही या भूतलावर आपणास अमरत्व प्राप्त झाले आहेत असे वागत आहेत. भोगवाद, वस्तू विलासी प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.

जैसे फळाचिया हावे। तैसे कर्म करी आघवे ।।मग न किजेची येणे भावे । उपेक्षी जी ।। 

चांगले कर्म करत राहणे हा सहज योग असताना देखील प्रथमतः फळाची अपेक्षा आणि त्यानंतर कर्म असे होताना आज तरी दिसत आहे. जो व्यक्ती फळाची अपेक्षा करुन कर्माचे आचरण करतो त्यांना बहुतांश वेळा निराशाच हाती येते. सर्व गोष्टी ह्या नाशिवंत असून मनुष्यदेह प्राप्तीनंतर सद्गुणांचा आणि ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्यक्तीस अजरामर करून जातो. मानवातील प्रगल्भता कर्तव्यनिष्ठा चराचरात मानलेली तर आहेच. परंतु समाजाच्या निकोप वाढीसाठी मदत करने, कर्मशील व कर्तव्यपरायण व्यक्ती या शतकानुशतके आपले अस्तित्व अधोरेखित करून जातात. महाराष्ट्रात अशा विचारांच्या संतांची जणूकाही खान आहे अंततः एवढेच म्हणावे वाटते 'हे विश्वचि माझे घर असे म्हणणारे ज्ञानदेव माऊली खऱ्या अर्थाने विश्वमित्र आहेत.

- भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, लातुर.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक