शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाची अडगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:49 IST

परमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे.

- डॉ. गोविंद काळेपरमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे. अनेक विद्वानांची विद्वान मुले भल्यामोठ्या पगारावर परदेशी नोकरी करतात. पुढेमागे तेथेच स्थायिक होणे पसंद करतात. सुरुवातीच्या काळात वर्षाकाठी चक्कर पुढेपुढे हा कालावधी वाढत जातो. देवकार्य, मंगल कार्याला सोडाच अग्नि द्यायलासुद्धा ती वेळेवर पोहचू शकत नाही. रक्ताचे नाते सांभाळणे कठीण तेथे ऋणानुबंध कसे जोपासले जाणार? आयुष्यभर खस्ता खाऊन उभे केलेले घर. बंगला याला कोणी वाली उरत नाही. कोण सांभाळणार? विकणे हा एकमेव पर्याय. आलेली रक्कम वाटून घेणे एवढेच हाती. संपत्तीची वाटणी करणे सोपे जाते. परंतु प्राणपणाने जोपासलेल्या ग्रंथसंग्रहाचे काय? लक्ष्मी सर्वांनाच हवी. तिच्यावर साºयांचाच अधिकार शारदा कोणालाच नको. शारदेच्या वाट्याला अडगळ.दोघेही प्राध्यापक. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता दोन वर्षांच्या अंतरात मागे पुढे दोघेही गेले. मुलाने फर्निचर अनाथाश्रमाला दिले. फ्रीज, वॉशिंगमशीन शेजा-यांना देऊन टाकले. ग्रंथसंपदा शिल्लक. त्याला कोणी वाली उरला नाही. शेजारी पाजारी म्हणाले, पुस्तक नको. वाचणार कोण? परमार्थ आणि संतसाहित्याची पुस्तके वाचणार तरी कोण? आम्हाला कपाटे दिली तरी चालतील.ग्रंथांना वाली कोणी नाही. विचारांचा वाली कोणी नाही. अध्यात्म फुलणार कसे? सत्कर्माला बहर येणार तरी कसा? तक्षशिला, नालंदा यासारखी विश्वविख्यात विद्यापीठे जगाला देणाºया भारतात सरस्वतीपूजन एक दिवसापुरते सीमित झाले आहे. ‘सा मां पातु सरस्वती’’ अशी नित्य प्रार्थना करणारे सरस्वतीचे उपासक दुर्मीळच झाले आहेत. हे लक्षण राष्ट्रहिताचे नाही. परमार्थ काही वाटेवर सापडत नाही. सोन्याची नगरी लंका जिंकणा-या प्रभू रामचंद्रालाही समाधान वाटत नव्हते. त्यावेळी ज्ञानर्षी वशिष्ठ सांगते झाले, उपदेश करते झाले.‘‘साधुसंगम सत्शास्र परो भवसि राम चेत्तद्वीनै: नो मासै : परमं पदम् प्रान्पोशि।।सज्जनांचा सहवास आणि सत्शास्रांचे स्तवन या दोन मार्गानीच मनुष्य जन्माचा उद्धार होतो. बाबा, महाराज, पावलोपावली भेटतात. साधूदर्शन दुर्मीळ. पुस्तकांची अडगळ, सत्शास्राचे स्तवन करायचे तरी कोणी? आणि कसे?

टॅग्स :educationशैक्षणिक