शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

ज्ञानाची अडगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 02:49 IST

परमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे.

- डॉ. गोविंद काळेपरमेश्वराने एक बरे केले आहे. गेल्यानंतर बरोबर काही न्यायची सोय ठेवली नाही. एकट्याने यायचे-एकट्याने जायचे. जगताना माझे माझे म्हणायचे. वरती सोबत काहीच नेता येत नाही. सारे इथेच सोडून जायचे. अनेक विद्वानांची विद्वान मुले भल्यामोठ्या पगारावर परदेशी नोकरी करतात. पुढेमागे तेथेच स्थायिक होणे पसंद करतात. सुरुवातीच्या काळात वर्षाकाठी चक्कर पुढेपुढे हा कालावधी वाढत जातो. देवकार्य, मंगल कार्याला सोडाच अग्नि द्यायलासुद्धा ती वेळेवर पोहचू शकत नाही. रक्ताचे नाते सांभाळणे कठीण तेथे ऋणानुबंध कसे जोपासले जाणार? आयुष्यभर खस्ता खाऊन उभे केलेले घर. बंगला याला कोणी वाली उरत नाही. कोण सांभाळणार? विकणे हा एकमेव पर्याय. आलेली रक्कम वाटून घेणे एवढेच हाती. संपत्तीची वाटणी करणे सोपे जाते. परंतु प्राणपणाने जोपासलेल्या ग्रंथसंग्रहाचे काय? लक्ष्मी सर्वांनाच हवी. तिच्यावर साºयांचाच अधिकार शारदा कोणालाच नको. शारदेच्या वाट्याला अडगळ.दोघेही प्राध्यापक. त्यांचा ग्रंथसंग्रह मोठा होता दोन वर्षांच्या अंतरात मागे पुढे दोघेही गेले. मुलाने फर्निचर अनाथाश्रमाला दिले. फ्रीज, वॉशिंगमशीन शेजा-यांना देऊन टाकले. ग्रंथसंपदा शिल्लक. त्याला कोणी वाली उरला नाही. शेजारी पाजारी म्हणाले, पुस्तक नको. वाचणार कोण? परमार्थ आणि संतसाहित्याची पुस्तके वाचणार तरी कोण? आम्हाला कपाटे दिली तरी चालतील.ग्रंथांना वाली कोणी नाही. विचारांचा वाली कोणी नाही. अध्यात्म फुलणार कसे? सत्कर्माला बहर येणार तरी कसा? तक्षशिला, नालंदा यासारखी विश्वविख्यात विद्यापीठे जगाला देणाºया भारतात सरस्वतीपूजन एक दिवसापुरते सीमित झाले आहे. ‘सा मां पातु सरस्वती’’ अशी नित्य प्रार्थना करणारे सरस्वतीचे उपासक दुर्मीळच झाले आहेत. हे लक्षण राष्ट्रहिताचे नाही. परमार्थ काही वाटेवर सापडत नाही. सोन्याची नगरी लंका जिंकणा-या प्रभू रामचंद्रालाही समाधान वाटत नव्हते. त्यावेळी ज्ञानर्षी वशिष्ठ सांगते झाले, उपदेश करते झाले.‘‘साधुसंगम सत्शास्र परो भवसि राम चेत्तद्वीनै: नो मासै : परमं पदम् प्रान्पोशि।।सज्जनांचा सहवास आणि सत्शास्रांचे स्तवन या दोन मार्गानीच मनुष्य जन्माचा उद्धार होतो. बाबा, महाराज, पावलोपावली भेटतात. साधूदर्शन दुर्मीळ. पुस्तकांची अडगळ, सत्शास्राचे स्तवन करायचे तरी कोणी? आणि कसे?

टॅग्स :educationशैक्षणिक