शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - पश्चात्ताप खरा हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:45 IST

अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.

माता अमृतानंदमयीचुका करणं हा मानवी स्वभाव आहे. आयुष्यात कधीच चूक केली नाही असं कुणीही नाही. चूक म्हणजे केवळ जे करता कामा नये ते करणं नव्हे, तर जे करायला पाहिजे ते न करणंही चूक असतं. काही लोक अज्ञानातून चुका करतात. काही जण परिस्थितीच्या दबावामुळे चुका करतात. कारण काहीही असलं, तरी चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे, चूक झाली आहे हे मान्य करणं. एकदा आपली चूक समजली, की आपण पश्चात्ताप करायला हवा. पश्चात्ताप हे एक प्रकारचे प्रायश्चित्त असतं. पश्चात्तापाच्या अश्रूंनी धुतलं जाणार नाही असं कोणतंही पाप नसतं, मात्र आपल्याला काय योग्य आहे हे माहीत असते, तेव्हा चूक परत होता कामा नये. काही लोक फक्त दाखवण्यापुरतं पश्चात्तापाचं ढोंग आणतात. पश्चात्ताप प्रामाणिक असायला हवा. एकदा चूक समजल्यानंतर ती सुधारण्याचा आणि परत न करण्याचा ठाम निर्णय घेतला गेला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस चूक करतो तेव्हा आपली विवेकबुद्धी आपल्या अंतर्मनात कुजबुजत असते, ‘हे करू नको, ते करू नको.’ या सदसद्विवेकबुद्धीचं ऐकलं, तर आपण कधीच भटकणार नाही. माणूस कित्येकदा अज्ञानातून चूक करतो. देव अशा चुकांना माफ करो. मात्र, चूक परत परत झाल्यास तो माफ करणार नाही. म्हणूनच चूक पुन:पुन्हा घडता कामा नये. मानवी आयुष्य हे अयोग्याकडून योग्यतेकडे जाणारा प्रवास आहे. पश्चात्ताप झाला की मनुष्य योग्य मार्गावर चालण्याचा किमान विचार तरी करतोच. चुका तर होणारच. मात्र, त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण प्रत्येक विचार, शब्द आणि कृती चांगुलपणाने करायला हवी. क्षुल्लक चुकांचाही पश्चात्ताप करणं, त्या सुधारण्यासाठी पुढे होणं आवश्यक आहे. तरच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रारंभ होतो. हा मार्ग कधीही न संपणाऱ्या विजयाचा आहे. अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक