शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आनंद तरंग - पश्चात्ताप खरा हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:45 IST

अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.

माता अमृतानंदमयीचुका करणं हा मानवी स्वभाव आहे. आयुष्यात कधीच चूक केली नाही असं कुणीही नाही. चूक म्हणजे केवळ जे करता कामा नये ते करणं नव्हे, तर जे करायला पाहिजे ते न करणंही चूक असतं. काही लोक अज्ञानातून चुका करतात. काही जण परिस्थितीच्या दबावामुळे चुका करतात. कारण काहीही असलं, तरी चूक सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे, चूक झाली आहे हे मान्य करणं. एकदा आपली चूक समजली, की आपण पश्चात्ताप करायला हवा. पश्चात्ताप हे एक प्रकारचे प्रायश्चित्त असतं. पश्चात्तापाच्या अश्रूंनी धुतलं जाणार नाही असं कोणतंही पाप नसतं, मात्र आपल्याला काय योग्य आहे हे माहीत असते, तेव्हा चूक परत होता कामा नये. काही लोक फक्त दाखवण्यापुरतं पश्चात्तापाचं ढोंग आणतात. पश्चात्ताप प्रामाणिक असायला हवा. एकदा चूक समजल्यानंतर ती सुधारण्याचा आणि परत न करण्याचा ठाम निर्णय घेतला गेला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस चूक करतो तेव्हा आपली विवेकबुद्धी आपल्या अंतर्मनात कुजबुजत असते, ‘हे करू नको, ते करू नको.’ या सदसद्विवेकबुद्धीचं ऐकलं, तर आपण कधीच भटकणार नाही. माणूस कित्येकदा अज्ञानातून चूक करतो. देव अशा चुकांना माफ करो. मात्र, चूक परत परत झाल्यास तो माफ करणार नाही. म्हणूनच चूक पुन:पुन्हा घडता कामा नये. मानवी आयुष्य हे अयोग्याकडून योग्यतेकडे जाणारा प्रवास आहे. पश्चात्ताप झाला की मनुष्य योग्य मार्गावर चालण्याचा किमान विचार तरी करतोच. चुका तर होणारच. मात्र, त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण प्रत्येक विचार, शब्द आणि कृती चांगुलपणाने करायला हवी. क्षुल्लक चुकांचाही पश्चात्ताप करणं, त्या सुधारण्यासाठी पुढे होणं आवश्यक आहे. तरच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रारंभ होतो. हा मार्ग कधीही न संपणाऱ्या विजयाचा आहे. अनंत आनंद आणि शांती केवळ त्यातूनच साध्य करता येऊ शकते.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक