शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हा होईल दान पसावो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 03:58 IST

ज्ञानोबाची वाणी मराठी भाषेला लाभलेली नवसंजीवनी आहे. भूमीचे मार्दन जसे नुकत्याच उगवलेल्या लवलवत्या अंकुराने सांगावे, तसे ज्ञानदेवांच्या वाणीची मार्दवता शालीनता आणि चारित्र्याची ही शीता ब्रह्मानंदाच्या कंदावर उचंबळलेला ज्ञानेश्वरी नावाचा अमृत घट करतो.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेज्ञानोबाची वाणी मराठी भाषेला लाभलेली नवसंजीवनी आहे. भूमीचे मार्दन जसे नुकत्याच उगवलेल्या लवलवत्या अंकुराने सांगावे, तसे ज्ञानदेवांच्या वाणीची मार्दवता शालीनता आणि चारित्र्याची ही शीता ब्रह्मानंदाच्या कंदावर उचंबळलेला ज्ञानेश्वरी नावाचा अमृत घट करतो. ज्ञानदेवांची निम्नभरलीया उणे, जों खाडांवया घाव घाली, स्फटीकगृहीचे दीप डोलतु जैसे असी शब्द संपदा पाहिली की वाटते, ज्ञानदेव हे केवळ तत्त्वदर्षी व क्रांतदर्शी द्रष्टे कवी नव्हते, तर ते मानवतेचे महाभाष्यकार होते. विश्वात्मक शक्तीला आवाहन करून झाल्यानंतर ज्ञानाची किरणे घराघरांत पोहोचावीत एवढीच ज्ञानेशांची माफक अपेक्षा, परंतु ही अपेक्षा किती लोकविलक्षण आहे. प्रसादाचे ‘पसाय’ जेव्हा पसाभर वैश्विक इच्छेपोटीचे दृश्य रूप म्हणून प्राप्त होते, तेव्हा ज्ञानेशांच्या मनीचा आनंदरूप पक्षीराज स्वानंदाच्या गगनी विहार करताना म्हणू लागतो.किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होवोनि तिन्ही लोकीभजीजो आदि पुरुषी। अखंडित।सर्वसुखी समाजाचे व समाजातील सर्व घटकांना आत्मिक सुखाच्या एका समेवर आणणारे ज्ञानदेवांनी रेखाटलेले हे प्रसादाच्या दानाचं शब्दशिल्प त्यांच्या हृदयातील गाभाऱ्याच्या निखळ प्रेमाचे द्योतक आहे. आपल्या रस्त्यात काटे पसरविणाºया दृष्ट-दुर्जनांच्या रस्त्यावरसुद्धा फुलांच्या पायघड्या अंथरण्यासाठी वैयक्तिक जीवन सुख-दु:खाच्या किनाºयाच्या पलीकडे जावे लागते, तरच साºया विश्वाचे आर्त मनी प्रकाशित होतात. प्रतिकुल आणि बिकट प्रसंगांमधून गेल्यानंतरही त्यांनी आपला सन्मार्ग कधीही सोडला नाही. माणसाच्या माणूसपणाची ध्वजा उंच-उंच फडकत राहावी आणि माणूस उत्तरोत्तर सुखी संपन्न व्हावा, म्हणून ज्ञानेश्वरीच्या पसायदानाच्या समाप्तीप्रीत्यर्थ हृदयात माणूसपणाची विचारधारा पेरणारी संसार शांताची सावली ज्ञानोबा माउली म्हणते,तेथ म्हणे श्री विश्वेशरावों। हा होईल दान पसावों।येणें वरे ज्ञानदेवों। सुखिया झाला।।अनेकांनी ज्ञानदेवाना मोग्याची माउली, कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा, साधकांचा मायबाप, सर्वाभूती सुखरूप अशा उपमेंच्या कवेत बसविण्याचे काम केले आहे. कदाचित, ज्ञानोबा ज्यांना जसे भावले, तसे त्यांनी त्यांचे वर्णन केले आहे, पण ज्ञानदेव नावाच्या उपेक्षितांच्या म्होरक्याचे व्यक्तिमत्त्व या कुठल्याच उपमेंच्या कवेत बसणारे नाही. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची झालेली हेटाळणी, उपहास आणि छळ पाहता, त्यांच्या जागी सामान्य माणूस असता, तर त्याची प्रतिक्रिया कदाचित वेगळी आली असती. ती प्रतिक्रिया स्वाभाविक मानली गेली असती. मात्र, ज्या काळात फक्त पोथ्या-पुराणातील अक्षरांच्या काजवाड्यांना शास्त्री-पंडितांनी नको तेवढे महत्त्व दिले होते, त्या काळात आपल्या संजीवन समाधीच्या श्वासापर्यंत मानवतेचा ध्यास घेतलेल्या ज्ञानदेवांनी भक्ती, कर्म व ज्ञानाच्या माध्यमातूनसुद्धा मानवतेचंच गीत गायले. म्हणून मला वाटते की, असामान्य ज्ञानदेवास उपमाच द्यायचीझाली, तर मानवतेचे गीत गाणारा महाकवी एवढीच उपमा द्यावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक