शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

विरहातच कळते खऱ्या प्रेमाची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:55 IST

नदी ज्या प्रमाणे सर्वस्वी समुद्राला जाऊन मिळते व सागर रूप बनते. तसा परम प्रेमाने भक्त भगवंतालाच जाऊन मिळतो.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड )  

परमेश्वर हा परम प्रेमाचा विषय आहे. प्रेम आणि परम प्रेम यात जमीन व आकाश इतके अंतर आहे. संसारातील प्रेमात घृणा, तिरस्कार, द्वेष इ.विकार निर्माण होऊ शकतात. संसारातील विषय हे अनित्य व दु:ख रूपच असतात. परमेश्वर मात्र सद् चिद् आनंद रूपच असतो. त्याच्या दर्शनापुढे कोणताही सर्व श्रेष्ठ आनंद नाही. संत निळोबाराय म्हणतात :--नित्यानंदापुढे आनंद तो कोण! विषय सुख बाई बापुडे तो शिन !!फक्त या आनंदाची अनुभूती येण्यासाठी देव आणि भक्त यांचे तादात्म्य होणे गरजेचे आहे. देव आणि भक्त एक रूप व्हायला हवेत. मंडळी, प्रेम अनन्य शरणागती, निर्माण झाल्याशिवाय परमेश्वराविषयी परम प्रेम निर्माण होणार नाही. मग संसारातील यच्चयावत विषय तुच्छ वाटतील. माऊली विरहिणीच्या अवस्थेत स्वानुभव प्रगट करतात. कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करितो गे माये

न लावा चंदनु न घाला   विंझणवारा,हरिविणे शून्य शेजारूं गे माये चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगे भेटवा का मंडळी, नदी ज्या प्रमाणे सर्वस्वी समुद्राला जाऊन मिळते व सागर रूप बनते. तसा परम प्रेमाने भक्त भगवंतालाच जाऊन मिळतो. मीठ जसे पाण्यात पडल्यावर मीठ रूपाने वेगळे उरतच नाही. अगदी तसेच. ...!संत म्हणतात, जळी पडलिया लवना ! सर्व ही जळ होय विचक्षणा !!माऊलीच्या या विरहिणीत आर्तता, व्याकुळता, सामावलेली आहे. प्रेम म्हटल की विरह हा आलाच. विरहाच्या वेळीच माणसाच्या खऱ्या प्रेमाची कसोटी कळते. आपल्या आवडत्या प्रियतमाची वाट बघण्यात, त्याच्या विरहाने व्याकुळ होण्यात देखील एक विलक्षण आनंद असतो. भगवंतावर प्रेम करणारी विरहिणी  म्हणते,कृष्णे विंधिंली विरहिणी बोले चंद्रमा उबारा करितो गे माये!! अगं सखे जरा खिडकी लावतेस का. ..? ती म्हणते का गं. .? विरहिणी म्हणते, मला चंद्रमा उबारा करतो गं....सखी म्हणते, थांब मी तुझ्या अंगाला चंदन लावते. विरहिणी म्हणते, न लावा चंदनु न घाला विंझनवारा. अग मला श्रीहरि वाचून सगळे शून्यवत वाटत गं...! मी त्या भगवंताची कधीची वाट बघत आहे. माझ्या विरहाचा मदन मला आता जाळत आहे. माझ्या अंगातली चंदनाची चोळी मला तापलेल्या तव्यासारखी पोळत आहे. मला लवकरात लवकर त्या वनमाळीला भेटवा. माऊलीची ही विरहिणी चितेवर जळणाऱ्या सतीप्रमाणे आहे. भक्तीची उच्चतम अवस्था या विरहिणीत सामावलेली आहे. 

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांचा भ्रमणध्वनी  8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक