शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाढावया स्रेह, भक्ती -भावधर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 14:08 IST

माणसाचे मन आणि मानवी नातेसंबंधी भावबंधात आता जिव्हाळा कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

माणसाचे मन आणि मानवी नातेसंबंधी भावबंधात आता जिव्हाळा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. २१ व्या शतकात या स्पर्धेच्या युगात माणसाचे माणसाकडे दुर्लक्ष होत आहे. कुटुंब संस्थेचा होत असलेला  ऱ्हास उघड्या डोळ्यांनी सान -थोरांना दिसत आहे. ग्रामीण क्षेत्रातील लडीवाळपणा जपणारी संस्कृतीसुद्धा प्रत्ययी कमी होत आहे. अंधार चोहीकडून दाटलेला आणि स्रेह, ममता, जिव्हाळ्याचे दिवे विझायला आले आहेत. यापुढील काळ किती भयानक असेल, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. नातेगोते संपत्तीच्या तराजूत तोलल्या जात असल्याने काळ मोठा कठीण भासणार आहे. प्रत्येकाने यावर विचार करणे काळाची गरज आहे.पेडपर दौलत की कलियॉ न होगी,तो रिस्तोंके फुल भी कम आयेंगे।आज कुटुंब हे बेसूर होत चाललेले आहेत. जसे पेरावे तसे उगवते, हा निसर्ग नियम आहे. ज्वारी पेरल्यावर गव्हाची अपेक्षा कोणताही शेतकरी करीत नाही. प्रापंचिक जीवनात मात्र या नियमाचे आपणाला विस्मरण होत आहे. लोक माझ्याशी चांगले वागत नाही, अशी तक्रार आपण नेहमी ऐकतो; पण लोकांशी मी कसा वागतो, याचेही आत्मचिंतन करणे आवश्यकच आहे. लहान-लहान गोष्टीवरून चिडण्याची काही व्यक्तींची सवय असते. त्यामुळे मानसिक तणाव येतो. त्याकरिता दुसऱ्यांना कठोर बोलण्याचे टाळावे.वसे शांती ज्या घरी। तेथे लक्ष्मी वास करी।सदाचाराची कास धरावी आणि त्यायोगे ऐहिक वैभव प्राप्त करावे आणि जे वैभव मिळाले त्याची आसक्ती धरू नये.नको म्हणू माझे माझे। तुझे नसे काही।हाक येता यमराजाची, सर्व इथे राही।।संसारासाठी सुवर्ण पाहिजे, पैसा पाहिजे; पण हे आपल्याबरोबर येणार नाही. या कठोर सत्याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. संतांची वाणी मानवाला वारंवार जाणीव करून देत असते.साधुसंत सांगून गेले, जरा लक्ष देई।सावधान होई वेड्या, सावधान होई।।माणसाला अमर करणारी संजीवनी अजून तरी निर्माण झाली नाही. विज्ञानात कितीही प्रगती झाली तरी या बाबतीत यश येणार नाही. म्हणून जीवन आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण सुवर्णाचा व्हावा, दृष्टी व्यापक व्हावी. एकदा आलेले तारुण्य पुन्हा कधी येत नाही आणि एकदा आलेले म्हातारपण पुन्हा कधीच जात नाही. माणसाने सत्कृत्य करीत राहावे. त्याने आपल्या जीवनात विधायक कार्याचा प्रसार करावा. अलौकिक पुरुष होणे आपल्या हातात नाही; परंतु सद्विचारांची लहान-मोठी वर्तुळे निर्माण करणे आपल्या हातात आहे. चालू काळात जीवनाचे प्रयोजन काय आहे, हे माणसाने जाणावे व वेळ येईल तेव्हा शांतपणे या प्रपंचरूपी कुरुक्षेत्राचा निरोप घ्यावा.प्राप्त कर्माचरणी निपुण। भक्तीज्ञाने सुसंपन्न।अखंड करी सोहंध्यान। कृत्यार्थ जीवन होय त्याचे।।

 

- ज्ञानेश्वर मिरगेशेगाव, जि. बुलडाणा 

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक