शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

आपल्या विचारांचा समाेरच्यावर सुद्धा हाेताे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 20:22 IST

चांगला विचार केल्यास चांगल्या व्यक्ती व चांगल्या स्थितीला आपण आकर्षित करत असताे.

एक राजा आपल्या लवाजम्यासह चालला असताना एक इसम समोरून आला . राजाची व त्याची नजर एकमेकांना भिडली , त्वरित राजाने त्यांच्याकडे बोट दाखवून क्रोधाने, त्या इसमाला पकडा , मारा व जेलमध्ये टाका अशी सैनिकांना आज्ञा केली . राजाज्ञा होताच सैनिकांनी त्याला पकडून मारत मारत तुरुंगात टाकले . दुसऱ्या दिवशी प्रधानाने राजाला त्या इसमाला तुरुंगात टाकण्याचे कारण विचारले , तेव्हा राजाला याचे कारण काहीच सांगता येईना . राजा म्हणाला ,प्रधानजी , काय कळलं नाही पण तो समोर दिसला आणि मला खूप राग आला . क्रोधीत अवस्थेत मी भान हरपल्यामुळे त्याला पकडा , मारा , आत टाका असे म्हणालो . यावर तुम्हीच काय तो निर्णय त्याच्याबाबतीत घ्या , आध्यात्मिक वृत्तीच्या प्रधानाने तुरुंगात जाऊन त्या माणसाची चौकशी सुरू केली . 

तेव्हा तो माणूस प्रधानाच्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाला , साहेब राजाने मला मारायला व तुरुंगात टाकायला का सांगितलं माहीत नाही , पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज आहे . माझ्याकडे तिच्या लग्नकार्यासाठी पैसे नाहीत . पण चंदनाची लाकडे आहेत . पण ही लाकडे कोण विकत घेणार ? हा विचार चालू असताना राजा लवाजाम्यासाह समोरून येताना दिसला व चटकन माझ्या मनात विचार आला , हा राजा जर मेला तर माझी चंदनाची लाकडे खपतील . कारण राजाला चंदनाची चिता रचावी लागते . तेवढ्याच राजाने आज्ञा केली व मला सैनिकांनी मारत - तुरुंगात टाकलं. प्रधानाला अज्ञात गोष्टीचा उलगडा झाला . त्या माणसाच्या राजाविषयीच्या नकारात्मक व हानीकारक विचारांनी राजाला आतून अस्वस्थता व बेचैनी निर्माण झाली , म्हणून राजाने पकडा - मारा - आत टाका ही आज्ञा केली . खरोखर आपण समोरच्या माणसाविषयी मनात करत असलेल्या विचारांचा पण त्याच्यावर परिणाम होतो , म्हणून मन एखाद्याविषयी वाईट विचार करू लागले , कि त्याला विचारा - एक क्या बोलता तू ? व सावध व्हा .आपण समोरच्या व्यक्तीविषयी जो विचार करतो तो विचार त्या व्यक्तीच्या अंर्तमनाला तरंगाच्या रुपाने पोहचतो. व ती व्यक्ती तुमच्याशी तसाच व्यवहार करते. म्हणून मनातील विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल . गौतम बुद्ध म्हणतात जसा तुम्ही विचार कराल तसेच तुम्ही व्हाल. सर्व विश्व तरंग आहे . ज्या प्रकारचा तुम्ही विचार कराल त्या तरंगाची तुम्ही निर्मीती कराल . त्या प्रकारच्या तरंगाशी तुम्ही ट्युनअप व्हाल . म्हणून सकारात्मक विचार करा त्यामुळे चांगल्या व्यक्ती व चांगल्या स्थितीला तुम्ही आकर्षित कराल .

- डॉ. दत्ता कोहिनकर ( माईन्ड पाॅवर ट्रेनर) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक