शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘मी’पणाचा गर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:55 IST

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो.

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो. त्यांना कधी मन:शांती लाभत नाही. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार सॉप्टवेअर निसर्ग मानवाच्या जन्मासोबतच देऊन पाठवतो. जो त्याचा कुशलतेने, नियमांना धरून उपयोग करतो त्याचं आयुष्य कायमच सुखद घटनांनी भरलेलं असतं. मनाची चंचलता नष्ट करून मनाला स्थिर अवस्थेला आणून प्रज्ञेच्या उत्पत्तीचा पूर्ण लाभ होतो. बुद्धीची क्षमता जाणून घेऊन कर्माला बुद्धीवादाची जोड देतो आणि स्वाभिमानाची (अहंकार) पताका फडकत ठेवतो तिथे चित्त एकाग्र करून भावभावनांची, व्यवहार कुशलतेची, मानसन्मानाची, योग्य निर्णयाची पावले उचलून जगापुढे एक आदर्शव्रती म्हणून ओळखला जातो. बुद्धीच्या अफाट क्षमतेची आभा निर्माण करतो.

परंतु ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा खोटा भाव जपलेला असतो तिथे प्रगतीच्या विटा ढासळायला सुरुवात होते. ‘मी’पणा म्हणजे खोटा गर्व, ‘मी’पणा म्हणजे मूळ तत्त्वाशी प्रतारणा, ‘मी’पणा म्हणजे स्वैराचार, दुराचार अशांच्या ठायी आत्मोन्नती होण्याची शक्यताच नसते. या वृत्तीची माणसं जिथे असतात तिथे प्रगतीची गती थांबलेली असते. त्याचं उदाहरण देण्यासाठीच रामायणातला रावण आणि महाभारतातले कौरव नियतीने कथारूपाने जगापुढे आणले आहेत. रावणाला आपल्या शक्तीचा, ऐश्वर्याचा गर्व झाला होता. तो स्वत:च्या प्रेमात आंधळा झाला होता म्हणून त्याने सात्त्विक अशा देवपत्नीचं अपहरण केलं. स्वत:च्या भावाने त्याची समजूत घालण्याची पराकाष्टा केली; परंतु ‘मी’पणाच्या हट्टामुळे तो मृत्यूच्या जाळ्यात अडकतच गेला. पांडवांच्या वनवासाला कारणीभूत ठरणारे कौरवही ‘मी’पणाच्या हट्टामुळे शेवटी मृत्युपंथाला लागले. कुटुंब असो, गाव असो वा राष्टÑ, जिथे मूळ तत्त्वाला सोडून तामसी वृत्तीच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न अट्टाहासाने होतो, निसर्ग शेवटी हा त्याला कायमची अद्दल घडवितोच, त्या त्या व्यक्तीचं, गावाचं, राष्टÑाचं नशीब कालांतराने काळंवडून जातं. अनेक पातळ्यांवर त्यांचा पराभव झालेला असतो. कायमच ते मनस्तापाला तोंड देत राहतात. त्यांच्या ठायी प्रगतीची कुठलीही बाजू शिल्लक राहत नाही. सन्मानाच्या मार्गावर नेहमीच परमेश्वराच्या हजारो, लाखो सात्त्विक हातांचा आधार मिळत जातो. प

रंतु ‘मी’पणाच्या हेकट मार्गावर तामसी प्रवृत्तीचीच माणसे कायम भेटत राहतात. आणि ही आधारहिन माणसेच शेवटी विनाशकाले सर्वांना घेऊन जातात. आजही काही गावे, शहरे अशी आहेत की त्यांची प्रगती कुठल्याही बाजूने उदयाला येत नाही. भयंकर आणि भकास दिसणारी गावे किंवा शहरे ‘मी’पणाच्या चक्रव्यूहात अडकलेली असतात. एखाद्या प्रगतशील शहरातील सत्यपूर्ण व्यावहारिक जागृतीमुळे तेथे प्रभावीपणे प्रगतीची पावले उचलताना दिसतात. तर काही काही शहरे मात्र कायम मूलतत्त्वाची पायमल्ली करताना लक्षात येत राहते. मुळातच सात्त्विक प्रवृत्तीचे जागरण ज्या ठिकाणी असते तिथे फुलांचीच बाग फुललेली असते आणि जिथे तामसी प्रवृत्तीचेच प्रदर्शन होत राहते तिथे अराजकतेचे रान कायमच माजलेले दिसते. कलह माजलेला आपल्याला पाहावयास मिळते. शिक्षण, संस्कार, प्रगत विचार, सामर्थ्यशाली कृती यांचा कलश जिथे पुजला जातो तिथेच वैभव उजळून निघते.- विजयराज बोधनकर