शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मी’पणाचा गर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:55 IST

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो.

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो. त्यांना कधी मन:शांती लाभत नाही. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार सॉप्टवेअर निसर्ग मानवाच्या जन्मासोबतच देऊन पाठवतो. जो त्याचा कुशलतेने, नियमांना धरून उपयोग करतो त्याचं आयुष्य कायमच सुखद घटनांनी भरलेलं असतं. मनाची चंचलता नष्ट करून मनाला स्थिर अवस्थेला आणून प्रज्ञेच्या उत्पत्तीचा पूर्ण लाभ होतो. बुद्धीची क्षमता जाणून घेऊन कर्माला बुद्धीवादाची जोड देतो आणि स्वाभिमानाची (अहंकार) पताका फडकत ठेवतो तिथे चित्त एकाग्र करून भावभावनांची, व्यवहार कुशलतेची, मानसन्मानाची, योग्य निर्णयाची पावले उचलून जगापुढे एक आदर्शव्रती म्हणून ओळखला जातो. बुद्धीच्या अफाट क्षमतेची आभा निर्माण करतो.

परंतु ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा खोटा भाव जपलेला असतो तिथे प्रगतीच्या विटा ढासळायला सुरुवात होते. ‘मी’पणा म्हणजे खोटा गर्व, ‘मी’पणा म्हणजे मूळ तत्त्वाशी प्रतारणा, ‘मी’पणा म्हणजे स्वैराचार, दुराचार अशांच्या ठायी आत्मोन्नती होण्याची शक्यताच नसते. या वृत्तीची माणसं जिथे असतात तिथे प्रगतीची गती थांबलेली असते. त्याचं उदाहरण देण्यासाठीच रामायणातला रावण आणि महाभारतातले कौरव नियतीने कथारूपाने जगापुढे आणले आहेत. रावणाला आपल्या शक्तीचा, ऐश्वर्याचा गर्व झाला होता. तो स्वत:च्या प्रेमात आंधळा झाला होता म्हणून त्याने सात्त्विक अशा देवपत्नीचं अपहरण केलं. स्वत:च्या भावाने त्याची समजूत घालण्याची पराकाष्टा केली; परंतु ‘मी’पणाच्या हट्टामुळे तो मृत्यूच्या जाळ्यात अडकतच गेला. पांडवांच्या वनवासाला कारणीभूत ठरणारे कौरवही ‘मी’पणाच्या हट्टामुळे शेवटी मृत्युपंथाला लागले. कुटुंब असो, गाव असो वा राष्टÑ, जिथे मूळ तत्त्वाला सोडून तामसी वृत्तीच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न अट्टाहासाने होतो, निसर्ग शेवटी हा त्याला कायमची अद्दल घडवितोच, त्या त्या व्यक्तीचं, गावाचं, राष्टÑाचं नशीब कालांतराने काळंवडून जातं. अनेक पातळ्यांवर त्यांचा पराभव झालेला असतो. कायमच ते मनस्तापाला तोंड देत राहतात. त्यांच्या ठायी प्रगतीची कुठलीही बाजू शिल्लक राहत नाही. सन्मानाच्या मार्गावर नेहमीच परमेश्वराच्या हजारो, लाखो सात्त्विक हातांचा आधार मिळत जातो. प

रंतु ‘मी’पणाच्या हेकट मार्गावर तामसी प्रवृत्तीचीच माणसे कायम भेटत राहतात. आणि ही आधारहिन माणसेच शेवटी विनाशकाले सर्वांना घेऊन जातात. आजही काही गावे, शहरे अशी आहेत की त्यांची प्रगती कुठल्याही बाजूने उदयाला येत नाही. भयंकर आणि भकास दिसणारी गावे किंवा शहरे ‘मी’पणाच्या चक्रव्यूहात अडकलेली असतात. एखाद्या प्रगतशील शहरातील सत्यपूर्ण व्यावहारिक जागृतीमुळे तेथे प्रभावीपणे प्रगतीची पावले उचलताना दिसतात. तर काही काही शहरे मात्र कायम मूलतत्त्वाची पायमल्ली करताना लक्षात येत राहते. मुळातच सात्त्विक प्रवृत्तीचे जागरण ज्या ठिकाणी असते तिथे फुलांचीच बाग फुललेली असते आणि जिथे तामसी प्रवृत्तीचेच प्रदर्शन होत राहते तिथे अराजकतेचे रान कायमच माजलेले दिसते. कलह माजलेला आपल्याला पाहावयास मिळते. शिक्षण, संस्कार, प्रगत विचार, सामर्थ्यशाली कृती यांचा कलश जिथे पुजला जातो तिथेच वैभव उजळून निघते.- विजयराज बोधनकर