शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘मी’पणाचा गर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:55 IST

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो.

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो. त्यांना कधी मन:शांती लाभत नाही. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार सॉप्टवेअर निसर्ग मानवाच्या जन्मासोबतच देऊन पाठवतो. जो त्याचा कुशलतेने, नियमांना धरून उपयोग करतो त्याचं आयुष्य कायमच सुखद घटनांनी भरलेलं असतं. मनाची चंचलता नष्ट करून मनाला स्थिर अवस्थेला आणून प्रज्ञेच्या उत्पत्तीचा पूर्ण लाभ होतो. बुद्धीची क्षमता जाणून घेऊन कर्माला बुद्धीवादाची जोड देतो आणि स्वाभिमानाची (अहंकार) पताका फडकत ठेवतो तिथे चित्त एकाग्र करून भावभावनांची, व्यवहार कुशलतेची, मानसन्मानाची, योग्य निर्णयाची पावले उचलून जगापुढे एक आदर्शव्रती म्हणून ओळखला जातो. बुद्धीच्या अफाट क्षमतेची आभा निर्माण करतो.

परंतु ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा खोटा भाव जपलेला असतो तिथे प्रगतीच्या विटा ढासळायला सुरुवात होते. ‘मी’पणा म्हणजे खोटा गर्व, ‘मी’पणा म्हणजे मूळ तत्त्वाशी प्रतारणा, ‘मी’पणा म्हणजे स्वैराचार, दुराचार अशांच्या ठायी आत्मोन्नती होण्याची शक्यताच नसते. या वृत्तीची माणसं जिथे असतात तिथे प्रगतीची गती थांबलेली असते. त्याचं उदाहरण देण्यासाठीच रामायणातला रावण आणि महाभारतातले कौरव नियतीने कथारूपाने जगापुढे आणले आहेत. रावणाला आपल्या शक्तीचा, ऐश्वर्याचा गर्व झाला होता. तो स्वत:च्या प्रेमात आंधळा झाला होता म्हणून त्याने सात्त्विक अशा देवपत्नीचं अपहरण केलं. स्वत:च्या भावाने त्याची समजूत घालण्याची पराकाष्टा केली; परंतु ‘मी’पणाच्या हट्टामुळे तो मृत्यूच्या जाळ्यात अडकतच गेला. पांडवांच्या वनवासाला कारणीभूत ठरणारे कौरवही ‘मी’पणाच्या हट्टामुळे शेवटी मृत्युपंथाला लागले. कुटुंब असो, गाव असो वा राष्टÑ, जिथे मूळ तत्त्वाला सोडून तामसी वृत्तीच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न अट्टाहासाने होतो, निसर्ग शेवटी हा त्याला कायमची अद्दल घडवितोच, त्या त्या व्यक्तीचं, गावाचं, राष्टÑाचं नशीब कालांतराने काळंवडून जातं. अनेक पातळ्यांवर त्यांचा पराभव झालेला असतो. कायमच ते मनस्तापाला तोंड देत राहतात. त्यांच्या ठायी प्रगतीची कुठलीही बाजू शिल्लक राहत नाही. सन्मानाच्या मार्गावर नेहमीच परमेश्वराच्या हजारो, लाखो सात्त्विक हातांचा आधार मिळत जातो. प

रंतु ‘मी’पणाच्या हेकट मार्गावर तामसी प्रवृत्तीचीच माणसे कायम भेटत राहतात. आणि ही आधारहिन माणसेच शेवटी विनाशकाले सर्वांना घेऊन जातात. आजही काही गावे, शहरे अशी आहेत की त्यांची प्रगती कुठल्याही बाजूने उदयाला येत नाही. भयंकर आणि भकास दिसणारी गावे किंवा शहरे ‘मी’पणाच्या चक्रव्यूहात अडकलेली असतात. एखाद्या प्रगतशील शहरातील सत्यपूर्ण व्यावहारिक जागृतीमुळे तेथे प्रभावीपणे प्रगतीची पावले उचलताना दिसतात. तर काही काही शहरे मात्र कायम मूलतत्त्वाची पायमल्ली करताना लक्षात येत राहते. मुळातच सात्त्विक प्रवृत्तीचे जागरण ज्या ठिकाणी असते तिथे फुलांचीच बाग फुललेली असते आणि जिथे तामसी प्रवृत्तीचेच प्रदर्शन होत राहते तिथे अराजकतेचे रान कायमच माजलेले दिसते. कलह माजलेला आपल्याला पाहावयास मिळते. शिक्षण, संस्कार, प्रगत विचार, सामर्थ्यशाली कृती यांचा कलश जिथे पुजला जातो तिथेच वैभव उजळून निघते.- विजयराज बोधनकर