शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

‘मी’पणाचा गर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 05:55 IST

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो.

मूळ तत्त्वाचा आदर करणे हा इथल्या प्रत्येकाचा मूळ धर्म असायला हवा. परंतु मूळ नैसर्गिक तत्त्वाला विसरून जे फक्त मनमानी करतात त्यांचा जीवनप्रवास अनेक कठीण प्रसंगांनी भरलेला असतो. त्यांना कधी मन:शांती लाभत नाही. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे चार सॉप्टवेअर निसर्ग मानवाच्या जन्मासोबतच देऊन पाठवतो. जो त्याचा कुशलतेने, नियमांना धरून उपयोग करतो त्याचं आयुष्य कायमच सुखद घटनांनी भरलेलं असतं. मनाची चंचलता नष्ट करून मनाला स्थिर अवस्थेला आणून प्रज्ञेच्या उत्पत्तीचा पूर्ण लाभ होतो. बुद्धीची क्षमता जाणून घेऊन कर्माला बुद्धीवादाची जोड देतो आणि स्वाभिमानाची (अहंकार) पताका फडकत ठेवतो तिथे चित्त एकाग्र करून भावभावनांची, व्यवहार कुशलतेची, मानसन्मानाची, योग्य निर्णयाची पावले उचलून जगापुढे एक आदर्शव्रती म्हणून ओळखला जातो. बुद्धीच्या अफाट क्षमतेची आभा निर्माण करतो.

परंतु ज्याच्या ठायी ‘मी’पणाचा खोटा भाव जपलेला असतो तिथे प्रगतीच्या विटा ढासळायला सुरुवात होते. ‘मी’पणा म्हणजे खोटा गर्व, ‘मी’पणा म्हणजे मूळ तत्त्वाशी प्रतारणा, ‘मी’पणा म्हणजे स्वैराचार, दुराचार अशांच्या ठायी आत्मोन्नती होण्याची शक्यताच नसते. या वृत्तीची माणसं जिथे असतात तिथे प्रगतीची गती थांबलेली असते. त्याचं उदाहरण देण्यासाठीच रामायणातला रावण आणि महाभारतातले कौरव नियतीने कथारूपाने जगापुढे आणले आहेत. रावणाला आपल्या शक्तीचा, ऐश्वर्याचा गर्व झाला होता. तो स्वत:च्या प्रेमात आंधळा झाला होता म्हणून त्याने सात्त्विक अशा देवपत्नीचं अपहरण केलं. स्वत:च्या भावाने त्याची समजूत घालण्याची पराकाष्टा केली; परंतु ‘मी’पणाच्या हट्टामुळे तो मृत्यूच्या जाळ्यात अडकतच गेला. पांडवांच्या वनवासाला कारणीभूत ठरणारे कौरवही ‘मी’पणाच्या हट्टामुळे शेवटी मृत्युपंथाला लागले. कुटुंब असो, गाव असो वा राष्टÑ, जिथे मूळ तत्त्वाला सोडून तामसी वृत्तीच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न अट्टाहासाने होतो, निसर्ग शेवटी हा त्याला कायमची अद्दल घडवितोच, त्या त्या व्यक्तीचं, गावाचं, राष्टÑाचं नशीब कालांतराने काळंवडून जातं. अनेक पातळ्यांवर त्यांचा पराभव झालेला असतो. कायमच ते मनस्तापाला तोंड देत राहतात. त्यांच्या ठायी प्रगतीची कुठलीही बाजू शिल्लक राहत नाही. सन्मानाच्या मार्गावर नेहमीच परमेश्वराच्या हजारो, लाखो सात्त्विक हातांचा आधार मिळत जातो. प

रंतु ‘मी’पणाच्या हेकट मार्गावर तामसी प्रवृत्तीचीच माणसे कायम भेटत राहतात. आणि ही आधारहिन माणसेच शेवटी विनाशकाले सर्वांना घेऊन जातात. आजही काही गावे, शहरे अशी आहेत की त्यांची प्रगती कुठल्याही बाजूने उदयाला येत नाही. भयंकर आणि भकास दिसणारी गावे किंवा शहरे ‘मी’पणाच्या चक्रव्यूहात अडकलेली असतात. एखाद्या प्रगतशील शहरातील सत्यपूर्ण व्यावहारिक जागृतीमुळे तेथे प्रभावीपणे प्रगतीची पावले उचलताना दिसतात. तर काही काही शहरे मात्र कायम मूलतत्त्वाची पायमल्ली करताना लक्षात येत राहते. मुळातच सात्त्विक प्रवृत्तीचे जागरण ज्या ठिकाणी असते तिथे फुलांचीच बाग फुललेली असते आणि जिथे तामसी प्रवृत्तीचेच प्रदर्शन होत राहते तिथे अराजकतेचे रान कायमच माजलेले दिसते. कलह माजलेला आपल्याला पाहावयास मिळते. शिक्षण, संस्कार, प्रगत विचार, सामर्थ्यशाली कृती यांचा कलश जिथे पुजला जातो तिथेच वैभव उजळून निघते.- विजयराज बोधनकर