शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञानाच्या आवरणामुळे देवजवळ असूनही कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:53 IST

देव तर ह्रदयातच आहे

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

देव आहे का..?स्वामी विवेकानंदांनी एकदा परमहंसांना विचारले, गुरूदेव..! देव या जगात आहे का.? असलाच तर तो कुठे असेल..? रामकृष्णांनी उत्तर दिले - आपल्या जवळ... अगदी अंतर्यामि.. संत म्हणतात,देव जवळी अंतरी ! भेटी नाही जन्मभर !!मग गुरु देव तो जर इतका जवळ असेल तर दिसत का नाही..? भेटत का नाही..? रामकृष्ण म्हणाले,आगपेटीतल्या प्रत्येक काडीत अग्नी असतो पण नरेंद्रा, तो दिसतो का रे..? फुलातल्या प्रत्येक कळीत सुगंध दडलेला असतो पण तो दिसतो का..? प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो दिसतो का..? त्या वस्तूमधील त्याचे अस्तित्व दिसण्याकरिता काही क्रिया आधी घडून जाव्या लागतात. बीजातला वृक्ष दिसण्याकरिता बीजाला भूमी भेटावी लागते, पाणी मिळावे लागते, म्हणजेच वृक्ष दिसतो. प्रत्येकाच्या अंतरंगात देव आहे पण तो दिसावा असे वाटत असेल तर, एकनाथ महाराज म्हणतात - हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय..!या वचनांतून संत एकनाथ महाराज देव प्राप्तीचे वर्म सांगतात. संताकडे गेल्याशिवाय व त्यांची सेवा केल्याशिवाय देवाची ओळख होणार नाही. देव तर ह्रदयातच आहे. गीता माऊली म्हणते - सर्वस्य चाहं ह्रदीसंन्निविष्टो:..!माऊली म्हणतात,तैसा ह्रदयामध्ये मी रामु, असता सर्व सुखाचा आरामु,का भ्रांतासी कामु, विषयावरी..!संत सांगतात - प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये असलेला परमात्मा सामान्य जीवांना विषयांच्या भ्रांतीमुळे दिसत नाही. अज्ञानाच्या आवरणामुळे तो जवळ असूनही कळत नाही. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेली विहीर आहे, आत पाणीही भरपूर आहे पण त्या पाण्यावर शेवाळ्याचे आवरण आलेले आहे त्यामुळे विहीरीत पाणी असून देखील दिसत नाही. पाणी प्यावयाचे असेल तर हाताने शेवाळे दूर करण्याची गरज आहे. अगदी तसेच देव दिसावा असे वाटत असेल तर, अज्ञानरु पी आवरण दूर करण्याची गरज आहे. संत जीवाच्या ठिकाणी असणारे अज्ञानरु पी आवरण दूर करण्याचे काम करतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात,हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. 83298 78467 )

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक