शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 19:36 IST

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी ( बीड ) 

क्रोध हा एक असा विकार आहे की ज्यामुळे माणसाचे समाधान नष्ट होते. आज बहुतांशी लोकांना या विकाराने ग्रासले आहे. याच क्रोधामुळे जीवनात अनेक अनर्थ घडतात. पण प्रश्न असा पडतो की हा क्रोध का बरं निर्माण होतो. .? शांतीसागर एकनाथ महाराज याचे कारण सांगतात; जेथे कामाचे अपूर्ण काज ! तेथे क्रोधाचे खवळे तेज!काम भोगात व्यत्यय आला की क्रोध उत्पन्न होतो. एका विधवा मातेला चार वर्षाचा मुलगा होता. तिचे एका पुरूषावर प्रेम बसले. तो तिला इतका आवडला की; त्याच्या शिवाय ती राहूच शकत नव्हती. पण तो पुरूष मात्र तिला स्वीकारण्यास तयार नव्हता. कारण तिला असणारा मुलगा त्याला मान्य नव्हता. त्या बाईला काम विकाराने पुरते ग्रासले होते. तिची अतृप्त इच्छा पूर्ण होण्याकरिता तिने मुलाचा गळा दाबला व त्याला ठार केले. जन्मदात्या आईला क्रोध विकाराने राक्षसीण बनवले. सुभाषितकार वर्णन करतात; क्रोधमूलमनर्थानां क्रोध:संसार बंधनम् ! धर्म: क्षयकर: क्रोध: तस्मात् क्रोधं परित्यजेत !!या एकाच विकारामुळे प्रपंचात अनेक अनर्थ निर्माण होतात. संत एकनाथ महाराज म्हणतात; क्रोधा ऐसा महान वैरी! जडला असता निज जिव्हारी! जो ज्ञानाची मानी थोरी ! तो संसारी अतिमूर्ख !!जो स्वत:ला आत्मज्ञानी म्हणवून घेत असेल, आणि त्याच्याजवळ क्रोध असेल तर तो आत्मज्ञानी नाही, असेच समजावे. एखादा स्वत:ला संत म्हणून घेत असेल, आणि त्याला क्रोध येत असेल तर तो संत नाही. हे विकार निर्माण होण्याचे एकच कारण आहे, अज्ञानाने देह म्हणजेच सर्वस्व आहे असे समजणे व देहाच्या सुखाकरिता विषयोपभोगा खेरीज दुसरे साधनच नाही असे समजून विकार वश होणे.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात; देहचि आपणपे मानिती ! विषय ते भोग्य म्हणती! यया पर ते न स्मरती आणकि काही!!म्हणूनच हे घातक विकार निर्माण होतात. त्या करिता देहाचे व देहासाठी लागणाऱ्या विषयांचे क्षणभंगुरत्व कळले पाहिजे. हा क्रोध निर्माण होऊच नये असे वाटत असेल तर एकनाथ महाराज रामबाण उपाय सांगतात;वाचे म्हणता शिवनाम ! तया न बाधी क्रोध काम!!

(लेखक के राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक