शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

परमेश्वर जरी मर्त्य दृष्टीचा विषय नसला तरी परमेश्वरी तत्त्व सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 04:49 IST

पार्था, ज्या साधक भक्ताने आपल्या चंचल मनाला आणि विषयासक्त इंद्रियांना जिंकून घेतलेले आहे,

- वामनराव देशपांडेपार्था, ज्या साधक भक्ताने आपल्या चंचल मनाला आणि विषयासक्त इंद्रियांना जिंकून घेतलेले आहे, जो साधनेतच मग्न आहे, असा श्रद्धावान साधक जो असतो ना, त्यालाच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. तोच श्रद्धावान ज्ञानी पुरुषोत्तम शांतीचा अनुभव घेतो. भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाला प्रत्यक्ष युद्धभूमीवर आंतरिक मन:शांतीची दर्शनवाट दाखवली. माणसापाशी परमेश्वराविषयी अतुट श्रद्धा हवी. दृढ विश्वास हवा. ज्ञानभारला विवेक हवा. वैराग्याचे वरदान लाभायला हवे. परमेश्वर जरी मर्त्य दृष्टीचा विषय नसला तरी परमेश्वरी तत्त्व सत्य आहे आणि त्यानेच निर्माण केलेले हे मायावी विश्व, जे आपण दृष्टीने प्रत्यक्ष अनुभवतो, ते असत्य आहे. भगवंतांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,अश्रद्धाना: पुरुषा धर्मस्यास्य परन्तप।अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि।।पार्था, तू दोषदृष्टीरहित आहेस म्हणून तुला पे्रमाने माझ्या अंत:करणातले गुह्य तत्त्व सांगायला सतत उत्सुक असतो. तुझे अशुभापासून रक्षण करणारे, तुला मुक्ती अर्पण करणारे हे गोपनीय ज्ञान ध्यानपूर्वक श्रवण कर. हे श्रेष्ठ तत्त्वज्ञान, सर्वसाधारण अशी जी असंख्य माणसे या विश्वात देहभावनेने जगत आहेत ना, ते दुर्दैवी जीव या सहजसोप्या तत्त्वाचे श्रवणच करीत नाहीत. कारण ती माणसे मूलत: अश्रद्धेय वृत्तीची असतात. त्यांची धर्मावर श्रद्धा नाही. परमेश्वर सत्य आहे यावर विश्वास नाही. या मर्त्य दृश्य विश्वावर श्रद्धेय अंत:करणाने आंधळा विश्वास ठेवणारी, माझ्या अस्तित्वाचा विसर पडलेली ही दुर्दैवी माणसे मला कधीच प्राप्त करून न घेता, जन्म-मृत्यूच्या गरागरा फिरणाऱ्या चक्रावर फिरत राहतात. वेगवेगळ्या योनीत प्रवेश करीत जगत-मरत राहतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक