शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेडी झालो वेडी झालो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:24 IST

-इंद्रजित देशमुख होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार ...

-इंद्रजित देशमुख 

होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार पाडून अकलूजमध्ये विसावणार आहेत.‘ध्यास हा जिवाला पंढरीसी जाऊ।रखुमाई देवीवरा डोळे भरून पाहू।’हा ध्यास मनी धरून आम्ही पंढरीची वाट चालत आहोत. आमच्यासोबत चालणारे काही नवीन वारीला आलेले वारकरी तर हा अनुपम सोहळा पाहून अगदी वेडावून गेलेत आणि खरंच आहे परमार्थात वेडचं व्हावं लागतं. म्हणून तर आमच्या मुक्ताबाई एके ठिकाणी म्हणतात,‘वेडी झालो वेडी झालो।वेडीयांच्या गावा आलो।।आम्हा पुसू नका काही।आम्ही माणसांत नाही।।मुक्ताबाई झाली वेडी।पदर प्रपंचाचा फाडी।।’मुक्ताईच सांगणंच खूप विलक्षण आहे. तिच्या सांगण्यातील विलक्षण भावामुळेच ताटीचं दार लावून बसलेल्या आमच्या ज्ञानदादांच्या डोळ्यातील पाणी शांत झालं आणि दादांनी ताटीचं लावलेलं दार उघडलं. हळव्या ज्ञानदादांना त्यावेळी लहानग्या मुक्ताईनं समजावलं नसतं, तर ज्ञानदादांनी लावलेलं ते ताटीचं दार या समाजासाठी कधीच उघडलं नसतं. केवढा मोठा उपकार या लहानग्या चिमुरडीचा जिला लहान वयात मुक्ताबाई म्हणजेच बाई म्हणून संबोधलं जातं आणि अविवाहित असताना मुक्ताई म्हणजेच आई म्हणून संबोधलं जातं.वारकरी संप्रदाय सर्वांना सामावून घेतो. यातील स्त्री संतांचे योगदान सर्वश्रूत आहे. संत शब्दाची निर्मिती मुक्तार्इंनी केली आहे. ताटीच्या अभंगात जग वन्ही असेल तर संतांनी पाणी व्हायचा उपदेश मुक्ताई करतात. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या सुप्रसिद्ध अभंगात विठ्ठल नामदेवादि भक्तांना संगे घेऊन जात असल्याचे वर्णन आहे. हे भक्त विठ्ठलाच्या खांद्यावर, कडेवर हात धरून वा बोट धरून वा त्याला लगटून चालले आहेत. ज्ञानदेव आणि मुक्ताई माय ‘पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर’ विठ्ठलापासून काही अंतरावरून चालली आहे. ज्ञानदेव पुढे का, तर विठ्ठलाला मार्ग दाखविण्या-करिता आणि मुक्ताई मागे का? तर या मंडळींपैकी कुणी आडवाटेला लागला, रेंगाळला वा थकून बसला तर त्याला सांभाळण्याकरिता. कारण मुक्ताईचा तो अधिकारच आहे.संत बहेणि पंढरीला का जायचे याबद्दल पंढरीचा महिमा सांगताना म्हणतात, पंढरीसारखा क्षेत्रमहिमा कोठेही नाही. कारण पंढरीसारखी चंद्रभागा, भीमातीर, वाळवंटातील हरिकथा कोठे आहेत. तसेच‘ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख ।ऐसा नामघोष सांगा कोठे ।।बहेणि म्हणे आम्हा अनाथाकारण ।पंढरी निर्माण केली देवे ।।आमच्यासारख्या अनाथांना जे प्रेमापासून वंचित आहेत यांना प्रेमसुखाचा आनंद लुटायचा असेल तर हरिदासांच्या संगतीशिवाय निरपेक्ष प्रेमाचा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच देवाने पंढरीची निर्मिती करून आमच्यावर उपकारच केले आहेत. पंढरीच्या वारीत‘पायी वारी घडो। देह संताघरी पडो।’या हेतूने वाट चालणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. यातील अनेकजणी निरक्षर आहेत. पण, यांच्या चेहºयावरचा भक्तिभाव एवढा दिव्य असतो की, त्यांच्या मुखातून बाहेर पडणाºया ओव्या, अभंग वारीचा व जीवनाचा रस वाढवत चालतात.‘पंढरीच्या वाटे तुळशी बुक्क्याचा येतो वास।कसे गं सांगू तुला विठ्ठलाचा गं मला ध्यास।।पंढरीच्या वाटे दिंड्यांची झाली दाटी।काय गं सांगू तुला भावाबहिणींच्या होती भेटी।।ज्यांच्या घरातच पंढरीची वारी आहे, अशातील बहीण-भाऊ वेगवेगळ्या गावांतून आपापल्या दिंडीतून निघतात. एका दिंडीत भाऊ, तर दुसºया दिंडीत बहीण अशांच्या जिवाभावाच्या भेटी या वारीच्या वाटेवरच होत असतात. किंवा अनेक आयाबहिणींना भाऊ नाहीत अशांना जमलेले सर्व वारकरी स्त्री-पुरुष भावाबहिणींचे नाते जपत वाटचाल करतात. या अठरा दिवसांच्या वाटचालीत कुठेही स्त्रीची मानहानी होत नाही, अवहेलना होत नाही.वारीच्या या उत्तरार्धात विठ्ठलाचा रंग सर्वांच्या अंगावर चढतो आहे. विठ्ठलाशी तनामनाने सर्व स्त्री-पुरुष वारकरी एकरूप होतात आणि विसाव्याच्या ठिकाणी या आया-बहिणी कडाकडा बाटे मोडून विठोबाची दृष्ट काढतात.‘लिंबलोण उतरुनी आता ओवाळीन काया ।कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया ।।जना-सखू काढी दृष्ट भक्तीचे ते मोहºया मीठप्रपंचाचा आला वीट लागते पाया ।।कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया।असा हा निरागस लोभस भाव पाहून मन हरखून जाते. 

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)