शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

वेडी झालो वेडी झालो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:24 IST

-इंद्रजित देशमुख होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार ...

-इंद्रजित देशमुख 

होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार पाडून अकलूजमध्ये विसावणार आहेत.‘ध्यास हा जिवाला पंढरीसी जाऊ।रखुमाई देवीवरा डोळे भरून पाहू।’हा ध्यास मनी धरून आम्ही पंढरीची वाट चालत आहोत. आमच्यासोबत चालणारे काही नवीन वारीला आलेले वारकरी तर हा अनुपम सोहळा पाहून अगदी वेडावून गेलेत आणि खरंच आहे परमार्थात वेडचं व्हावं लागतं. म्हणून तर आमच्या मुक्ताबाई एके ठिकाणी म्हणतात,‘वेडी झालो वेडी झालो।वेडीयांच्या गावा आलो।।आम्हा पुसू नका काही।आम्ही माणसांत नाही।।मुक्ताबाई झाली वेडी।पदर प्रपंचाचा फाडी।।’मुक्ताईच सांगणंच खूप विलक्षण आहे. तिच्या सांगण्यातील विलक्षण भावामुळेच ताटीचं दार लावून बसलेल्या आमच्या ज्ञानदादांच्या डोळ्यातील पाणी शांत झालं आणि दादांनी ताटीचं लावलेलं दार उघडलं. हळव्या ज्ञानदादांना त्यावेळी लहानग्या मुक्ताईनं समजावलं नसतं, तर ज्ञानदादांनी लावलेलं ते ताटीचं दार या समाजासाठी कधीच उघडलं नसतं. केवढा मोठा उपकार या लहानग्या चिमुरडीचा जिला लहान वयात मुक्ताबाई म्हणजेच बाई म्हणून संबोधलं जातं आणि अविवाहित असताना मुक्ताई म्हणजेच आई म्हणून संबोधलं जातं.वारकरी संप्रदाय सर्वांना सामावून घेतो. यातील स्त्री संतांचे योगदान सर्वश्रूत आहे. संत शब्दाची निर्मिती मुक्तार्इंनी केली आहे. ताटीच्या अभंगात जग वन्ही असेल तर संतांनी पाणी व्हायचा उपदेश मुक्ताई करतात. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या सुप्रसिद्ध अभंगात विठ्ठल नामदेवादि भक्तांना संगे घेऊन जात असल्याचे वर्णन आहे. हे भक्त विठ्ठलाच्या खांद्यावर, कडेवर हात धरून वा बोट धरून वा त्याला लगटून चालले आहेत. ज्ञानदेव आणि मुक्ताई माय ‘पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर’ विठ्ठलापासून काही अंतरावरून चालली आहे. ज्ञानदेव पुढे का, तर विठ्ठलाला मार्ग दाखविण्या-करिता आणि मुक्ताई मागे का? तर या मंडळींपैकी कुणी आडवाटेला लागला, रेंगाळला वा थकून बसला तर त्याला सांभाळण्याकरिता. कारण मुक्ताईचा तो अधिकारच आहे.संत बहेणि पंढरीला का जायचे याबद्दल पंढरीचा महिमा सांगताना म्हणतात, पंढरीसारखा क्षेत्रमहिमा कोठेही नाही. कारण पंढरीसारखी चंद्रभागा, भीमातीर, वाळवंटातील हरिकथा कोठे आहेत. तसेच‘ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख ।ऐसा नामघोष सांगा कोठे ।।बहेणि म्हणे आम्हा अनाथाकारण ।पंढरी निर्माण केली देवे ।।आमच्यासारख्या अनाथांना जे प्रेमापासून वंचित आहेत यांना प्रेमसुखाचा आनंद लुटायचा असेल तर हरिदासांच्या संगतीशिवाय निरपेक्ष प्रेमाचा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच देवाने पंढरीची निर्मिती करून आमच्यावर उपकारच केले आहेत. पंढरीच्या वारीत‘पायी वारी घडो। देह संताघरी पडो।’या हेतूने वाट चालणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. यातील अनेकजणी निरक्षर आहेत. पण, यांच्या चेहºयावरचा भक्तिभाव एवढा दिव्य असतो की, त्यांच्या मुखातून बाहेर पडणाºया ओव्या, अभंग वारीचा व जीवनाचा रस वाढवत चालतात.‘पंढरीच्या वाटे तुळशी बुक्क्याचा येतो वास।कसे गं सांगू तुला विठ्ठलाचा गं मला ध्यास।।पंढरीच्या वाटे दिंड्यांची झाली दाटी।काय गं सांगू तुला भावाबहिणींच्या होती भेटी।।ज्यांच्या घरातच पंढरीची वारी आहे, अशातील बहीण-भाऊ वेगवेगळ्या गावांतून आपापल्या दिंडीतून निघतात. एका दिंडीत भाऊ, तर दुसºया दिंडीत बहीण अशांच्या जिवाभावाच्या भेटी या वारीच्या वाटेवरच होत असतात. किंवा अनेक आयाबहिणींना भाऊ नाहीत अशांना जमलेले सर्व वारकरी स्त्री-पुरुष भावाबहिणींचे नाते जपत वाटचाल करतात. या अठरा दिवसांच्या वाटचालीत कुठेही स्त्रीची मानहानी होत नाही, अवहेलना होत नाही.वारीच्या या उत्तरार्धात विठ्ठलाचा रंग सर्वांच्या अंगावर चढतो आहे. विठ्ठलाशी तनामनाने सर्व स्त्री-पुरुष वारकरी एकरूप होतात आणि विसाव्याच्या ठिकाणी या आया-बहिणी कडाकडा बाटे मोडून विठोबाची दृष्ट काढतात.‘लिंबलोण उतरुनी आता ओवाळीन काया ।कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया ।।जना-सखू काढी दृष्ट भक्तीचे ते मोहºया मीठप्रपंचाचा आला वीट लागते पाया ।।कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया।असा हा निरागस लोभस भाव पाहून मन हरखून जाते. 

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)