शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

वेडी झालो वेडी झालो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:24 IST

-इंद्रजित देशमुख होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार ...

-इंद्रजित देशमुख 

होतो जयजयकार गर्जत अंबर।मातले हे वैष्णव वीर रे।।तुका म्हणे सोपी केली पायवाट।उतरावया भवसागर रे।।अशा सात्त्विक आवेशात हा वैष्णवांचा मेळा आज माउली ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत नातेपुतेहून निघून पुरंदवडे येथील पहिला गोल रिंगण सोहळा अनुभवून माळशिरस येथे विसावणार आहे, तर आमचे जगद्गुरू तुकोबाराय आज सराटीतून निघून माने विद्यालयाजवळील गोल रिंगण सोहळा पार पाडून अकलूजमध्ये विसावणार आहेत.‘ध्यास हा जिवाला पंढरीसी जाऊ।रखुमाई देवीवरा डोळे भरून पाहू।’हा ध्यास मनी धरून आम्ही पंढरीची वाट चालत आहोत. आमच्यासोबत चालणारे काही नवीन वारीला आलेले वारकरी तर हा अनुपम सोहळा पाहून अगदी वेडावून गेलेत आणि खरंच आहे परमार्थात वेडचं व्हावं लागतं. म्हणून तर आमच्या मुक्ताबाई एके ठिकाणी म्हणतात,‘वेडी झालो वेडी झालो।वेडीयांच्या गावा आलो।।आम्हा पुसू नका काही।आम्ही माणसांत नाही।।मुक्ताबाई झाली वेडी।पदर प्रपंचाचा फाडी।।’मुक्ताईच सांगणंच खूप विलक्षण आहे. तिच्या सांगण्यातील विलक्षण भावामुळेच ताटीचं दार लावून बसलेल्या आमच्या ज्ञानदादांच्या डोळ्यातील पाणी शांत झालं आणि दादांनी ताटीचं लावलेलं दार उघडलं. हळव्या ज्ञानदादांना त्यावेळी लहानग्या मुक्ताईनं समजावलं नसतं, तर ज्ञानदादांनी लावलेलं ते ताटीचं दार या समाजासाठी कधीच उघडलं नसतं. केवढा मोठा उपकार या लहानग्या चिमुरडीचा जिला लहान वयात मुक्ताबाई म्हणजेच बाई म्हणून संबोधलं जातं आणि अविवाहित असताना मुक्ताई म्हणजेच आई म्हणून संबोधलं जातं.वारकरी संप्रदाय सर्वांना सामावून घेतो. यातील स्त्री संतांचे योगदान सर्वश्रूत आहे. संत शब्दाची निर्मिती मुक्तार्इंनी केली आहे. ताटीच्या अभंगात जग वन्ही असेल तर संतांनी पाणी व्हायचा उपदेश मुक्ताई करतात. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या सुप्रसिद्ध अभंगात विठ्ठल नामदेवादि भक्तांना संगे घेऊन जात असल्याचे वर्णन आहे. हे भक्त विठ्ठलाच्या खांद्यावर, कडेवर हात धरून वा बोट धरून वा त्याला लगटून चालले आहेत. ज्ञानदेव आणि मुक्ताई माय ‘पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर’ विठ्ठलापासून काही अंतरावरून चालली आहे. ज्ञानदेव पुढे का, तर विठ्ठलाला मार्ग दाखविण्या-करिता आणि मुक्ताई मागे का? तर या मंडळींपैकी कुणी आडवाटेला लागला, रेंगाळला वा थकून बसला तर त्याला सांभाळण्याकरिता. कारण मुक्ताईचा तो अधिकारच आहे.संत बहेणि पंढरीला का जायचे याबद्दल पंढरीचा महिमा सांगताना म्हणतात, पंढरीसारखा क्षेत्रमहिमा कोठेही नाही. कारण पंढरीसारखी चंद्रभागा, भीमातीर, वाळवंटातील हरिकथा कोठे आहेत. तसेच‘ऐसे हरिदास ऐसे प्रेमसुख ।ऐसा नामघोष सांगा कोठे ।।बहेणि म्हणे आम्हा अनाथाकारण ।पंढरी निर्माण केली देवे ।।आमच्यासारख्या अनाथांना जे प्रेमापासून वंचित आहेत यांना प्रेमसुखाचा आनंद लुटायचा असेल तर हरिदासांच्या संगतीशिवाय निरपेक्ष प्रेमाचा अनुभव कुठे मिळणार? म्हणूनच देवाने पंढरीची निर्मिती करून आमच्यावर उपकारच केले आहेत. पंढरीच्या वारीत‘पायी वारी घडो। देह संताघरी पडो।’या हेतूने वाट चालणाऱ्या स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. यातील अनेकजणी निरक्षर आहेत. पण, यांच्या चेहºयावरचा भक्तिभाव एवढा दिव्य असतो की, त्यांच्या मुखातून बाहेर पडणाºया ओव्या, अभंग वारीचा व जीवनाचा रस वाढवत चालतात.‘पंढरीच्या वाटे तुळशी बुक्क्याचा येतो वास।कसे गं सांगू तुला विठ्ठलाचा गं मला ध्यास।।पंढरीच्या वाटे दिंड्यांची झाली दाटी।काय गं सांगू तुला भावाबहिणींच्या होती भेटी।।ज्यांच्या घरातच पंढरीची वारी आहे, अशातील बहीण-भाऊ वेगवेगळ्या गावांतून आपापल्या दिंडीतून निघतात. एका दिंडीत भाऊ, तर दुसºया दिंडीत बहीण अशांच्या जिवाभावाच्या भेटी या वारीच्या वाटेवरच होत असतात. किंवा अनेक आयाबहिणींना भाऊ नाहीत अशांना जमलेले सर्व वारकरी स्त्री-पुरुष भावाबहिणींचे नाते जपत वाटचाल करतात. या अठरा दिवसांच्या वाटचालीत कुठेही स्त्रीची मानहानी होत नाही, अवहेलना होत नाही.वारीच्या या उत्तरार्धात विठ्ठलाचा रंग सर्वांच्या अंगावर चढतो आहे. विठ्ठलाशी तनामनाने सर्व स्त्री-पुरुष वारकरी एकरूप होतात आणि विसाव्याच्या ठिकाणी या आया-बहिणी कडाकडा बाटे मोडून विठोबाची दृष्ट काढतात.‘लिंबलोण उतरुनी आता ओवाळीन काया ।कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया ।।जना-सखू काढी दृष्ट भक्तीचे ते मोहºया मीठप्रपंचाचा आला वीट लागते पाया ।।कोणाची झाली दृष्ट माझ्या पंढरीराया।असा हा निरागस लोभस भाव पाहून मन हरखून जाते. 

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)