शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कसा ठेवाल मनावर ताबा? जाणून घ्या सोप्या शब्दांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 11:57 IST

विचारांची चुकीची पद्धत आणि दिशा बदलली तर आपला स्वभाव बदलतो. इतरांशी असलेले संबंध बदलतात.

- रमेश सप्रेआज अजय घरी आला तेव्हा भीतीनं पार गोठून गेला होता. त्याच्या डोळ्यासमोर आधीच्या दोन परीक्षांचे निकाल तरंगत होते. पहिल्या परीक्षेत तो दोन विषयांत नापास झाला होता. त्या वेळी त्याच्या बाबांनी त्याला संपूर्ण दिवस उपाशी ठेवलं होतं. त्या धसक्यानं दुसऱ्या परीक्षेला तो जाम घाबरला होता. परिणाम चार विषयात नापास. बाबांनी रात्रभर घराबाहेर ठेवलं होतं त्याला. आई म्हणत होती, ‘अजू घाबरतो अंधाराला. त्याला मागच्या अंगणात जातानाही रात्री सोबत लागते.’ पण बाबा म्हणजे जमदग्नीचा अवतार. त्यांनी कुणाचं काहीही ऐकलं नाही. त्याला अगदी बागेच्या फाटकाबाहेर ठेवलं नि कुलूप लावलं. दिवसा कुत्र्यांना प्रचंड भिणाऱ्या अजयला रात्री रस्त्यावर भटकणाऱ्या नि त्यांच्यावर त्या गल्लीतील अखंड भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे ती काळरात्र कधी संपतेय असं वाटत होतं. फाटकाबाहेरच्या एका दगडाच्या आसऱ्यानं शरीराची मुटकुळी करून बिचारा रात्रभर पडून राहिला.त्याचे बाबा भुजंगराव शिक्षण खात्यात शाळा तपासनीस (स्कूल इन्स्पेक्टर) होते. त्यांच्या कडक स्वभावामुळे सारेजण त्यांना टरकून असत. घरी ते येताहेत असं कळलं की सारं चिडीचूप. आजूबाजूचे गल्लीतले लोकसुद्धा त्यांना दुरून येताना पाहून एकमेकांना म्हणायचे, ‘आला रे, वाहनासकट यम!’ भुजंगराव होतेही तसेच. काळेकभिन्न नि आडदांड. कार्यालयातले सहकारी आपसात त्यांना ‘काळसर्प भुजंग’ म्हणायचे. कुणाला केव्हा दंश करील याचा नेम नसे. असो.आज साक्षात मृत्यूच अजयसमोर उभा होता. कारण परीक्षेच्या वेळी मनावर येणारं दडपण आणि अभ्यासावेळी परीक्षेच्या भीतीनं पोटात उठणारा गोळा याचा अटळ परिणाम म्हणून या तिसऱ्या परीक्षेत तो सहा विषयात नापास झाला होता. आईच्या आधारानं थरथरत वादळातल्या केळीच्या झाडासारखा उभा होता. आज बाबा आपल्याला ठार मारणार याची त्याला खात्री होती. बिचाऱ्या आईचाही नाइलाज होता आणि नाइलाजाला इलाज नसतोच ना?अखेर भुजंगराव घरी आले. आज मुलांची प्रगतिपुस्तकं दिली हे त्यांना कार्यालयातच कळलं होतं. बाबांनी आल्या आल्या हाक मारली, ‘अज्जू बेटा..’ या कधीही न मारलेल्या प्रेमळ हाकेनं अजय यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. अजयच्या धमन्यांतील गोठलेलं रक्त वाहू लागलं. त्याला परिस्थितीचा अंदाज येईना. बाबांकडे जाऊन सारं धैर्य एकत्र करून म्हणाला, ‘काय बाबा?’ ‘अरे त्या पिशवीत काय आहे ते आण पाहू! अजय पिशवीकडे गेला खरा पण त्याची छाती अजून धडधडतच होती. पिशवीत एक फुलांचा हार, थोडी फुलं, अगरबत्तीचा पुडा, एक सी.डी. आणि एक पुडी होती. अजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.. म्हणजे बाबा आपली पूजा करणार की काय? त्यांना कळलेलं दिसतंय की आपण सहा विषयात नापास झालो आहोत. त्यानं ती पिशवी थरथरत बाबांच्या हातात दिली. बाबांनी शांतपणे त्या साऱ्या वस्तू देवघरात ठेवल्या नि अजयला जवळ घेऊन त्याच्या केसातून, पाठीवरून हात फिरवत म्हणाले, ‘आज तुझं प्रगतीपुस्तक मिळालं ना रे? काय म्हणतोय निकाल?’ अजय चाचरत म्हणाला, ‘बाबा यावेळी सहा विषयात..’ त्याचं वाक्य पुरं होण्यापूर्वी बाबाच म्हणाले, ‘नापास झालायस ना? हरकत नाही. अजून एक परीक्षा राहिलीय ना? त्यात चांगलं पास होण्याचा प्रयत्न कर. नाहीच जमलं तर तुला आपल्या रघुकाकाचं गॅरेज आहे ना, गाड्या दुरुस्त करण्याचं? तिथं पाठवू हं. तुला आत्ताच सर्व गाड्यांची मॉडेल्स, इंजिनं याबद्दल खूप माहिती आहे ना रे?अजयचा स्वत:वर नि बाबांच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. आईच पुढे होऊन म्हणाली, ‘अरे अज्जू, बाबा खरंच म्हणताहेत. कदाचित शाळेतल्या पुस्तकी शिक्षणापेक्षा गाड्या दुरुस्तीसारख्या तांत्रिक शिक्षणात तू चांगली प्रगती करू शकशील. हो, ना हो!बाबांनी संमतीदर्शक मान हलवल्यावर घरातलं सारं वातावरण निवळलं. पण बाबांच्या वागण्यात अचानक हे परिवर्तन कसं घडलं याबद्दल आई अजय दोघांच्या मनात शंका होती. ती बाबांनीच दूर केली. ‘आज ऑफिसमध्ये एक सद्गृहस्थ आले होते एका कामासाठी. व्यवसायानं ते पालकांचे समुपदेशक होते. आपल्या मुलांना समजून कसं घ्यायचं याविषयी बोलताना सहज म्हणाले, ‘तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना? इन्स्ट्रक्टरही (प्रशिक्षक) आहात ना? म्हणजे तुमचं काम आहे. दुसऱ्याची इन्स्पेक्शन (तपासणी) करण्याचं, दुसऱ्यांना इन्स्क्ट्रक्शन देण्याचं (म्हणजे प्रशिक्षित करण्याचं) पण स्वत:ची तपासणी (इंट्रोस्पेक्शन) कधी करता का? स्वत:ला सूचना (ऑटो  सजेशन) कधी देता का? तसं केलंत तर मुलांना, इतरांना समजून घेणं अधिक सोपं जाईल तुम्हाला. आत्मनिरीक्षण नि आत्मपरीक्षण करून बघा.’‘त्यांच्या या उद्गरांनी माझे डोळे उघडले. दृष्टी बदलली. भुजंगरावांच्या शब्दाशब्दातून पश्चातापाची आसवं ओघळत होती. त्यांनी त्या समुपदेशकांच्या सी.डी वरचं चित्र पहिलं. शांत, निस्तरंग जलाशय, वरती मोकळं निळं असीम आकाश आणि शांतप्रशांत वाटणारा आजुबाजूचा निसर्ग. सी.डीचं नाव होतं -‘माईंड युवर माईंड’आपलंही असंच भुजंगरावांसारखं असतं. विचारांची चुकीची पद्धती नि दिशा बदलली तर आपला स्वभाव बदलतो. इतरांशी असलेले संबंध बदलतात. मुख्य म्हणजे आपल्यात एका नव्या व्यक्तीचा जन्म होतो. पण हे एका दिवसात होत नाही. अभिषेकाच्या पाण्यासारखं संततधारेनं जीवनाविषयीचा दृष्टीकोन बदलायचा असतो. त्यासाठी श्रवण-वाचन-चिंतन-ध्यान आणि सत्संग म्हणजे सदाचरणी, सद्विचारी व्यक्तींची साथसंगत. यासाठी भुजंगरावांना उपयोगी पडली ती ‘माइंड युवर माइंड (म्हणजे तुमचं मन तुम्हीच सांभाळा) ही ध्वनिफित. ती पेन ड्राइव्हवर जाताना ते सदैव ऐकत असतात. त्यावर सतत चिंतन करत राहतात. आता घरचे आणि दारचे सारे त्यांना भुजंग म्हणजे काळसर्प म्हणत नाहीत, तर ज्याच्यावर शांत पहुडलेले विष्णु भगवान असतात तो शेषनाग. शातांकारं भुजगशयनम्.!  

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक