शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

सद्गुणी व्यक्तीचा सहवास तो खरा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:49 IST

सद्गुणाची वाढ ही सद्गुणाच्या संगतीने जलद गतीने होते.

सुसंगती सदा घडोसुजन वाक्य कानी पडो...!कलंक मतीचा झडोविषय सर्वथा नावडो...!!

व्यक्तिविकासात संगतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाची जडण-घडण ही सभोवतालच्या वातावरणावर आणि संगतीवर बहुतांश वेळी होताना दिसते. याला काही अपवाद असेलही, परंतु तो अपवादच. मोरोपंतांनीही हेच विशद केले असून फक्त संगतच नाही, तर चांगले विचारदेखील ऐकण्यात येणे गरजेचे आहे. जेणेकरून विकृत मनोवृत्तीचा पाडाव केला जाऊ शकतो. बाह्यांगाची नक्कल अथवा प्रतिकृती सजीव स्वरुपात अस्तित्वात आणणे अशक्य आहे. तथापी, गुण-दोष-विकृती सहज अंगीकारली जाते. म्हणूनच म्हटले जाते...ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण घेतला... सद्गुणाची वाढ ही सद्गुणाच्या संगतीने जलद गतीने होते. मनाची अवस्था ही बाह्यांगावरून निश्चल न होता अंतरंगावरून होते. म्हणून इंग्रजी म्हणीप्रमाणे व्यक्तीची ओळख ही त्याच्या सोबतच्या मित्रांवरून होते, असे म्हटले जाते.

समविचारी माणसांची मैत्री फार लवकर होते. तसेच वाईट गुणांचा गुणाकार होण्यास वेळ लागत नाही. चांगल्या व्यक्तींचा सहवास हा चांगल्याच प्रवृत्तीची जोपासना करीत असते. परिसाच्या संगतीत लोखंड आले तर त्याचे सोने होते. चंदनाच्या संगतीत बोरी-बाभळी जरी वाढली तरी तीस चंदनाचा सुवास आल्याशिवाय राहात नाही. याउलट कडुलिंबावर चढलेला वेल हा कडूपणा घेणार हे निश्चितच. म्हणूनच सद्गुणी व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीचा कायापालट होतो. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर माऊलींनीदेखील विश्वकल्याणची संकल्पना रुजविताना म्हटले आहेच...

जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रति वाढोभूता परस्परा जडोमैत्र जीवांचे...! 

म्हणून महान व्यक्ती या सत्कार्यासाठी कार्य करताना दिसतात, ना की सत्कारासाठी. त्याचप्रमाणे चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी मनापासून झिजावे लागते, दिखाव्याकरिता नाही. माणूस ज्याच्या संगतीत राहतो त्यांचे चारित्र्य व स्वभाव आत्मसात करतो.

आपण ज्यांची मैत्री स्वीकार करतो त्याचा आपल्या कार्यावर आणि चैतन्यावर निश्चितच प्रभाव पडतो. म्हणूनच सुस्वभावी व जागृत मनोवृत्तीच्या लोकांची संगती लाभणे आवश्यक आहे. आध्यात्मिक व्यक्तीच्या संगतीत अलौकिक शक्तींची वृद्धी होते. चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याचा विवेक जागृत होतो. विवेकी वृत्ती जागृत ठेवूनच मित्र निवडावे लागतात. समाजहित जरी खरी असले, तरी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील फरकदेखील समजून घेणे गरजेचे आहे. संगतीत मिळणाऱ्या सोबत्यावर व्यक्तिमत्त्व विकासाची मुळे रोवली जातात. ‘युवर फ्रेंड कॅन मेक यू, ऑर ब्रेक यू’ हे देखील वाक्य तेवढेच खरे आहे. संत रामदासांनी अत्यंत मार्मिक शब्दात चांगल्या संगतीचा ऊहापोह केला आहे. ते म्हणतात...

आपला आपण करी कुडावातो आपला मित्र जाणावाआपला नाश करी तोसमजावा वैरी ऐसा...!जो व्यक्ती स्वत: आपला घात करून घेतो, तो पातकी असतो. उद्योगी व शहाण्या माणसाच्या संगतीने आपण उद्योगी व शहाणे, तर आळशी व मूर्ख माणसांच्या संगतीने आपण आळशी व मूर्खच बनतो. 

- डॉ. भालचंद्र ना. संगनवार ( लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक