शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 03:49 IST

गीतेच्या सहवासात आपण जर का राहिलो, तर आपला निश्चितपणे उद्धार होतो. प्रस्थान-त्रयीमध्ये गीतेला स्थान आहे. एवढे गीतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

- वामन देशपांडे

भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र मुखातून गंगोद्यासारखी गीता प्रसन्न झाली, ती कुरुक्षेत्रावर, प्रत्यक्ष युद्धभूमीवर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे निमित्त करून विश्वातल्या मानवी समूहाला जो उपदेश केला, ती ही श्रीमद्भगवतगीता ज्याला आपल्या जगणार असलेल्या एकूणच आयुष्याचे कल्याण व्हावे असे वाटते, त्या माणसाने गूढरम्य अशा या गीतेच्या अखंड सहवासात राहावे. गीतेच्या सहवासात आपण जर का राहिलो, तर आपला निश्चितपणे उद्धार होतो. प्रस्थान-त्रयीमध्ये गीतेला स्थान आहे. एवढे गीतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपले हित साधायचे असेल, तर गीतेला पर्याय नाही, हे जाणून घेणे मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. परमात्म्याची प्राप्ती करून देणारी गीता, मानवी मनाला परमशांतीचा साक्षात अनुभव देते. एक लक्षात घ्या की, गीतेत गुठल्याही मतप्रणालीविषयी आग्रही भूमिका नाही. फक्त गीतेने एकच आग्रह केला आहे. तो म्हणजे, प्रत्येकाने आपले कल्याण करून घ्यावे. गीतेमध्ये तर कुठल्याही स्वरूपाचे मतभेद नाहीत. या मर्त्य विश्वात एक परमात्मा सत्य आहे, त्याचे अप्रतिम दर्शन फक्त गीताच घडवते. गीता हा एक अद्भुत ग्रंथ आहे. त्यात प्रकट झालेले तत्त्वज्ञान हे वेदान्ताचे सार आहे. गीता श्लोकांचा खोलवर जाऊन जर नित्य वेध घेतला, तर एक गोष्ट आपल्या त्वरित लक्षात येते की, गीतेतले तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या भक्तिपाटावर स्थिर आसनमांडी घालून बसावे लागते. त्या संदर्भात, ज्ञानदेव श्रोत्यांना प्रेमाने सांगतात,अहो अर्जुनाचिये पांनी । जे परिसणया योग्य होती।तिही कृपा करूनि संती । अवधान यावे ।।श्रोतहो, तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगतो की, मन एकाग्र करून, या गीतेमधल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थानुकूल वेध घेत, मोक्षप्राप्तीचा आनंद प्रत्यक्ष उपभोगावा. त्यासाठी प्रथम एक गोष्ट निष्ठापूर्वक करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे भक्तश्रेष्ठ अर्जुन ज्या श्रेष्ठ भगवंत भावनेने ज्या भक्तिपाटावर बसला होता ना, त्याच पंक्तीत बसून गीताश्रवण करावे. श्रोतेहो, कृष्णार्जुन संवाद अलौकिक होता. प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी कृष्णमुखातून गीता प्रगट झाली होती. या गीतेचा अत्यंत श्रद्धेय आणि उत्कट भावस्थितीत वेध घेणे आवश्यक आहे. एक लक्षात घ्या की, गीतेमधील श्रीकृष्णार्जुन संवादाचा आपण निशब्द अवस्थेत वेध घेत, पुन्हा आपल्याशीच संवाद साधावा.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक