शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

जीव सर्वाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 05:24 IST

आत्यंतिक दु:खातून निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच समग्र जीवजातीचं ध्येय आहे. मोक्ष हाच त्याचा ध्यास आहे. त्या शाश्वत सुखाचा ...

आत्यंतिक दु:खातून निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच समग्र जीवजातीचं ध्येय आहे. मोक्ष हाच त्याचा ध्यास आहे. त्या शाश्वत सुखाचा अधिकारी फक्त जीव आहे, असं परमेश्वराला अपेक्षित आहे. परिसस्पर्शानं सोनं होण्याचा अधिकार लोखंडाला आहे. खापराला किंवा दगडाला नाही. तसाच मोक्षाधिकार फक्त जीवालाच आहे. तूप होण्याचा अधिकार दुधालाच असतो. पण त्याला आधी दही, नंतर लोणी, त्यानंतर रवीच्या मंथनातून बाहेर पडावं लागतं. अंतिमत: कढईत तापून सुलाखून शुद्ध व सिद्ध व्हावं लागतं. मगच तुपाचं मूल्य वाढतं. पशू, पक्षी, वनस्पती, दगड, माती, प्रत्येकात गुणधर्माचे काही अंशी अधिकार असतात. कोकिळेचा आवाज, सुगरणीचं घर, वनौषधी, मृगगंध इत्यादी. पण हे अपूर्ण आहे. मानवी जीवाला सर्वाधिकार आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलतीम्हणूनी नरदेहीच प्राप्ती परलोकाचीजीवाचं श्रेष्ठत्व त्यांनी सांगितलं आहे. गती व विकास केवळ मानवी देहातच आहे. कुठल्याही क्षेत्रात जीव हा अग्र्रेसर असल्याचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणून ज्याला काहीही जमतं तो सर्वत्र गाजतो. त्याला चोर, पोलीस, शिक्षक, डाकू, सज्जन, पशू व नारायणही होता येतं. माणसाचा कचरा होतो. त्याचा देवही होतो. तो नरकात जातो, मोक्षही गाठतो. हा सागराचा तळ गाठतो व चंद्रावर पायही ठेवतो. माणसांना मारता मारता तो क्षणात बदलतो. त्याची अशी एकाहून एक अनेक रूपं पाहून राष्ट्रसंत म्हणतात -जंबूक मेंढ्या कुत्रे डुकरे, मिळे बहुत पण काय करूत्यांना शहाणे करण्यासाठी, मला हवा माणूस भलात्यात स्वार्थी माणसाने जाती निर्माण केल्या.व काहींचे अधिकार हिरावून घेतले व स्वनिर्मित कल्पना धर्मग्रंथात पेरल्या. धर्मनियम तयार करून माणसाचे तुकडे केले.

- बा. भो. शास्त्री