शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

मनाच्या प्रसन्नतेवरच आरोग्य अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 07:22 IST

मानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नतेवरच सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मात करते. हळवे मन छोट्या-छोट्या गोष्टींवरून कमजोर बनते. मनाची चंचलता ही तुमच्या प्रगतीला आड येते. चंचल मन असल्यास जीवनात अस्थिरता येते. स्थिर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवा. दिवसागणिक-क्षणोक्षणी मनात येणारे विचार कुठल्याही कार्याला प्रेरणा देतात किंवा नुकसानदायक ठरतात. संयमशील मन मनाची निर्णयक्षमता वाढवते. कर्म चांगले करा मनाला विकारापासून दूर ठेवा. मन एका ठिकाणी न बसता सर्वत्र फिरते. मनाला आवर घालणे महाकठीण काम असते. मनाला नम्र बनवायचे असेल तर ध्यानधारणा-योग यांचा आधार घ्यावा लागतो. ‘मन’चा शब्दाचा उलट अर्थ केला तर नम: होता. नेहमी तुम्ही सद्वृत्तीत मन रमवा. सद्वृत्ती मनाला आवर घालते. वासनांना आळा घालण्यासाठी मनाचा उपयोग होतो. सर्वप्रथम कुठलाही विचार मनात येतो. त्यानुसार बुद्धी कार्याला प्रवृत्त करते. मनाची स्थिती-गती-लय- आपल्या वैचारिकतेवर अवलंबून असते. ‘मन गया तो जाने दे। मत जाने दे शरीर। ना खिचे कमान को कहा लगेगा तीर।।’ असे संत कबिरांनी सांगितले आहे. एखादवेळेस मन कुठेही भटकते, तसे शरीराला भटकू देऊ नका. मनाप्रमाणे इंद्रियं धाव घेतात; पण त्यावरती संयम ठेवून वागणे महत्त्वाचे असते. मनाचे भावच वैचारिक भाव बदलवतात.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)