शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनाच्या प्रसन्नतेवरच आरोग्य अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 07:22 IST

मानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नतेवरच सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मात करते. हळवे मन छोट्या-छोट्या गोष्टींवरून कमजोर बनते. मनाची चंचलता ही तुमच्या प्रगतीला आड येते. चंचल मन असल्यास जीवनात अस्थिरता येते. स्थिर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवा. दिवसागणिक-क्षणोक्षणी मनात येणारे विचार कुठल्याही कार्याला प्रेरणा देतात किंवा नुकसानदायक ठरतात. संयमशील मन मनाची निर्णयक्षमता वाढवते. कर्म चांगले करा मनाला विकारापासून दूर ठेवा. मन एका ठिकाणी न बसता सर्वत्र फिरते. मनाला आवर घालणे महाकठीण काम असते. मनाला नम्र बनवायचे असेल तर ध्यानधारणा-योग यांचा आधार घ्यावा लागतो. ‘मन’चा शब्दाचा उलट अर्थ केला तर नम: होता. नेहमी तुम्ही सद्वृत्तीत मन रमवा. सद्वृत्ती मनाला आवर घालते. वासनांना आळा घालण्यासाठी मनाचा उपयोग होतो. सर्वप्रथम कुठलाही विचार मनात येतो. त्यानुसार बुद्धी कार्याला प्रवृत्त करते. मनाची स्थिती-गती-लय- आपल्या वैचारिकतेवर अवलंबून असते. ‘मन गया तो जाने दे। मत जाने दे शरीर। ना खिचे कमान को कहा लगेगा तीर।।’ असे संत कबिरांनी सांगितले आहे. एखादवेळेस मन कुठेही भटकते, तसे शरीराला भटकू देऊ नका. मनाप्रमाणे इंद्रियं धाव घेतात; पण त्यावरती संयम ठेवून वागणे महत्त्वाचे असते. मनाचे भावच वैचारिक भाव बदलवतात.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)