शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मनाच्या प्रसन्नतेवरच आरोग्य अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 07:22 IST

मानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजमानवी जीवनाचा विचार करता सर्व काही मनाच्या अवस्थेनुसार घडते. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नतेवरच सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मात करते. हळवे मन छोट्या-छोट्या गोष्टींवरून कमजोर बनते. मनाची चंचलता ही तुमच्या प्रगतीला आड येते. चंचल मन असल्यास जीवनात अस्थिरता येते. स्थिर जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवा. दिवसागणिक-क्षणोक्षणी मनात येणारे विचार कुठल्याही कार्याला प्रेरणा देतात किंवा नुकसानदायक ठरतात. संयमशील मन मनाची निर्णयक्षमता वाढवते. कर्म चांगले करा मनाला विकारापासून दूर ठेवा. मन एका ठिकाणी न बसता सर्वत्र फिरते. मनाला आवर घालणे महाकठीण काम असते. मनाला नम्र बनवायचे असेल तर ध्यानधारणा-योग यांचा आधार घ्यावा लागतो. ‘मन’चा शब्दाचा उलट अर्थ केला तर नम: होता. नेहमी तुम्ही सद्वृत्तीत मन रमवा. सद्वृत्ती मनाला आवर घालते. वासनांना आळा घालण्यासाठी मनाचा उपयोग होतो. सर्वप्रथम कुठलाही विचार मनात येतो. त्यानुसार बुद्धी कार्याला प्रवृत्त करते. मनाची स्थिती-गती-लय- आपल्या वैचारिकतेवर अवलंबून असते. ‘मन गया तो जाने दे। मत जाने दे शरीर। ना खिचे कमान को कहा लगेगा तीर।।’ असे संत कबिरांनी सांगितले आहे. एखादवेळेस मन कुठेही भटकते, तसे शरीराला भटकू देऊ नका. मनाप्रमाणे इंद्रियं धाव घेतात; पण त्यावरती संयम ठेवून वागणे महत्त्वाचे असते. मनाचे भावच वैचारिक भाव बदलवतात.(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)