शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

अंतरंगातच आनंदाचा ‘डोह’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:20 IST

आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो!

 पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं आणि जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. अनुभवायचा असतो. आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो!

 जसा, सुखी माणसाचा सदरा बाजारात विकत नाही मिळत. तो तर प्रत्येकाकडेच असतो, पण तो शोधावा लागतो. तसेच आनंदाचे आहे.  आनंद निर्माण करता येतो, पण तो निर्माण करणं म्हणजे उत्पादन नव्हे, ती वस्तू नाही. ती अमूर्त कल्पना आहे. ती जाणवते, अनुभवता येते, ती प्रकट होते, डोळ्यांतून उमटते, आणि चेहºयावर हसू फुलवते.

  ‘स्वत:साठी जगलास तर मेलास. इतरांसाठी मेलास तर जगलास.’ अर्थातच,  आपल्या स्वत:पलीकडेही एक जग असतं. तेच आपलं विश्व असतं. समाजात, आनंदाला पारखे झालेले अनेक दु:खी जीव भोवताली असतात. त्यांच्या जगण्याची स्वप्नं तुटलेली असतात. कधी समाजाकडून ती अव्हेरली जातात.

 पानगळीसारखा एकेक अवयव झडल्याचं दु:ख काहींच्या वाट्याला येतं. आज माणसं अधिकाधिक आत्मकेंद्रित बनत चालली आहेत. इतरांसाठी जगण्यातला आनंद त्यांना अनुभवता येत नाही. मात्र, प्राथनेसाठी जोडणाºया दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे केलेल्या एका हाताने इतरांना मदत केली जाऊ शकते. इतरांच्या मदतीतून स्वत:च्या अंतरंगात आनंदाचा डोह निर्माण केल्या जाऊ शकतो. 

आनंदाचा डोह आपल्यापाशीच असतो. इतरांसाठी काही करण्यातून आनंदाचे क्षण जिवंत करता येतात. त्या आनंदाला सीमा नसते. तो वर्णनातीत असतो. आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. सतचितआनंद असं त्याचं वर्णन, म्हणजे अनुभव आहे. जो आनंद ज्याला त्याला प्रत्येकाला ‘स्वत:च’ घ्यायचा असतो. तो सगळीकडे सदैव उसळतो, ओसंडत असतो. 

ठायीच बैसोनि करा एकचित्ते 

आवडी भगवंत आळवावा ॥

इकडे तिकडे भटकून समाधान, शांती कधीही लाभणार नाही. समर्थांचं मार्गदर्शन या दृष्टीनं मोलाचं आहे. ‘मनाचे श्लोक’मध्ये ते सांगतात-

बहु हिंडता सौख्य होणार नाहीे

शिणावे परी नातुडे हीत काही ॥

अर्थातच : सदासर्वत्र भटकण्यानं, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी, व्रतवैकल्याचे संकल्प केल्यानं कुणाचंही हित होणार नाही. शीण मात्र येईल, पैसा-शक्ती-वेळ खर्च झाल्यानं एकप्रकारची क्षीणता, अशक्तता मनाला येईल. असलं दुबळं मन काय कामाचं? आजकाल लोक चारोधाम-अष्टविनायक-बारा ज्योर्तिलिंग-नर्मदा परिक्रमा अशा अनेक यात्रा करतात. खरं तर ती तीर्थयात्रा कमी नि पर्यटन (भ्रमण) अधिक असा प्रकार असतो. अशा यात्रींना अनुभवही तसाच येतो.

गंगेच्या पाण्यात डुबकी मारून तिला आपला एखादा विकार, वाईट सवय अर्पण करून स्वत: सुधारणं हा खरा उद्देश असतो. पण यासाठी शुद्ध मन, पवित्र भाव नि तीव्र इच्छाशक्ती हवी. त्यापेक्षा अंतरंगीची उपासना केली तर अंतयार्मीचा आनंदरूप परमेश्वर आतच भेटतो नि अपार आनंद आपल्या जीवनात-वर्तनात व्यक्त होऊ लागतो.

- श्री राधे राधे महाराज, बर्डेश्वर महादेव संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि. बुलडाणा

टॅग्स :Akolaअकोलाspiritualअध्यात्मिक