शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

सुखदु:ख नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:25 IST

ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो.

- बा.भो. शास्त्रीसुखदु:खाचा दाता कोण आहे? याचं उत्तर आपणच आहोत. चविष्ट भाजी बाईने केली. सुख तयार झालं, बेचव झाली तर, दु:ख. दोन्ही आपल्या हातातच आहे. एक ज्ञानात, एक अज्ञानात आहे. बरंवाईट आपल्याच हातात आहे. दोन्हीही कर्मजन्य आहेत. दु:खाला कारण अज्ञान आहे, आणि सुखाला कारण ज्ञान आहे. ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो. अज्ञानी बेसावध असतो. भावनेच्या भरात चटकन कुणाला चंद्रमुखी उपमा देतो. जेव्हा त्याला सौंदर्याखाली अग्नी असल्याचं लक्षात येतं. तेव्हा तोच त्याला ज्वालामुखीची उपमा देतो. ज्ञानी अचूक निर्णय घेतो. ज्ञान पवित्र व अज्ञान अपवित्र आहे. जीवनात आपण अन्न, वस्त्र, निवारा यांचं नियोजन करीत असतो, तसं सुखाचं करता येणार नाही? करता येतं. नराचा नारायण होता येतं. इतिहासात लहान माणसं मोठी झाली. दुष्ट झाली. मूर्ख विद्वान झाले, आपण पाहातोच. जाणते जेवणाचाच विचार करीत नाहीत, तर त्यांच्यात जीवनाचाही विवेक असतो. भविष्यात काय व्हायचं हे ते ठरवतात व होतात. मेल्यावर लोकांनी काय म्हणून आपली आठवण करावी हे त्यांनी निश्चित केलेलं असतं. पुण्यतिथी, जयंती हे तेच आहे. ती योग्यता त्यांनी स्वत:त निर्माण केली. काही दु:खाचे डोंगर उभारतात. विवेकी चहात बिस्किट बुडवतो, चटकन काढतो. सुखाने खातो. अविवेकीही बुडवतो, पण काढायला वेळ लावतो. बिस्किट कपाच्या तळाशी गाळ होऊन बसतं. दु:ख जन्माला येतं. किती वेळ ठेवायचं कळत नाही. सुख व दु:ख एकाच कपात तयार होतात. कपाचा दोष नाही. सुखदु:खाचं नियोजन आपल्या ज्ञानावरच आहे. सामान्य माणसाला आपण किती प्रदूषण निर्माण करतो कळत नाही. शब्दापेक्षा चित्र प्रभावी असतं. एका पुस्तकाचा आशय त्यात असतो. म्हणून गायछाप तंबाखूच्या पुडीवर विंचवाचं चित्र असतं, तरीही लोक खातात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक