शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सुखदु:ख नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:25 IST

ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो.

- बा.भो. शास्त्रीसुखदु:खाचा दाता कोण आहे? याचं उत्तर आपणच आहोत. चविष्ट भाजी बाईने केली. सुख तयार झालं, बेचव झाली तर, दु:ख. दोन्ही आपल्या हातातच आहे. एक ज्ञानात, एक अज्ञानात आहे. बरंवाईट आपल्याच हातात आहे. दोन्हीही कर्मजन्य आहेत. दु:खाला कारण अज्ञान आहे, आणि सुखाला कारण ज्ञान आहे. ज्ञानात खरं, अज्ञानात खोटं असतं. ज्ञानी सावध असतो. त्याला परिणाम दिसतो. अज्ञानी बेसावध असतो. भावनेच्या भरात चटकन कुणाला चंद्रमुखी उपमा देतो. जेव्हा त्याला सौंदर्याखाली अग्नी असल्याचं लक्षात येतं. तेव्हा तोच त्याला ज्वालामुखीची उपमा देतो. ज्ञानी अचूक निर्णय घेतो. ज्ञान पवित्र व अज्ञान अपवित्र आहे. जीवनात आपण अन्न, वस्त्र, निवारा यांचं नियोजन करीत असतो, तसं सुखाचं करता येणार नाही? करता येतं. नराचा नारायण होता येतं. इतिहासात लहान माणसं मोठी झाली. दुष्ट झाली. मूर्ख विद्वान झाले, आपण पाहातोच. जाणते जेवणाचाच विचार करीत नाहीत, तर त्यांच्यात जीवनाचाही विवेक असतो. भविष्यात काय व्हायचं हे ते ठरवतात व होतात. मेल्यावर लोकांनी काय म्हणून आपली आठवण करावी हे त्यांनी निश्चित केलेलं असतं. पुण्यतिथी, जयंती हे तेच आहे. ती योग्यता त्यांनी स्वत:त निर्माण केली. काही दु:खाचे डोंगर उभारतात. विवेकी चहात बिस्किट बुडवतो, चटकन काढतो. सुखाने खातो. अविवेकीही बुडवतो, पण काढायला वेळ लावतो. बिस्किट कपाच्या तळाशी गाळ होऊन बसतं. दु:ख जन्माला येतं. किती वेळ ठेवायचं कळत नाही. सुख व दु:ख एकाच कपात तयार होतात. कपाचा दोष नाही. सुखदु:खाचं नियोजन आपल्या ज्ञानावरच आहे. सामान्य माणसाला आपण किती प्रदूषण निर्माण करतो कळत नाही. शब्दापेक्षा चित्र प्रभावी असतं. एका पुस्तकाचा आशय त्यात असतो. म्हणून गायछाप तंबाखूच्या पुडीवर विंचवाचं चित्र असतं, तरीही लोक खातात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक