शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

प्रसन्न मनच सर्व सिद्धीचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:56 IST

मानवी मन हे चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टीस कारणीभूत आहे.

देह त्यागीता कीर्ती मागे उरावी ।मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।।मना चंदनाचे परित्वा झिजावे ।परी अंतरी सज्जना निववावे ।।

संत रामदासांनी अंत्यत अनमोल विचार आपना स्थापित करून गेले. श्रोता आणि वक्ता यामधील संवाद आणि विसंवाद यास बाजूला सारत 'स्वतःच्या मनाला' समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी मन हे चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टीस कारणीभूत आहे. मनाच्या आदेशानुसार पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय कार्य करताना दिसून येतात. या मनाला आवर घालणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला ते संत, महात्मे झाले. बहिणाबाई यांनी देखील अत्यंत सूचक व मार्गदर्शक शब्दात वर्णन करीत म्हंटले आहे,

मन वढाय वढायउभ्या पिकातलं ढोरकिती हाकला हाकलाफिरी येति पिकावर 

यापेक्षा मानवी मनाची अवस्था व्यक्त केली जाऊ शकत नाही. मन हे जसे कृतीची उगमस्थान आहे तसेच विकृतीचे देखील सामाजिक स्थैर्य राखणे, घडविणे आणि बीघडविण्याचे कार्य मन अत्यंत वेगाने करत असते. विकृतीचा प्रचार आणि प्रसार विद्युत गतीने होत असल्याचे आपण पाहतो आहोतच. 'मन चिंती ते वैरी न चिंती' हे आपण जाणतोच. पराचा कावळा होणे ही उक्ती आपण लहानपणापासून ऐकत आहोत. त्यामुळे मनावरील ताबा आणि संयम महत्त्वाचा आहे. आता गरज आहे सात्विक विचारांची आणि संयमाची. मनाला चंदनासारखे सुगंध पसरविण्याची आज्ञावली सुकृत करणे गरजेचे आहे. अहंकाराचा अश्व खंडित करून सत्कार्य व सद्भावना वृद्धिंगत होणे  गरजेचे आहे. त्यामुळे मनाला काय अवगत करावे, याचे वर्णन समर्थ रामदासांनी सुंदरपणे केले आहेत.

मना सांग पा रावणा काय झालेअकस्मात ते राज्ये सर्व बुडालेम्हणोनि कुडी वासना सांडी वेगीबळे लागला काळ हा पाठिलागी 

व्यक्तींच्या विचारावरून त्याचे वर्तणूक होत असते. मन, दृष्टी आणि जीव्हा यांच्या आहारी जाणारा अखेर विचारांनारूप प्राप्त करतो. रावणासारखा शूरवीर राजा देखील आपल्या वाईट इच्छेमुळे गतीस प्राप्त झाला. तिथे इतरांची काय बिशाद. म्हणून मनास वाईट प्रवृत्तीस दूर ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून अधःपतन होणार नाही. जे आपले नाही त्याचा मोह करू नये. कर्म आणि प्रारब्ध यातून जे प्राप्त होते, तेच आपले. अन्यथा सर्व बाबी अंगलट येतात. मनाचा वारू सुसाट धावत असेल तर त्याला वैराग्याचा दोरखंड बांधणे गरजेचे. अन्यथा शेवट काय हा अंदाज देखील मांडणे अवघड असते. मनाची जडणघडण अशी झालेली असते की जे चांगले ते ते माझे जे मी करतो तेच खरे असे वाटत असते. मनाची चंचलता माणसाचे ध्येय बिघडविते. मनाचे सामर्थ्य ओळखण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले ठेवणे आवश्यक आहे. आपण निश्चित केलेले ध्येय साध्य होइपर्यंत थांबणे नाही. हे मनाला पटवून दिले पाहिजे. मनाचा निग्रह, मनोधैर्य एका दिवसात वाढत नाही. त्यासाठी एकाग्रतेने मनाशी सुसंवाद साधावा लागतो. तोच वैयक्तिक आयुष्यात यशस्वी होतो. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात,

मन करा रे प्रसन्न।सर्व सिद्धीचे कारण।।मन गुरू आणि शिष्य।करी आपलेची दास्य।।

- भालचंद्र.ना.संगनवार (लेखक लातूर येथे जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक