शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

देवाच्या चरणी लीन होणारा सुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:08 IST

सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे.

सोलापूर : सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करण्याची हिंदू संस्कृती असून, अयोध्येत राममंदिर होण्यासाठी सर्वधर्मीयांनी प्रयत्न केले आहेत, हीच प्रभू रामचंद्राची इच्छा होती, असे श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी प्रवचनात सांगितले. देवाच्या चरणी जीवन अर्पण करणारा प्रत्येकजण सुखी होतो, असेही महाराज म्हणाले.

गुरुवारी उद्धव चरित्र, रुक्मिणी विवाह, रास पंचाध्यायी या विषयावर प्रवचन झालं. यावेळी प्रवचन देताना देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले, देवाच्या चरणी जीवन अर्पण करणारा कायम सुखी असतो. सत्य सनातन धर्म हाच या देशाचा पाया आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा, हा देश हिंदूंचा आहे मात्र इथे इतर धर्मीय देखील गुण्यागोविंदाने राहतात, हेच या धर्माचे वैशिष्ट्य आहे.

देशातील कोणत्याही व्यक्तीने अथवा राजकीय पक्षाने सनातन धर्माची अवहेलना करू नये. ज्या देशात जन्म झाला, त्या देशाच्या संस्कृती-सभ्यतेचा आदर करा, भाईचारा ठेवला तरच सर्वधर्मसमभाव टिकून राहील. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिर उभारण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयानेही मान्य केले की, अयोध्या हे श्रीरामांचे जन्मस्थळ आहे. मंदिर उभारणे ही प्रभू श्रीरामांचीच मर्जी आहे. त्यामुळे अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे.

मानवी जीवन ईश्वर प्राप्तीसाठी आहे. त्यामुळे देवासमोर कधीच खोटं बोलू नका. साधू-संत हे देवाचे रूप असतात, त्यांच्यासोबत कपट करू नका, अन्यथा त्याचे कठोर फळ भोगावे लागेल, म्हणून जीवनात कपट ठेवू नका. आपल्या सामर्थ्यानुसार दान करा, समाजसेवा करताना दिखावा करू नका, असंही देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी सांगितले.

श्री भागवत कथेचा गुरुवारी सहावा दिवस होता. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या हस्ते भगवत गीतेची आरती करून प्रवचनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संतोष गालपल्ली, दिगंबर लगशेट्टी, रमेश झालगे, अविनाश दासरी, मारुती महिंद्रकर, रामकृष्ण सुंचू, संतोष कामून यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक