शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आनंदाचे डोही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 02:52 IST

आपल्या मनरूपी डोहात ज्या ब्रह्मानंदाच्या लाटा उचंबळून येतात. त्यांचेच जलतीर्थ समाज जीवनास वाटत राहावे हा संतवाणीचा प्रमुख उद्देश आहे. संतांची वाणी ही कैवल्याची खाणी, सौंदर्याची लेणी, चैतन्याची गाणी, मोक्षसुखाची आनंदवाणी आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

आपल्या मनरूपी डोहात ज्या ब्रह्मानंदाच्या लाटा उचंबळून येतात. त्यांचेच जलतीर्थ समाज जीवनास वाटत राहावे हा संतवाणीचा प्रमुख उद्देश आहे. संतांची वाणी ही कैवल्याची खाणी, सौंदर्याची लेणी, चैतन्याची गाणी, मोक्षसुखाची आनंदवाणी आहे. तशी ती दु:ख गिळून आनंदाचे गाणी गाणारी लोकउद्धारक वाणी आहे. आपल्या साक्षात्कारपूर्व व साक्षाकारोत्तर अवस्थेतसुद्धा संतांनी परमेश्वराकडे ‘जों जे वांछील तों ते लाहों प्राणीजात’, ‘आनंदेभरीन तिन्हीलोके’ एवढीच मागणी करून हेच सिद्ध केले की, जो दुसऱ्यासाठी जगतो व दुसºयासाठीच जातो तोच खरा संत आणि तोच खरा आध्यात्मिक महात्मा होय. सर्वच संतांच्या दृष्टीपुढे जे समाज जीवन होते ते उसासे, दु:खाचे कढ, आयुष्याची परवड, उपेक्षेची धुळवड यांनी ग्रासलेले होते. म्हणूनच संतांनी आपल्या वैयक्तिक साधनेबरोबर समष्टीच्या भावनेला महत्त्व दिले. ‘‘बुडती हे जन देखवेना डोळा। येतो कळवळा म्हणौनिया।।’’ हा व्यापक कारुण्यभाव संतांच्या मनीमानसी वसत होता. जेव्हा आपले वैयक्तिक आयुष्य कृतार्थतेच्या पैलतीरावर पोहोचले तेव्हा या अनिर्वचनीय आनंदालासुद्धा शब्दांच्या चिमटीत पकडून विश्वगुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणू लागले,आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदीच अंग आनंदाचे।काय सागों झाले काहीचिया बाही।पुढे चाले नाही आवडीने।गर्भाचे आवडी मातेचा डोहळा।जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे।तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा।अनुभवा सरीसा मुखा आला।।हे प्रभो! तुझ्या नामरूप गुणकर्माचा आनंद घेता-घेता मीच आता आनंदाचा डोह झालो आहे. माझा सारा देहभाव तुझ्या अस्तित्वाने भरून गेल्यामुळे आता जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तुझेच आनंदरूप पाहणे हाच खरा ईश्वरी साक्षात्कार होय. मुळात ईश्वरी साक्षात्कार ही प्रक्रियाच ‘‘गुंगे के गुड के समान’’ अशी आहे. गुळाची गोडी मुक्याला कळते; परंतु त्यावर तो शब्दांचे इमले रचून त्याचे रसभरीत शाब्दिक वर्णन करू शकत नाही. आपल्या पोटातील गर्भाची आवड हेच मातेचे डोहाळे असतात ना! तद्वतच पारमार्थिक आनंदाचे सुख शब्दावाचून अनुभवायचे असते. या ज्ञानोबा माउली तुकोबाराय, नामदेवराय यांच्या अनुभूतीच्या पातळीवर जर पोहोचायचे असेल तर आज स्वत:स ईश्वरी साक्षात्कारी समजणाºया मंडळींकडून साक्षात्काराचे उथळ वर्णन थांबले पाहिजे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक