शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

आनंद तरंग - स्पर्धात्मक संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 07:48 IST

आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे.

सद्गुरू जग्गी वासुदेव

आपण एका अति-स्पर्धात्मक जगात वावरत आहोत ज्या ठिकाणी प्रत्येकालाच सर्वोत्तम व्हायचे आहे. माझ्यासाठी योग्य मार्ग कोणता हे ठरविणे मला अवघड जात आहे कारण मी जरीही एखाद्या गोष्टीत चांगला असलो, उदाहरणार्थ नृत्य, तरी तेथे माझ्यापेक्षा अधिक चांगले कोणीतरी असतेच. समाजाच्या आपल्याकडून सर्वोत्तम असण्याच्या अपेक्षांऐवजी केवळ आनंदी राहण्याच्या एकमात्र उद्देशासाठी एखादी कृती करण्याची प्रेरणा मी कशी मिळवू शकतो, असा प्रश्न कायम विचारला जातो. तुम्ही जर खरेच त्याकडे पाहिलेत, तर आपल्याला सर्वोत्तम बनायचे नसते कारण सर्वोत्तम म्हणजे काय हेच तुम्हाला ठाऊक नसते. आपल्याला केवळ आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करून दाखवायची असते. ही एक व्याधी आहे; कारण तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंद मानत नाही, तर इतरांकडे नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही आनंद मानत असता. जेव्हा इतर लोकांच्या वेदना हा तुमच्या आनंदाचा स्रोत असतो, तेव्हा तो एक आजार आहे असेच म्हणावे लागेल. आणि या आजाराने लोकांना अगदी लहान वयातच गाठले आहे. तुम्हाला शिकविले जाते, ‘‘तू प्रथम क्र मांकच मिळवायला हवा.’’ तुम्ही असे कधीही विचारले नाही, ‘‘मग इतर मुलांचे काय?’’ ‘‘त्याने काही फरक पडत नाही! तुम्ही प्रत्येकाच्या वरचढच असले पाहिजे, तरच जीवन सुखकर होईल!’’ अशाने स्वास्थ्य लाभणार नाही तुम्हाला किंवा जगाला. सर्वोत्तम असण्याऐवजी, या जीवनाची संपूर्ण अभिव्यक्ती शोधणे महत्त्वाचे आहे. तुमच्यामध्ये दडून बसलेल्या सर्व क्षमता तुम्ही आजमावून पाहा. हे जीवन अपूर्ण राहायला नको. ते इतरांपेक्षा अधिक चांगले आहे की नाही, हा प्रश्नच नाही. जीवन ही शर्यत नाही. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकMumbaiमुंबई