शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

सुखकर प्राणायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:00 IST

उन्हातान्हात फिरणारे, काबाडकष्ट करणारे, भ्रष्ट, असत्यभाषी, अनीतिमान हेही प्राणायामाला योग्य नाहीत. ७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते.

- डॉ. विजय जंगम (स्वामी)

उन्हातान्हात फिरणारे, काबाडकष्ट करणारे, भ्रष्ट, असत्यभाषी, अनीतिमान हेही प्राणायामाला योग्य नाहीत. ७ ते ७० वर्षांपर्यंतच्या स्त्री-पुरुषांना प्राणायाम क्रिया करण्यास हरकत नसते. या आयुर्काळात रक्ताभिसरण, रक्तपुरवठा निसर्गत: चालते. मात्र जन्मजात फुप्फुसदोषींनी (श्वसनात अडचण येईल म्हणून) प्राणायामाच्या वाटेला जाऊ नये.प्राणायामाचा अभ्यास करणारे रागलोभविरहित, सदैव प्रसन्न असणारे, शरीर मनाने पावित्र्य जपणारे आणि प्राणायामाचा अभ्यास करायला उत्सुक असे हवेत. प्राणायाम शिकायला आरंभण्यापूर्वी पूर्वतयारीसाठी पद्मासन, सिद्धासन अशी आसने अभ्यासावी. त्यांच्यामुळे शरीरातल्या नाड्या मृदू बनतात. ही आसनं दोनदोन वा तीनतीन तास एकाठायी स्थिर बसण्याची तयारी करतात. ती सिद्ध झाल्यावरच प्राणायामाभ्यास करायला घ्यावा.प्राणायाम जिथे करायचा ती जागा शांत, पवित्र, शुद्ध वातावरण असलेली हवी. तिथे जोरदार झुळूक, वारा वेगाने वाहणे नसावे. यासाठीच उघड्या जागेत, माळावर कधीही प्राणायाम करू नये. जोरदार वायुवहनामुळे घाम वाळविला जातो, रंघ्रांबाहेर येत नाही. असं होणं अयोग्य आहे. घाम शरीराबाहेर यायलाच हवा. तसा तो येत नसेल तर नाडी शुद्ध नाही, हे नक्की. फुटणारा घाम नैसर्गिकपणे शरीरात मुरल्यास त्वचा मृदू कोमल बनते.प्राणायाम दिवसातून दोनदा करावा. काही प्राचीन योगगं्रथात दुपार, सायंकाळ आणि मध्यरात्री तो करावा असे लिहिले आहे. एका वेळी दहा प्राणायामांनी आरंभ करून नंतर दैनंदिन पाच आवृत्ती वाढ असा क्रम ठेवला तर सहा तासांत ३२० प्राणायाम संख्या होईल. पण इतका वेळ हल्ली असतो कोणाकडे? तेव्हा उपलब्ध वेळ, शरीरावस्था, आरोग्य यांचा मेळ घालून मगच अभ्यासाची मर्यादा ठरवावी. सर्वदा अनुभवी योगाभ्यासीकडून मार्गदर्शन घेत राहावे.दोन वेळा प्राणायाम करणाऱ्यांनीही सायंकाळी शरीर थकले असता, दिवसभरात अति कष्ट झाले असल्यास रात्रीचा अभ्यास आटोक्यात करावा. अन्यथा फुप्फुसांमध्ये बिघाड होऊन त्रास होऊ शकतो. अजीर्ण असणाºयांनीही हीच काळजी घ्यावी. जेवणापूर्वी ३-४ तासांपूर्वी प्राणायाम करू नये. आहार हलका असावा. जड पदार्थ टाळावे. तापटपणा वाढविणारे, आळस आणणारे अन्न सेवू नये. सात्त्विक आहार म्हणजे वरण-भाकरी, मुगाची खिचडी, पालेभाज्या, दूध, तूप, फळफळावळे, सुकामेवा असे पदार्थ भोजनात ठेवावे.सिद्धासन, स्वस्तिकासन, सुखासन अशी आसनं प्राणायामाला साहाय्यकारी म्हणून श्रेष्ठ समजली गेली आहेत. अर्थात त्यात प्रावीण्य तर हवे! बैठकीचे आसन गुळगुळीत आणि मऊ असावे. प्राणायाम करताना पाठ, मान ताठ ठेवावी, वाकून बसू नये. अंग ढिल्लम ढिल, वेडेवाकडे ठेवून बसू नये. जरी वसंत ऋतू आणि शीतकल हे जरी प्राणायामाला सुखकर असले तरी नियमित अभ्यासकास सर्व ऋतू सारखेच! प्राणायामास स्वर अनुकूल असणेही महत्त्वाचे आहे. चंद्रस्वरावर प्राणायाम करावा हे श्रेयस्कर आहे.प्राणायाम अभ्यासात बंध साधण्याने लाभ वाढतो. मात्र योग्य मार्गदर्शनानंतरच असे बंध स्वतंत्रपणे करावे. कुंडलिनी जागृती करताना या महाशक्तीशी पुरेशा नम्रतेनं वागावं नपेक्षा तिचे दुष्परिणाम सहन करावे लागतील.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक