शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ज्ञानग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:21 IST

- वामन देशपांडे शारीर भावनेने जगणारे जीव सहसा मोहग्रस्त आयुष्य जगत असतात आणि हीच मोहग्रस्त माणसे इंद्रियांच्या वासनांना, त्यांच्या ...

- वामन देशपांडेशारीर भावनेने जगणारे जीव सहसा मोहग्रस्त आयुष्य जगत असतात आणि हीच मोहग्रस्त माणसे इंद्रियांच्या वासनांना, त्यांच्या पूर्तीसाठी शरण जातात. कारण एकच त्यांची बुद्धी आणि मन या वासनाग्रस्त इंद्रियांना त्यांची वासनातृप्ती व्हावी म्हणून मदत करतात. साधकाने प्रथम या चंचल मनाला आणि वासनातृप्ती व्हावी म्हणून सुसाट वेगाने धावणाऱ्या इंद्रियांना ताब्यात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ज्ञानसाधना करणे, तत्त्वज्ञानाची प्राप्ती करून घेणे, मुख्य म्हणजे अज्ञान भारल्या विचारांचा नाश करणे आवश्यकच आहे. त्यासाठी प्रथम तत्त्वज्ञानी महापुरुषाच्या सान्निध्यात अधिक काळ घालवून ते तत्त्व समजून घेत, त्यांना पूर्णांशाने शरण जायला हवे. तेव्हाच ते तत्त्वज्ञानी महापुरुष शुद्ध ज्ञानाचा अंत:करणपूर्वक उपदेश करतात. भगवंत अर्जुनाला निखळ सत्य सांगतात की,

न हि ज्ञानेन सद्दशं पवित्रमिह विद्यते।तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्ममि विन्दति।

पार्था, मानवी आयुष्यात ज्ञानग्रहणाइतके पवित्र साधन दुसरे कुठलेच नाही. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेणे, हेच आपल्याकरिता असलेल्या साधनेचा प्रधान हेतू हवा. ज्याला निष्काम कर्मयोग साध्य झाला आहे, त्याला ज्ञानयोग अवश्य प्राप्त होतो. जो ज्ञानी असतो, तोच कर्मयोगी असतो... परमात्मा परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांड व्यापूून आणि तोच परमात्मा सूक्ष्म आत्मस्वरूपात प्रत्येक जीवात नांदतो आहे. या परम तत्त्वाचे ज्ञान होणे, ही प्रत्यक्ष अनुभूती होणे, हे आपण करीत असलेल्या साधनेचे अत्युत्तम फळ आहे. परब्रह्म निर्गुणनिराकार आहे, तसेच परमात्मा हा सगुण साकार आहे याची प्रचिती यावी लागते. त्यासाठी मनाची निर्द्वंद्व अवस्था प्रथम यावी लागते. राग, द्वेष, अहंकार तसेच शरीरात ठाण मांडून बसलेले ‘मी’पण जर पूर्णपणे संपुष्टात आणायचे असेल तर त्यासाठी प्रथम निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते. तेव्हाच परमात्म्याच्या नामात चित्ताला गुंतवता येते. तेव्हाच संसारबंधन तटातटा तुटते. प्रपंच बंधनकारक होत नाही. एकदा का भगवंताविषयी अपार प्रेम जर निर्माण झाले की भोवतीच्या सर्व जीवांविषयी आत्मीयता वाटू लागते. भगवंत प्रत्येक जीवात नांदतो आहे याचे भान येते. भगवंत म्हणतात,

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन।निर्द्वंद्वोे नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान ।।

पार्था, वेद तर सत्त्व-रज-तम या तीन गुणांचे त्यांच्या स्वभावानुसार मानवी आयुष्य कार्यान्वित होते, त्याचेच प्रामुख्याने वर्णन करतात. माणूस मूलत: त्रिगुणाधिष्ठितच आहे. पार्था तू त्रिगुणातीत हो. निर्द्वंद्व अवस्था प्राप्त करून घे. षडरिपूंपासून मुक्त हो. तू परमात्म्यात विलीन हो. योगक्षेमाची काळजी करू नकोस...कर्म करीत असतानाच, करीत असलेल्या विहित कर्मापासून आणि कर्मफलापासून अलिप्त होणे ही निर्लिप्त कर्म करण्याची वृत्ती साधकाला ज्ञानमार्गावर अलगदपणे आणून सोडते. साधकाने हे लक्षात ठेवायला हवे की, कामनाग्रस्त कर्मे, पापकर्मे म्हणजे निषिद्ध कर्मे होतात. ही पापकर्मेच तर संचित पुण्याचा ºहासकरतात. यासाठी निष्काम कर्मयोग जर साधकांनी आचरणात आणला तरच मोक्षप्राप्तीच्या दिशेने साधकाला वेग येतो.भगवंतांनी मोठ्या प्रेमाने महत्वाचा विचार दिला की, गहना कर्मणो गति: ।।गीता।। ४ :१७ ।।पार्था, तुला मी एकच निखळ सत्य सांगतो की, आपण जेव्हा कर्म करीत असतो तेव्हा करीत असलेल्या कर्मापासून मनाने अलिप्त होत, कर्म पूर्ण करणे हाच खरा, कर्माचे तत्व जाणून घेत कर्म करीत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर निर्लेप मनाने कर्म करणे म्हणजे अकर्माला जाणून घेणे आहे. त्यात ‘मी’पण संपुष्टात आलेले असते.