शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

पारसस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 05:26 IST

फार वर्षांपूर्वी एका गावातील आश्रमात गुरूंबरोबर काही शिष्य राहायचे

फार वर्षांपूर्वी एका गावातील आश्रमात गुरूंबरोबर काही शिष्य राहायचे. एके दिवशी गुरूंनी शिष्याला एक दगड दाखवला व विचारले की, या दगडाची किंमत काय असेल? शिष्य आश्चर्याने त्या दगडाकडे पाहत राहिला. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते की, या दगडाची अशी काय किंमत असेल? बुचकळ्यात पडलेल्या शिष्याला बघून गुरू म्हणाले, ‘जा, जरा बाजारात जाऊन याची किंमत काय असावी ते विचारून ये. पण लक्षात ठेव की, हा दगड कोणालाही विकायचा नाही. शिष्य बाजाराकडे निघतो. रस्त्यात एक शेतकरी भेटतो. त्याला थांबवून तो विचारतो की, आपण मला सांगू शकाल, की या दगडाची तुम्ही काय रक्कम देऊ इच्छिता? शेतकरी म्हणतो, ‘याची ती काय किंमत? एक रुपया ठीक आहे’. शिष्य पुढे जाऊन एका दुकानदाराला विचारतो की, या दगडाची काय किंमत असू शकेल? दुकानदार उत्तर देतो, ‘दहा रुपये’. शिष्याच्या मनात येते की, आणखी दोन-चार व्यक्तींना विचारायला हवे. तो एका सोनाराला विचारतो. सोनार सांगतो, मी याचे हजार रुपये देऊ शकतो. हे ऐकून शिष्य तोंडात बोट घालतो. आता मात्र त्याच्या मनातली उत्सुकता वाढते. तो राजाकडे जातो व विचारतो, ‘राजन, तुम्ही या दगडाची काय किंमत आकाराल?’ राजा म्हणतो, ‘या दगडाच्या किमतीत मी माझे पूर्ण राज्य द्यायला तयार होईन.’ शिष्य हे ऐकून तो दगड परत घेऊन धावत आश्रमात पोहोचतो. गुरूंसमोर जाऊन प्रश्न करतो की, ‘गुरुदेव, मला खरं सांगा. हा दगड नक्की काय आहे? राजा तर दगडाच्या बदल्यात पूर्ण राज्य द्यायला तयार आहे.’ तेव्हा गुरू शांत मुद्रेने उत्तर देतात, ‘या दगडाला पारस म्हणतात. लोखंडाला जर याचा स्पर्श झाला तर त्याचे सोने होते. समजले? अर्थातच मूल्यहीन वस्तू ही मूल्यवान होते. सत्याचा बोध होण्यासाठी ईश्वरीय ज्ञानाचा स्पर्श आपल्या बुद्धीला होण्याची गरज आहे. ज्याद्वारे समस्यांचे समाधान सहजरीत्या आपण करू शकतो. योग्य निर्णय घेण्याची शक्ती आपणास मिळते.- नीता ब्रह्मकुमारी