शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिणे गंगौघाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:16 IST

-इंद्रजित देशमुखसुखानुभूतीचा अनुभव घेत माउलींची पालखी आज खंडेरायाचा निरोप घेऊन वाल्हेत विसावणार आहे, तर तुकोबाराय उंडवडीत विसावणार आहेत. पूर्ण वारीतील ज्ञानोबारायांच्या आजच्या विसाव्याचे गाव खूप विलक्षण आहे. काही गावे काही चांगल्या लोकांनी कामे करून नावारूपाला आणलेली असतात; पण एखाद्याने परिस्थितीच्या आहारी जाऊन वाईटपणाचा कळस करणे, कुणातरी सत्पुरुषाच्या स्पर्शाने पुनीत होऊन ...

-इंद्रजित देशमुखसुखानुभूतीचा अनुभव घेत माउलींची पालखी आज खंडेरायाचा निरोप घेऊन वाल्हेत विसावणार आहे, तर तुकोबाराय उंडवडीत विसावणार आहेत. पूर्ण वारीतील ज्ञानोबारायांच्या आजच्या विसाव्याचे गाव खूप विलक्षण आहे. काही गावे काही चांगल्या लोकांनी कामे करून नावारूपाला आणलेली असतात; पण एखाद्याने परिस्थितीच्या आहारी जाऊन वाईटपणाचा कळस करणे, कुणातरी सत्पुरुषाच्या स्पर्शाने पुनीत होऊन जाणे. त्यानंतर जीवनमार्ग बदलून वेगळ्या पण योग्य असलेल्या वाटेवरून चालायला सुरुवात करून नामांकित होणं आणि आपलं गावही नामांकित करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. असाच एक वाटमाऱ्या ज्याने पापाचा कळस केला; पण नारदांची भेट झाल्यावर जो आयुष्यच बदलून जगू लागला, असा एक महान कवी रामायणकार वाल्या कोळी यांचे जन्मस्थळ आणि साधनास्थळ म्हणजे वाल्हे.व्यवहारी जगात एका चुकीबाबात एखाद्याला दोषी ठरवलं की, त्याला त्या चुकीबद्दल आयुष्यभर टोचत राहणे ही जगराहाटी आहे. याच चुकीबद्दल आयुष्यभर तो अपराधीपणाने होरपळत राहतो. अशा जगात ज्याच्याकडून नकळत अपराध घडलाय, त्याला मानव्याचं जगणं जगूच दिलं जात नाही. अशा जिवाला समाज मिसळून घेत नाही. त्याच्यात त्याने चांगुलपणा आणला तरी समाज त्याला स्वीकारत नाही. अशा अनंत प्रश्नांकित जीवनाला प्रेम, सहानुभूती व मानव्य याचे उत्तर देणारा एक वारकरी संप्रदाय आहे. वारीच्या मार्गातील हे वाल्या कोळ्याचे गाव अजूनही इथल्या डोंगरात जिथं वाल्या वाटमारी करून माणसाचे खून करायचा, एक माणूस मारला की आपल्याजवळील एक खडा जवळील रांजणात टाकायचा. असे खडे टाकून सात रांजण भरलेले असे ते रांजण व वापरलेला टोणपा इथं अवशिष्ट स्वरूपात आहेत. हे गाव आम्हाला सांगून जातं, इथं वाल्ह्या ही अफवा होती आणि वाल्मीकी हे सत्य आहे. माणसाचे रूपांतरण शक्य आहे याची ते साक्ष देते. परमार्थ हा समाजातील शहाण्या लोकांनीच करावा, अशी ठाम समजूत असलेल्या या रूढीला या संप्रदायाने क्रांती केली आणि हाकारून सांगितले.‘‘या रे या रे लहान थोर।यावी भलती नारी नर।।नेणिवेत भरकटलेल्या गतायुष्याची कोणतीच बोचरी आठवण वर्तमानात अजिबात जोपासायची नाही. यासाठी माउली म्हणतात,‘‘नेणिजे गतायुषे लज्जा जेवी’’अशा भरकटलेल्यांसाठी तुकोबाराय सांगतात.‘‘हरपल्याची नका चित्ती।धक खणती वायाची।।पावले ते म्हणा देवा।सहज सेवा या नावे।।जे आपल्या जवळून हरवून गेलंय मग ती वेळ असो, धन असो, मान असो किंवा कुवर्तन असो. ते चित्रात आणूच नका. देवाला पावले म्हणा आणि वर्तमानात जगत राहा. अशा पथभ्रष्ट जीवन जगणाºयांना तुकोबाराय सांगतात की,‘‘मागे झाले पाहू नका।पुढे जामीन आहे तुका।।’’जिथे चुकीचे जगणाºयांना जवळचेदेखील आधार देत नाहीत, अशांचं वकीलपत्र घ्यायला तुकोबाराय तयार आहेत. किती व्यापकपणा आहे. या व्यापकतेची मर्यादाच नाही. एखाद्या चुकीमुळे समाजात पिचून जगणाºयांसाठी माउली म्हणतात,‘‘ यालागी दुष्कृत जरी झाला ।आणि अनुताप तीर्थी न्हाया।न्हाऊनी मज आतू आला । सर्वभावेसी ।।’’‘‘आणि आचरण पाहता सुभटा ।जे दुष्कृताचा किर सेल वाटा ।परी जीवित वेचिले चोहटा ।भक्तिचिया की ।।’’पूर्ण आयुष्य कसही असूदे, एकदा का त्याला अनुताप झाला की, तो परमार्थात अधिकारी बनू शकतो. अशा माणसाच्या आयुष्यातील अमावास्या संपून पौर्णिमा उगवते. ऋषिवर वाल्मीकी यांच्या या परिर्वतनाबद्दल एकनाथ महाराज म्हणतात,‘नामपाठ करूनी वाल्हा तो तरला।अधिकारी झाला रामनामे।।शतकोटी कवित्व रामायण केले।जडजीवन उद्धरिले तिन्ही लोकी।।जनार्दनाचा एका बोलतसे वाणी।नामपाठ अमृत संजीवनी घ्यारे भावे।।नारदांनी केलेल्या बोधामुळे वाल्याने नामाचा पाठ केला व यातून अधिकारी होऊन दिव्य कवी झाले. स्वत: तरून इतरांना तारण्यासाठी शतकोटी रामायण हे काव्य केले. तुकोबाराय म्हणतात,‘‘कोळियाची कीर्ती वाढली गहन।केले रामायण रामा आधी।’’एवढा मोठा अधिकार वाल्मीकींना प्राप्त झाला. या वाल्हेच्या भूमीत आल्यावर कुणालाही कमी न लेखता निव्वळ आणि निव्वळ मानव्याची जोपासना आणि संवर्धन करण्याचं बळ मिळतं.नाही पुण्याची मोजणी।नाही पापाची टोचणी।जिणे गंगौघाचे पाणी।।इथे वारी हा गंगौघच आहे. सर्वांना घेऊन जाणारा.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)