शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

अन्न आणि अन्नग्रहण हे अस्तित्वाच्या एकात्मतेचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 04:10 IST

प्रत्येक दिवशी तुमच्या जेवणाच्या वेळेस ही सुंदर प्रक्रिया घडत असते.

- सद्गुरू जग्गी वासुदेव

प्रत्येकाने जेवले पाहिजे, पण आपण जेवताना, त्या अन्नातून मिळणारे पोषण आणि आपल्या जीवनातील त्याचे योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जेवले पाहिजे. केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ल्यामुळे ते आपल्यावरच उलटण्याची शक्यता अधिक असते. असे बोलून मला खाण्यातील आनंद कमी करायचा नाही.

इतर कोणता तरी जीव तुमचाच एक भाग होण्यासाठी, तुमच्यात सामावून एक होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात विलीन होऊन तुमचाच एक भाग होण्यासाठी तयार आहे याची जाणीव ठेवणे यातच भोजनातला खरा आनंद आहे. एखादी गोष्ट, जी त्याच्याहून वेगळी आहे, ती त्याच्यात विलीन होण्यास राजी आहे याची जाणीव असणे, हा मानवी जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. यालाच आपण प्रेम असे म्हणतो. यालाच लोक भक्ती म्हणतात.

हेच आध्यात्मिक प्रक्रियेचे सर्वोच्च ध्येय आहे. मग वासना असो, उत्कट इच्छा असो, भक्ती किंवा आत्मज्ञान, या सर्व गोष्टी एकच आहेत, हा फक्त व्याप्तीचा प्रश्न आहे. हे जर दोन व्यक्तींमध्ये घडले तर आपण त्याला उत्कट भावना म्हणतो; असे जर मोठ्या जनसमूहात घडले तर आपण त्याला प्रेम म्हणतो; असे जर अनिर्बंध, व्यापक प्रमाणात घडले तर आपण त्याला अनुकंपा म्हणतो; आणि असे तुमच्याभोवती कोणतीच साकार गोष्ट नसताना घडले, तर आपण त्याला भक्ती म्हणतो. असे जर त्याच्या सर्वोच्च पातळीवर घडले, तर आपण त्याला आत्मज्ञान म्हणतो. अन्न आणि अन्नग्रहण हे अस्तित्वाच्या एकात्मतेचे प्रात्यक्षिक आहे.

प्रत्येक दिवशी तुमच्या जेवणाच्या वेळेस ही सुंदर प्रक्रिया घडत असते. जे एक रोप होते, जे एक बीज होते, जो एक प्राणी होता, किंवा मासा, किंवा पक्षी होता, तो आपल्यामध्ये विलीन होऊन मनुष्यप्राणी बनत आहे ही घटना अस्तित्वाच्या एकात्मतेचे तसेच प्रत्येक गोष्टीत सृष्टीकर्त्याचा सहभाग असल्याचे मूर्त स्वरूप आहे.

टॅग्स :foodअन्न