शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

अन्न आणि अन्नग्रहण हे अस्तित्वाच्या एकात्मतेचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 04:10 IST

प्रत्येक दिवशी तुमच्या जेवणाच्या वेळेस ही सुंदर प्रक्रिया घडत असते.

- सद्गुरू जग्गी वासुदेव

प्रत्येकाने जेवले पाहिजे, पण आपण जेवताना, त्या अन्नातून मिळणारे पोषण आणि आपल्या जीवनातील त्याचे योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून जेवले पाहिजे. केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ल्यामुळे ते आपल्यावरच उलटण्याची शक्यता अधिक असते. असे बोलून मला खाण्यातील आनंद कमी करायचा नाही.

इतर कोणता तरी जीव तुमचाच एक भाग होण्यासाठी, तुमच्यात सामावून एक होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात विलीन होऊन तुमचाच एक भाग होण्यासाठी तयार आहे याची जाणीव ठेवणे यातच भोजनातला खरा आनंद आहे. एखादी गोष्ट, जी त्याच्याहून वेगळी आहे, ती त्याच्यात विलीन होण्यास राजी आहे याची जाणीव असणे, हा मानवी जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. यालाच आपण प्रेम असे म्हणतो. यालाच लोक भक्ती म्हणतात.

हेच आध्यात्मिक प्रक्रियेचे सर्वोच्च ध्येय आहे. मग वासना असो, उत्कट इच्छा असो, भक्ती किंवा आत्मज्ञान, या सर्व गोष्टी एकच आहेत, हा फक्त व्याप्तीचा प्रश्न आहे. हे जर दोन व्यक्तींमध्ये घडले तर आपण त्याला उत्कट भावना म्हणतो; असे जर मोठ्या जनसमूहात घडले तर आपण त्याला प्रेम म्हणतो; असे जर अनिर्बंध, व्यापक प्रमाणात घडले तर आपण त्याला अनुकंपा म्हणतो; आणि असे तुमच्याभोवती कोणतीच साकार गोष्ट नसताना घडले, तर आपण त्याला भक्ती म्हणतो. असे जर त्याच्या सर्वोच्च पातळीवर घडले, तर आपण त्याला आत्मज्ञान म्हणतो. अन्न आणि अन्नग्रहण हे अस्तित्वाच्या एकात्मतेचे प्रात्यक्षिक आहे.

प्रत्येक दिवशी तुमच्या जेवणाच्या वेळेस ही सुंदर प्रक्रिया घडत असते. जे एक रोप होते, जे एक बीज होते, जो एक प्राणी होता, किंवा मासा, किंवा पक्षी होता, तो आपल्यामध्ये विलीन होऊन मनुष्यप्राणी बनत आहे ही घटना अस्तित्वाच्या एकात्मतेचे तसेच प्रत्येक गोष्टीत सृष्टीकर्त्याचा सहभाग असल्याचे मूर्त स्वरूप आहे.

टॅग्स :foodअन्न