शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधर्माचा अग्नी संगतीत येणाऱ्यालाही बाधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:52 IST

धर्म भ्रष्ट माणूस कोणीही असो त्याची संगती साधकाला घातकच असते.

- ह.भ.प भरतबुवा रामदासी, बीडपरमार्थाची साधना करीत असतांना साधकाने नेहमी संत संगतीतच राहावे. कधीही दुर्जनाच्या संगतीत राहू नये. दुर्जनाच्या संगतीने मती भ्रष्ट होते. खरं तर, मनुष्य हा संग प्रधान प्राणी आहे. संगतीशिवाय तो राहूच शकत नाही. पण परमार्थात सत्संग खूप गरजेचा आहे. श्रीमद् भागवत ग्रंथात कपिल भगवान देवहुती मातेला उपदेश करतांना दु:संगाचे बाधकत्व सांगताना म्हणतात; सत्यं शौचं दया मौनं बुद्धि: श्रीह्रि:यश:क्षमा  !शमो दमो भगश्चेति यत्संगात अति संक्षयम !!कपिल भगवान म्हणतात; माते!  दु:संगाने सत्य, पावित्र्य, दया, मनन शिलता, बुद्धी, लज्जा, श्री, कीर्ती, क्षमा, मन:शांती इ.गुणांचा नाश होतो. भक्ती मार्गाच्या दृष्टीने दु:संग त्याज्य आहे. कुतर्क,वितंडवादी, अश्रद्ध, रजोगुणी, व नास्तिक माणसाच्या संगतीने माणूस विवेक बुद्धीपासून ढळतो. तुकाराम महाराज म्हणतात; नको दुष्ट संग! भजनामध्ये पडे भंग  !!आपण म्हणाल, दुर्जन आणि सज्जन ओळखावयाचे तरी कसे. ? तर, धर्म बाह्य, शास्त्र बाह्य कर्म करणारा दुर्जन. धर्माचरणाने वागणारा सज्जन. नाथबाबा म्हणाले ;जो मानी ना वेद शास्त्रार्था ! जो अविश्वासी परमार्था ! ज्या माजी अति विकल्पता! तो ही तत्वता दु:संग !!धर्म भ्रष्ट, नास्तिक, पाखंडी, मनुष्य आपल्या नात्यातील असला तरी, त्याची संगत करू नका. ...? तुलसीदास म्हणाले-जिनकू प्रिय न राम वैदेही! त्यजियो ताको कोटी बैरीसम! पिता त्यजो प्रल्हाद, बिभीषण बंधु, भरत म्हतारी!!भागवत भक्त प्रल्हादाने पित्याचा त्याग केला. बिभीषणाने भावाचा त्याग केला. भरताने जन्म दात्या आईचा त्याग केला. बलिराजाने शुक्र ाचार्याचा त्याग केला. धर्म भ्रष्ट माणूस कोणीही असो त्याची संगती साधकाला घातकच असते. महा वैष्णव ज्ञानराज माउली म्हणतात;  जैसा घरी आपुला  ! वा निवसे अग्नी लागला ! तो आणि कांही प्रज्वलिला  ! जाळूनि घाली  !!

एका अविचारी माणसाने आपल्या हातानेच घर पेटवले. त्याला विचारले, घर का पेटवलेस. .? तो म्हणाला, माझेच घर आहे. मी काहीही करील. तुम्ही कोण विचारणार. .? बाबारे. ..! घर पेटव पण त्याचा परिणाम तुझ्या शेजारी आम्ही असल्यामुळे आम्हालाही भोगावा लागणार आहे. तात्पर्य काय तर, एकदा का अग्नी प्रज्विलत झाला की तो शेजारचे घर ही जाळून नष्ट करतो. तसे अधर्माचा अग्नी कुणाच्याही मनात निर्माण झाला की तो त्याच्या संगतीत येणाऱ्यालाही बाधक ठरल्याशिवाय राहणार नाही. आज हाता हातावर धर्माचा ऱ्हास करणारी धर्म भ्रष्ट माणसे आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात; नको दुष्ट संग! भजनामध्ये पडे भंग!! 

(लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्र. 8329878467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक